शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

घटक पक्षांच्या दबावाला नितीन गडकरी पुरून उरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:16 IST

भाजपच्याही दोघा- तिघा आमदारांनी लॉबिंग व दबावाच्या राजकारणात भाग घेतला.

- सदगुरू पाटील

पणजी : आपल्याला मुख्यमंत्री म्हणून हाच हवा, तो नको, आपल्याला उपमुख्यमंत्रीपदच हवे, आपल्या सर्व आमदारांना मंत्रीपदे मिळायला हवीत, आपल्या पक्षाच्या पदाधिका:यांना एवढी महामंडळे मिळायला हवीत, आपल्या अन्य काही मागण्या मान्य व्हायलाच हव्यात अशा प्रकारच्या मागण्या पुढे करत दबावाचे राजकारण भाजपप्रणीत आघाडीच्या घटक पक्षांनी व अपक्षांनी केले. मात्र राजकारणात माहिर असलेले केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी हे दबावाचे राजकारण करणा:यांना पुरून उरले हे गोव्यातील ताज्या राजकीय अंकाने स्पष्ट केले.

भाजपच्याही दोघा- तिघा आमदारांनी लॉबिंग व दबावाच्या राजकारणात भाग घेतला. जेव्हा सात-आठ बिगरभाजप आमदार एकत्र जमून शह-काटशहचे राजकारण करू लागले तेव्हा भाजपचे तिघे आमदार त्यांच्या कळपात सामिल होऊ लागले. दबावाचे राजकारण करणा:यांनी प्रथम श्रीपाद नाईक हे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला नको अशी भूमिका घेतली तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षअमित शहा यांना ते ऐकावे लागले. प्रमोद सावंत हेही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको असा सूर भाजपमधीलच एक-दोन आमदारांनी लावला तेव्हा गडकरी यांनी एका आमदाराबाबत कडक भूमिका घेतली. काहीजणांनी काँग्रेसचीही आम्हाला ऑफर आहे असा सूर लावला तेव्हाही गडकरी आक्रमक बनले. यामुळे शेवटी घटक पक्ष व अपक्षांनी व भाजपमधीलही असंतुष्टांनी नमते घेतले व सावंत मुख्यमंत्री बनले.

मगोपच्या सुदिन ढवळीकर यांनी अगोदर पाठींब्याचे पत्रच प्रमोद सावंत यांच्या नावाने भाजपला दिले नव्हते. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही पत्र दिले नव्हते. त्यामुळे शपथविधी सोहळा सोमवारी रात्री होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला. भाजपमध्ये तणावाची स्थिती आली. त्यातूनच मग मगो पक्ष फोडण्याची कल्पना पुढे आली. बाबू आजगावकर व दिपक पाऊसकर हे मगोपचे दोन आमदार मगोपासून वेगळे होत स्वतंत्र गट करून राहण्यास तयार झाले होते. तसे झाले तर सुदिन ढवळीकर एकटे पडतील अशी कल्पना मायकल लोबो व विश्वजित राणो यांनी गडकरींना दिली. आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी ढवळीकरांची गरज आहे, असा मुद्दा गडकरींसमोर मांडला गेला. तसेच ढवळीकरांनीही थोडी सौम्य भूमिका घेत मग पाठींब्याचे पत्र दिले. यामुळे फुट टळली.

मगोपच्या तिन्ही आमदारांना मंत्रीपदे द्यावीत असा आग्रह मगोपने धरला होता पण दोघांनाच मंत्रीपदे देणो गडकरींनी मान्य केले. फक्त सरदेसाई व ढवळीकर या दोघांनाही उपमुख्यमंत्रीपद द्यावे ही एकमेव व मोठी मागणी गडकरी यांनी व अमित शहा यांनीही मान्य केली. त्यामुळे सरकार घडले. ही मागणी मान्य व्हावी म्हणून प्रमोद सावंत व लोबो यांनीही प्रयत्न केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीManohar Parrikarमनोहर पर्रीकर