शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

तियात्रावर सेन्सॉर नको : चर्चिल

By admin | Updated: February 17, 2015 02:26 IST

मडगाव : तियात्र संहितावर सेन्सॉर लागू करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र आक्षेप

मडगाव : तियात्र संहितावर सेन्सॉर लागू करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र आक्षेप घेतला असून असे केल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती गळचेपी होईल, तसेच कोकणी समाजावरही एक प्रकारचा अन्याय होईल, असा दावा केला. कोकणी तियात्र हा समाजमनाचा आरसा असून कित्येकवेळा त्यातून समाजप्रबोधनही होते. कित्येकदा तियात्रांतून राजकारण्यावर टीका करणारी गीते गायिली जातात. सध्याच्या सरकारवरही तियात्रातून टीका केली जाते. ही टीका सहन होत नसल्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. वास्तविक अशी गीते आपल्यावरही गायिली गेली आहेत. मात्र, आपण कधीही त्यास विरोध केला नाही. कुठल्याही तियात्रात बदनामीकारक गीत म्हटल्यास त्याच्या विरोधात न्यायालयात दावा करता येतो. मात्र, सेन्सॉर आणून तियात्रिस्तांचा आवाज बंद करणे कुठल्याही परिस्थितीत समर्थन करण्यासारखे नाही, असे ते म्हणाले. जिल्हा पंचायत निवडणुकीबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, भाजप सरकार या निवडणुका पक्ष पातळीवर घेऊन लोकशाहीचा खून करण्यास सरसावले आहे. उमेदवाराचा आवाज दडपण्यासाठी ही चाल खेळली जाते. अशा सरकारला आता लोकांनीच धडा शिकवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)