शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

यापुढे डिम्ड लिज नूतनीकरण नाही

By admin | Updated: December 5, 2014 01:06 IST

पणजी : खनिज लिजांसाठी डिम्ड नूतनीकरणाची पद्धत आता संपुष्टात येणार आहे. लिज नूतनीकरणासाठी अर्ज आल्यानंतर ६0 दिवसांत त्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेणे

पणजी : खनिज लिजांसाठी डिम्ड नूतनीकरणाची पद्धत आता संपुष्टात येणार आहे. लिज नूतनीकरणासाठी अर्ज आल्यानंतर ६0 दिवसांत त्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेणे बंधनकारक करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, तशी तरतूद नव्या एमएमडीआर दुरुस्ती कायद्यात केली जाणार आहे. डिम्ड नूतनीकरण बेकायदा आहे, हे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यातूनही स्पष्ट झाले आहे. डिम्ड नूतनीकरणाची जागा आता नवी पद्धत घेणार आहे. एखाद्या खनिज व्यावसायिक कंपनीने लिज नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर त्या अर्जावर ६0 दिवसांत राज्य सरकारने निर्णय घेणे बंधनकारक ठरणार आहे. जर ६0 दिवसांत निर्णय घेतला गेला नाही, तर संबंधित कंपनी त्याविरुद्ध केंद्र सरकारकडे दाद मागू शकेल. १९५७ सालच्या माईन्स अ‍ॅण्ड मिनरल्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रेग्युलेशन्स कायद्यात तशी दुरुस्ती केली जात आहे. हे दुरुस्ती विधेयक संसदेच्या येत्या अधिवेशनात मांडले जाणार असून गोव्यातील सर्व खनिज व्यावसायिक आणि पर्यावरणप्रेमींचे त्याकडे लक्ष लागून आहे. गोवा सरकारचेही त्याकडे लक्ष आहे. कोणताही अर्ज लिज नूतनीकरणासाठी आला व ६0 दिवसांत त्यावर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही, तर सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत हे लिज डिम्ड नूतनीकरण ठरते, अशा प्रकारची तरतूद सध्या १९६० सालच्या मिनरल कन्सेशन्स नियमांच्या कलम २४ ए, उपकलम ६ नुसार आहे. या पद्धतीचा गोव्यातही बऱ्याच मोठ्या प्रमाणात यापूर्वीचे सत्ताधारी व खनिज व्यावसायिकांनी गैरफायदा घेतला. नव्या दुरुस्तीबाबत केंद्रीय खनिज मंत्रालयाने राज्य सरकारकडून सूचना मागितली आहे. एमएमडीआर विधेयकाच्या नव्या मसुद्याबाबत लोकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या असून त्यासाठी दि. १० डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. देशभरात खनिज लिजांचा लिलाव पुकारण्याचे काम येत्या मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठीही एमएमडीआर कायद्यात तरतूद केली जाणार आहे. खनिज लिजेस देताना पारदर्शकता असावी, असा केंद्र सरकारचा हेतू आहे; पण गोव्यात मात्र लिलाव न पुकारता लिजांचे नूतनीकरण करून देणे सध्या सुरू आहे. एमएमडीआर कायद्याच्या दुरुस्त्या लागू होण्यापूर्वी राज्य सरकार गोव्यातील लिजांचे नूतनीकरण करून देत आहे. त्यासाठीच दि. १ डिसेंबरपासून एक वर्षाच्या रजेवर जाऊ पाहणारे खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांना सरकारने दि. ३१ डिसेंबरपर्यंत सेवेत राहण्यास सांगितले आहे. (खास प्रतिनिधी)