शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

तियात्रावर सेन्सॉर नको : चर्चिल

By admin | Updated: February 17, 2015 02:26 IST

मडगाव : तियात्र संहितावर सेन्सॉर लागू करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र आक्षेप

मडगाव : तियात्र संहितावर सेन्सॉर लागू करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र आक्षेप घेतला असून असे केल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती गळचेपी होईल, तसेच कोकणी समाजावरही एक प्रकारचा अन्याय होईल, असा दावा केला. कोकणी तियात्र हा समाजमनाचा आरसा असून कित्येकवेळा त्यातून समाजप्रबोधनही होते. कित्येकदा तियात्रांतून राजकारण्यावर टीका करणारी गीते गायिली जातात. सध्याच्या सरकारवरही तियात्रातून टीका केली जाते. ही टीका सहन होत नसल्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. वास्तविक अशी गीते आपल्यावरही गायिली गेली आहेत. मात्र, आपण कधीही त्यास विरोध केला नाही. कुठल्याही तियात्रात बदनामीकारक गीत म्हटल्यास त्याच्या विरोधात न्यायालयात दावा करता येतो. मात्र, सेन्सॉर आणून तियात्रिस्तांचा आवाज बंद करणे कुठल्याही परिस्थितीत समर्थन करण्यासारखे नाही, असे ते म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणुकीबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजप सरकार या निवडणुका पक्ष पातळीवर घेऊन लोकशाहीचा खून करण्यास सरसावले आहे. उमेदवाराचा आवाज दडपण्यासाठी ही चाल खेळली जाते. अशा सरकारला आता लोकांनीच धडा शिकवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)