शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विद्यार्थ्यांना नो एण्ट्री, 'कदंब'ने टेकले हात! बसेसचा तुटवडा असल्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:50 IST

विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी शाळेत सोडणे आणि नंतर शाळेतून घरी सोडणे, या कामासाठी कदंब बसेसची सोय सरकारने केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कदंब बसेस कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यास महामंडळाने असमर्थता दर्शविली आहे. नवीन बसगाड्या मिळत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी शाळेत सोडणे आणि नंतर शाळेतून घरी सोडणे, या कामासाठी कदंब बसेसची सोय सरकारने केली होती. मात्र, ही व्यवस्था यंदा कोलमडली आहे. कारण यंदा बसगाड्यांचा तुटवडा असल्याचे कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थीही बसमध्ये घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारकडून अतिरिक्त बसगाड्या महामंडळाला दिल्याशिवाय विद्यार्थ्यांची सोय केली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

यंदा बसगाड्यांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांसाठीची योजना कोलमडून पडल्याची कबुली कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली. नवीन बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, जुलै महिन्यात त्या मिळण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. निदान आणखी १०० बसगाड्या मिळाल्या त विद्यार्थ्यांसाठीची योजना पुन्हा सुरळीत होऊ शकते, असे ते म्हणाले. 

नव्या बसेसची प्रतीक्षा

नवीन बसगाड्या येणार असल्याच सरकारने म्हटले असले तरी त्या केव्हा येणार, याबद्दल महामंडळाचे अधिकारीही निश्चितपणे काहीच सांगू शकत नाहीत. त्यामुळे या बाबतीत अनिश्चितता आणि गैरसोय कायम राहिली आहे. विद्यार्थ्यांना दररोजच्य प्रवासाला प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

पास प्रक्रिया बंद

योजनाच कोलमडल्यामुळे नवीन पास बनविण्याचे काम महामंडळाने थांबवले आहे. त्यामुळे पास नसलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जात नाही, अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कदंब महामंडळाचे काही बसचालक विद्यार्थ्यांची अडचण समजून घेऊन पासची सक्ती करीत नाहीत, हा विद्यार्थ्यांना दिलासा आहे.

या योजनेची सुरुवात करून कदंब महामंडळाने पालक व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला होता. सकाळच्या वेळी शाळा सुरु होताना विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची आणि नंतर शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी सोडण्याची व्यवस्था केली होती. मधल्या काळात या बसगाड्या आपल्या नेमून दिलेल्या मार्गावर धावू शकतात. अशी ही योजना होती. वार्षिक शुल्क आकारून त्यासाठी विद्यार्थ्यांना पास दिले जात होते. इयत्ता बारावीपर्यंतचे विद्यार्थी त्याचा लाभ घेत होते.

 

टॅग्स :goaगोवा