मडगाव : संपूर्ण गोव्यात गाजलेल्या सुलतान बेल्लारी खूनप्रकरणी सर्व नऊ संशयितांची निर्दोष सुटका झाली. सोमवारी दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी हा निवाडा देताना, संशयितांविरुद्ध आरोप सिद्ध करण्यास अभियोग पक्षाला सपशेल अपयश आल्याचे नमूद केले आहे. भादंसंच्या ३0२ (खून), २0१ (पुरावा नष्ट करणे), ३६४ (अपहरण), ३५४ (अडवणूक करणे) व १२0 (ब) (कटकारस्थान) असे गुन्हे नोंद झालेल्या या सर्व संशयितांची निर्दोष सुटका झाली. या खून प्रकरणातील विनोद यादव व अन्य एक अज्ञात व्यक्ती अजूनही फरार असून त्यांच्याविरुद्धचा निकाल राखून ठेवला आहे.मडगावातील बजरंग दलाचा नेता जयेश नाईक याच्यासह गोविंद नाईक, राजेश नाईक, संदीप कळंगुटकर, कृष्णा अंचोटी, नितीन भोसले, नितीन डिचोलकर, विवेक दमकले, रसिकांत गावस व विनोद यादव व अन्य एक अज्ञात व्यक्ती हे या प्रकरणातील आरोपी होते.राजेश नाईक याच्या भुसारी दुकानात चोरी झाली होती. दोनदा चोरी झाल्यानंतर मागाहून नाईक याने दुकानात क्लोज सर्किट कॅमेरा बसविला होता. तिसऱ्यांदा सुलतान या दुकानात चोरी करण्यासाठी शिरला असता, त्याची छबी कॅमेऱ्यात बंदिस्त झाली. संशयितांनी त्याचा माग काढत ९ जानेवारी रोजी स्विफ्ट कारमधून त्याचे अपहरण केले. नंतर त्याला समर्थगड येथील व्यायामशाळेत बंदिस्त करून ठेवले. (पान २ वर)
बेल्लारी खूनप्रकरणी नऊ निर्दोष
By admin | Updated: June 23, 2015 01:17 IST