शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

धबधब्यांवर 'नो एण्ट्री'; अभयारण्यातही प्रवेश निषिद्ध, वनमंत्र्यांनी मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 13:41 IST

राज्यात मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने सर्व अभयारण्यांमध्ये व धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सर्व अभयारण्यांमध्ये तसेच वनक्षेत्रातील धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंदी लागू करणारे परिपत्रक काल वन खात्याने जारी केले आहे. अतिरिक्त प्रधान मुख्य वनपाल व मुख्य वन्यप्राणी वॉर्डन उमाकांत यांनी हे परिपत्रक काल काढले. राज्यात मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने सर्व अभयारण्यांमध्ये व धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

नेत्रावळी, सांगे येथे मैनापी धबधब्यावर दोघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा आदेश वन खात्याने काढला आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रवाहाने धबधबे वाहतात. तेथे भेट देणाऱ्या व आंघोळीसाठी उतरणाऱ्यांच्या जीवावर बेतते. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवेश बंदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वनमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, पावसाळ्यात वेगाने कोसळणाऱ्या व असुरक्षित धबधब्यांबाबत मी वन खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला आहे. तूर्त वन क्षेत्रातील सर्व धबधब्यांवर प्रवेश बंदीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अहवाल हाती आल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात कुठले धबधबे लोकांसाठी खुले करावेत आणि कुठले बंद ठेवावेत, यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल.

पावसाळ्यात खास करून जंगलांमध्ये किंवा अभयारण्यात अनेक धबधबे वाहतात व मान्सून काळात 'पिकनिकसाठी ते लोकांचे आकर्षण ठरतात. वीकएंडला या धबधब्यांवर मोठी गर्दी असते. परंतु वन खात्याच्या परिपत्रकामुळे या ठिकाणी आता प्रवेश बंदी लागू झालेली आहे. सत्तरी, काणकोण सांगे तालुक्यांमध्ये अनेक लोकांचा अभयारण्यांशी संबंध येतो. त्यांनाही प्रवेश बंदी लागू झाली आहे.

बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश 

सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मैनापी धबधब्यावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काल तातडीची बैठक घेऊन धबधब्याला भेट देणारे स्थानिक तसेच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते उपस्थित होते.

हलगर्जीपणा मान्य

फळदेसाई म्हणाले की, रविवारी झालेल्या या दुर्घटनेमुळे प्रशासनाचा तसेच वन खात्याचा हलगर्जीपणा दिसून आला. मैनापी धबधब्याला हजारो पर्यटक भेट देत असतात. तेथे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना व्हायला हव्यात. या अनुषंगाने बैठकीत मी आवश्यक ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले असून तातडीने काही गोष्टी करून घेणार आहे

 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन