शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विश्वजित राणे यांच्याशी वाद नाहीच, ते आमचेच: प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2024 09:26 IST

'लोकमत'ने मुख्यमंत्र्यांना दिल्ली भेटीबाबत विचारले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: एखाद्या कुटूंबात एकत्र काम करताना रुसवे-फुगवे वगैरे असतातच. पण त्याचा अर्थ आपला वाद आहे, असा होत नाही. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याशी माझा वाद नाही, आमचे संबंध व नाते चांगले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सांगितले.

'लोकमत'ने मुख्यमंत्र्यांना काल रात्री दिल्ली भेटीबाबत विचारले त्यावेळी मुख्यमंत्री हसले आणि म्हणाले की, नवे काहीच नाही. मंत्री राणे व माझ्यात वाद नाही. सरकार म्हणजे एक कुटूंब आहे. एकाच कुटुंबात आम्ही काम करतो. काम करताना किंचित मतभिन्नता किंवा थोडे रुसवे-फुगवे वगैरे असतात पण याचा अर्थ संघर्ष किंवा वाद आहे, असा होत नाही. माध्यमातून तसे आले असले तरी प्रत्यक्षात तसे काहीच नाही. मंत्री राणे यांच्याशी व्यक्तीगत स्तरावर माझे नाते चांगले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की दिल्लीतील बैठकीवेळी आमच्यात चर्चा झालीच पण बैठकीपूर्वी देखील आम्ही नड्डा यांच्या घरी एकत्र बसलो होतो. त्यावेळीही आम्ही एकमेकांशी चांगले बोललो. बैठकीनंतरही आम्ही एकमेकांना भेटून चांगले बोललो, त्यामुळे आमच्यात कटुता किंवा संघर्ष वगैरे काही नाही. आमचा नियमितपणे संवाद होतोय. उलट विश्वजित हे माझे शेजारी देखील आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत यांचा साखळी मतदारसंघ हा सत्तरी तालुक्याचा शेजारी आहे. शिवाय साखळीतच राणे यांचे निवासस्थान असल्याने त्या अर्थानेही विश्वजित हे शेजारी ठरतात. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील बैठकीविषयी जास्त माहिती उघड केली नाही. मुख्यमंत्र्यांनी विश्वजित राणे यांच्याबाबत कुठेच कोणते विरोधी विधान केलेले नाही. काल देखील त्यांनी कुणालाच कोणती प्रतिक्रिया दिली नाही, ते शांतपणे स्थिती पाहत आहेत. 'लोकमत'ने नोकऱ्यांबाबत विचारले असता, कर्मचारी भरती आयोगाचे काम आता खूप पुढे पोहचले आहे, एवढेच ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत