शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना नो एण्ट्री, 'कदंब'ने टेकले हात! बसेसचा तुटवडा असल्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:50 IST

विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी शाळेत सोडणे आणि नंतर शाळेतून घरी सोडणे, या कामासाठी कदंब बसेसची सोय सरकारने केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कदंब बसेस कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे. नवीन बसगाड्या मिळत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी शाळेत सोडणे आणि नंतर शाळेतून घरी सोडणे, या कामासाठी कदंब बसेसची सोय सरकारने केली होती. मात्र, ही व्यवस्था यंदा कोलमडली आहे. कारण यंदा बसगाड्यांचा तुटवडा असल्याचे कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थीही बसमध्ये घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारकडून अतिरिक्त बसगाड्या महामंडळाला दिल्याशिवाय विद्यार्थ्यांची सोय केली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

यंदा बसगाड्यांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांसाठीची योजना कोलमडून पडल्याची कबुली कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली. नवीन बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, जुलै महिन्यात त्या मिळण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. निदान आणखी १०० बसगाड्या मिळाल्या त विद्यार्थ्यांसाठीची योजना पुन्हा सुरळीत होऊ शकते, असे ते म्हणाले. 

नव्या बसेसची प्रतीक्षा

नवीन बसगाड्या येणार असल्याच सरकारने म्हटले असले तरी त्या केव्हा येणार, याबद्दल महामंडळाचे अधिकारीही निश्चितपणे काहीच सांगू शकत नाहीत. त्यामुळे या बाबतीत अनिश्चितता आणि गैरसोय कायम राहिली आहे. विद्यार्थ्यांना दररोजच्य प्रवासाला प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

पास प्रक्रिया बंद

योजनाच कोलमडल्यामुळे नवीन पास बनविण्याचे काम महामंडळाने थांबवले आहे. त्यामुळे पास नसलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जात नाही, अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कदंब महामंडळाचे काही बसचालक विद्यार्थ्यांची अडचण समजून घेऊन पासची सक्ती करीत नाहीत, हा विद्यार्थ्यांना दिलासा आहे.

या योजनेची सुरुवात करून कदंब महामंडळाने पालक व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला होता. सकाळच्या वेळी शाळा सुरु होताना विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची आणि नंतर शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी सोडण्याची व्यवस्था केली होती. मधल्या काळात या बसगाड्या आपल्या नेमून दिलेल्या मार्गावर धावू शकतात. अशी ही योजना होती. वार्षिक शुल्क आकारून त्यासाठी विद्यार्थ्यांना पास दिले जात होते. इयत्ता बारावीपर्यंतचे विद्यार्थी त्याचा लाभ घेत होते.

 

टॅग्स :goaगोवा