शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना नो एण्ट्री, 'कदंब'ने टेकले हात! बसेसचा तुटवडा असल्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:50 IST

विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी शाळेत सोडणे आणि नंतर शाळेतून घरी सोडणे, या कामासाठी कदंब बसेसची सोय सरकारने केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कदंब बसेस कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे. नवीन बसगाड्या मिळत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी शाळेत सोडणे आणि नंतर शाळेतून घरी सोडणे, या कामासाठी कदंब बसेसची सोय सरकारने केली होती. मात्र, ही व्यवस्था यंदा कोलमडली आहे. कारण यंदा बसगाड्यांचा तुटवडा असल्याचे कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थीही बसमध्ये घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारकडून अतिरिक्त बसगाड्या महामंडळाला दिल्याशिवाय विद्यार्थ्यांची सोय केली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

यंदा बसगाड्यांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांसाठीची योजना कोलमडून पडल्याची कबुली कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली. नवीन बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, जुलै महिन्यात त्या मिळण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. निदान आणखी १०० बसगाड्या मिळाल्या त विद्यार्थ्यांसाठीची योजना पुन्हा सुरळीत होऊ शकते, असे ते म्हणाले. 

नव्या बसेसची प्रतीक्षा

नवीन बसगाड्या येणार असल्याच सरकारने म्हटले असले तरी त्या केव्हा येणार, याबद्दल महामंडळाचे अधिकारीही निश्चितपणे काहीच सांगू शकत नाहीत. त्यामुळे या बाबतीत अनिश्चितता आणि गैरसोय कायम राहिली आहे. विद्यार्थ्यांना दररोजच्य प्रवासाला प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

पास प्रक्रिया बंद

योजनाच कोलमडल्यामुळे नवीन पास बनविण्याचे काम महामंडळाने थांबवले आहे. त्यामुळे पास नसलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जात नाही, अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कदंब महामंडळाचे काही बसचालक विद्यार्थ्यांची अडचण समजून घेऊन पासची सक्ती करीत नाहीत, हा विद्यार्थ्यांना दिलासा आहे.

या योजनेची सुरुवात करून कदंब महामंडळाने पालक व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला होता. सकाळच्या वेळी शाळा सुरु होताना विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची आणि नंतर शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी सोडण्याची व्यवस्था केली होती. मधल्या काळात या बसगाड्या आपल्या नेमून दिलेल्या मार्गावर धावू शकतात. अशी ही योजना होती. वार्षिक शुल्क आकारून त्यासाठी विद्यार्थ्यांना पास दिले जात होते. इयत्ता बारावीपर्यंतचे विद्यार्थी त्याचा लाभ घेत होते.

 

टॅग्स :goaगोवा