शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Nitin Gadkari In Goa: स्थिर सरकार द्या, आम्ही पुरेसा निधी देऊ; नितीन गडकरींचं गोव्यात वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 21:28 IST

‘भारतमाला-२’ अंतर्गत गोव्याला राष्ट्रीय महामार्गांसाठी केंद्र सरकारची आणखीही निधी देण्याची तयारी आहे. राज्य सरकारने केवळ प्रस्ताव पाठवावेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी जाहीर केले.

पणजी :

‘भारतमाला-२’ अंतर्गत गोव्याला राष्ट्रीय महामार्गांसाठी केंद्र सरकारची आणखीही निधी देण्याची तयारी आहे. राज्य सरकारने केवळ प्रस्ताव पाठवावेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, केंद्राने गोव्याला रस्त्यांसाठी २२ हजार कोटी आणि बंदर विकासाकरिता ४ हजार कोटी दिले. गोमंतकीय जनतेने आम्हाला स्थिर सरकार द्यावे, आम्ही गोव्याला पुरेसा निधी देऊ.’

भाजपच्या राज्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते. येथील सरस्वती मंदिर इमारतीत हे कार्यालय उघडण्यात आले आहे. कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार बाबुश मोन्सेरात, नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

‘पर्रीकरांची उणीव भासू दिली नाही’गडकरी म्हणाले की, ‘सावंत यांनी पर्रीकरांची उणीव भासू दिली नाही. विकासाच्या बाबतीत ते नेहमीच दक्ष राहिले. पर्रीकरांएवढ्याच निस्पृह आणि निस्वार्थी भावनेने ते काम करीत आहेत. गोवा पर्यावरणाबाबतही दक्ष आहे आणि लवकरच गोवा हे पहिले प्रदूषमुक्त राज्य ठरेल.’

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की,‘गडकरी गोव्याकडे आपले राज्य म्हणून पाहतात आणि भरभरुन मदतही करतात. त्यांनी गोव्याला अनेक प्रकल्प दिले.’ सावंत यांनी यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘केजरीवाल हे अर्ध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीत आरोग्य आणि शिक्षण वगळता अन्य गोष्टी राज्य सरकारच्या हातात नाही. अर्ध्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला शहाणपणा शिकवू नये. दिल्लीत सरकार प्रदूषणाची समस्या दूर करु शकलेले नाही म्हणून ते शुध्द हवेसाठी पुन: पुन: गोव्यात येतात. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर गाशा गुंडाळून त्यांन जावे लागेल.’

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgoaगोवा