शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

गोव्यातील ग्रामीण भागात हायवेलगतच्या मद्य आस्थापनांना आशेचा नवा किरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 21:16 IST

विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने राज्यातील ग्रामीण भागात हायवेलगतच्या बंद असलेल्या बार्रांचे मालक तसेच मद्यविक्री करणा-या दुकानमालकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. 

पणजी : विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने राज्यातील ग्रामीण भागात हायवेलगतच्या बंद असलेल्या बार्रांचे मालक तसेच मद्यविक्री करणा-या दुकानमालकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. 

पालिका क्षेत्रांमधील बार आणि मद्य विक्री करणा-या दुकानांना आधीच दिलासा मिळालेला आहे. पालिका क्षेत्राच्या व्याख्येवरुन प्रश्न उपस्थित केले जात होते. तशी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. पालिकांप्रमाणे विकास झालेल्या पंचायतींमधील मद्य आस्थापनांना वगळावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर गेल्या २३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिला. 

अबकारी खात्यातील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता पंचायत क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या १३३२ परवान्यांचे नूतनीकरण झालेले नसल्याचे सांगण्यात आले. कुठल्या पंचायतीचा भाग विकसित आहे आणि काय हे सरकारने ठरवावे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा, असे या अधिका-याने सांगितले. 

अ‍ॅडव्होकेट जनरलना भेटणार... अखिल गोवा मद्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘येत्या एक-दोन दिवसात अ‍ॅडव्होकेट जनरलची भेट घेऊन या प्रश्नावर आम्ही चर्चा करणार आहोत. विकास झालेल्या पंचायतींमधील हमरस्त्यांलगतची बार तसेच मद्यविक्री करणा-या दुकानांच्याबाबतीत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे सरकारनेच आता निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच यातून मार्ग काढू शकतात आणि मद्य आस्थापने वाचवू शकतात परंतु ते सध्या आजारी आहेत. ते लवकर बरे होओत, अशी प्रार्थना आम्ही करतो.’दत्तप्रसाद पुढे म्हणाले की, ‘पर्वरीसारखा भाग विकसित आहे त्यामुळे या भागातील सुमारे चाळीसेक परवानेधारकांना दिलासा मिळू शकतो परंतु शेवटी सरकारने निर्णय घ्यावा लागेल. राजभरात १२४0 परवान्यांचे नूतनीकरण न झाल्याने मद्य आस्थापने बंद आहेत. यातील बहुतांश ग्रामीण भागातील आहेत. उसगांव, खांडेपार, धारबांदोडा, मोलें, पोळें, धारगळ या भागात जास्तीत जास्त मद्य आस्थापने आहेत त्यांना यातून सोडविणे आव्हानात्मक आहे. मुख्यमंत्री पर्रीकरच हे काम करु शकतात.’

टॅग्स :goaगोवा