शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

विधानसभेत विरोधकांना संधी न देण्याचा डाव, खंवटे यांच्याकडून सरकार लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 20:53 IST

विधानसभेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी आमदारांना लोकांचे प्रश्न विचारण्याची संधीच मिळणार नाही अशा पद्धतीने सरकारने रणनीती केली आहे.

पणजी : विधानसभेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी आमदारांना लोकांचे प्रश्न विचारण्याची संधीच मिळणार नाही अशा पद्धतीने सरकारने रणनीती केली आहे. आमदार उपस्थित नसताना लॉट्स काढले गेले, जेणोकरून जे आमदार प्रभावी पद्धतीने प्रश्न विचारतात, त्यांना विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा वेळच मिळणार नाही. विरोधकांचा आवाज बंद करण्याच्यादृष्टीने पुरेशी काळजी सरकारी यंत्रणोकडून घेतली गेली, अशी टीका अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी शुक्रवारी येथे केली.

खंवटे यांनी पत्रकार परिषद घेतली. येत्या दि. 3 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्या अधिवेशनासाठी आम्ही जे प्रश्न पाठविले होते, ते प्रश्न पहिल्या चार दिवसांत येणारच नाहीत अशी व्यवस्था सरकारने केली आहे. पाचव्या दिवशी शुक्रवारी म्हणजे अधिवेशनाच्या अंतिम दिवशी आमचे एक-दोन प्रश्न घेतले गेले आहेत. हे सरकार लोकशाही मानत नाही. सरकारकडे पैसेच नसल्याने बांधकाम खाते व जलसंसाधन खात्याचे कंत्रटदार नवी कामेच हाती घेत नाहीत. त्यांची बिलेच सरकारने फेडलेली नाहीत. राज्य नेतृत्वहीन बनल्याने प्रशासन ठप्प झाले आहे, असे खंवटे म्हणाले. सरकारकडे उत्तरेच नसल्याने आमचे प्रश्नच विधानसभेत येऊ नयेत असे सरकारला वाटते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या अधिवेशनात कृती अहवाल सादर करावा, अशी मागणी खंवटे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी किती आश्वासने दिली, किती घोषणा केल्या व त्याच्या पूर्ततेसाठी कोणती कृती केली ते मुख्यमंत्र्यांनी अहवालातून स्पष्ट करावे. माजी मुख्यमंत्री र्पीकर यांनी कृती अहवाल विधानसभेत सादर करण्याची पद्धत सुरू केली होती, असेही खंवटे म्हणाले.

..तर 5 फेब्रुवारीनंतर रस्त्यावर उतरू पर्वरीला चांगले सायन्स व कम्युनिटी पार्क साकारले आहे. त्यावर आता फक्त साठ लाख रुपये सरकारने खर्च केले तर काम पूर्ण होईल व उद्घानटही करता येईल पण सरकार मुद्दाम खर्च करत नाही. साठ लाख रुपये देखील सरकारकडे नाहीत. आपण आणखी काही दिवस थांबेन, अन्यथा पार्कचे काम पूर्ण करण्यासाठी देणगी द्यावी असा बोर्ड आपण पार्काकडे लावीन. येत्या मार्चर्पयत आम्ही पर्वरीवासिय त्याचे उद्घाटन करूच, असे खंवटे यांनी सांगितले. तिसरा मांडवी पुल उभा झाला. मात्र र्पीकर यांच्या निधनानंतर पर्वरीच्याबाजूने रस्त्याचे, गटाराचे वगैरे जे शिल्लक काम करायला हवे होते ते सरकारने केलेच नाही. कंत्रटदार एल अॅण्ड टी कंपनीलाही सरकार देणो आहे. त्यामुळे त्या कंपनीचे तसेच जीएसआयडीसीचे अधिकारीही साईटवर सापडत नाहीत. काम अर्धवट ठेवल्याने पर्वरीच्या बाजूला अपघात होतात. पर्वरी पोलिस स्थानकाकडे यापूर्वी प्रचंड पाणी साठले होते. तिथे पाणी नीट वाहू शकत नाही. येत्या दि. 5 फेब्रुवारीर्पयत सरकारने तिथे काम सुरू केले नाही तर आम्ही पर्वरीवासिय रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :goaगोवा