शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

गोव्यात आगामी मुख्यमंत्री भंडारी समाजाचा, साळगावकरांचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 21:10 IST

पणजी : गोव्यात पुढील मुख्यमंत्री हा भंडारी समाजातील होईल. तुम्हाला भंडारी समाजातील मुख्यमंत्री यापुढे पहायला मिळेल, असे गृहनिर्माण खात्याचे मंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते जयेश साळगावकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.गोमंतक भंडारी समाजातील दोन गटांचे सोमवारी एकीकरण झाले. त्यानिमित्ताने भंडारी समाजाने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा फॉरवर्डचे मंत्री विनोद ...

पणजी : गोव्यात पुढील मुख्यमंत्री हा भंडारी समाजातील होईल. तुम्हाला भंडारी समाजातील मुख्यमंत्री यापुढे पहायला मिळेल, असे गृहनिर्माण खात्याचे मंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते जयेश साळगावकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.

गोमंतक भंडारी समाजातील दोन गटांचे सोमवारी एकीकरण झाले. त्यानिमित्ताने भंडारी समाजाने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा फॉरवर्डचे मंत्री विनोद पालयेकर, जयेश साळगावकर व रवी नाईक यांनाही बोलावले होते. नाईक पोहचू शकले नाहीत. दोन्ही समाज एकत्र आले असून आता आम्ही एकत्रितपणे काम करू, असे अध्यक्ष अनिल होबळे यांनी जाहीर केले. आमच्या समाजाची लोकसंख्या गोव्यात पाच लाख आहे. समाजाच्या शक्तीकडे कुणी दुर्लक्ष करू शकत नाही, असे होबळे म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी भंडारी समाजातील कुणी मुख्यमंत्री व्हावा असे तुम्हाला वाटत नाही काय असे विचारले असता,  होबळे यांनी हे राजकीय व्यासपीठ नव्हे, येथे सर्व पक्षांचे समर्थक आहेत असे सांगितले. मात्र तुमच्या समाजातील कुणी मुख्यमंत्री व्हावा अशी तुमची इच्छा नाही काय असे विचारताच मंत्री साळगावकर यांनी यापुढे भंडारी समाजातील एखादा नेता मुख्यमंत्री होईल, असे विधान केले. भंडारी समाज बांधवांनी यावेळी टाळ्य़ा वाजवल्या. आपण लहान असल्यापासून या समाजाच्या कार्यासोबत आहे. आपल्या समाजाची प्रगती व्हावी म्हणून मी नेहमीच वावरत आलो, समाजाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये भाग घेत आलो आहे. समाजाचे एकत्रिकरण झाले याविषयी खूप आनंद वाटतो, असे मंत्री साळगावकर म्हणाले. समाजातील ज्या मुलांचे आर्थिकदृष्टय़ा शिक्षण होत नाही, अशा मुलांना समाजाकडून मदत केली जावी, अशी अपेक्षा साळगावकर यांनी व्यक्त केली.

भंडारी समाजात कधीच दुफळी नव्हती. आम्ही कायमच संघटीत होतो, असे मंत्री पालयेकर म्हणाले. भंडारी समाज यापुढेही एकजुटीने कार्य करत राहिल. देशाच्या प्रगतीत हा समाज योगदान देईल, असे श्रीपाद नाईक म्हणाले. एकीकरणासाठी आम्ही कायम प्रयत्न केले. दोन गट होते पण आम्ही एकमेकांची हानी केली नाही. समाजाकडून युवकांनाही वाव देऊन कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे होबळे म्हणाले. फक्रू पणजीकर, उपेंद्र गावकर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :goaगोवा