शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नवा मांडवी पूल दुरुस्ती लांबणीवर; 'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 13:37 IST

'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने बांधकाम खात्याने हा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नवा मांडवी पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याची तारीख दहावीच्या परीक्षेमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. परीक्षा संपल्यावर, १८ मार्चपासून केवळ चार ते पाच दिवसच पूल बंद राहील. 'लोकमत'च्या वृत्तानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाने बांधकाम खात्याने हा निर्णय घेतला आहे.

'लोकमत'ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध करून २ ते १० मार्च याकाळात पूल बंद ठेवल्यास परीक्षार्थी, पालकांचे कसे हाल होतील, याकडे लक्ष वेधले होते. सध्या कार्निव्हल सुरू असून, मिरवणुकांतही अडचणी आल्या असत्या.

'लोकमत'ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दहावीची परीक्षा संपेपर्यंत पूल बंद ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे पूल बंदची तारीख पुढे ढकलण्यात आली.

काय घडले असते?

परीक्षेच्या काळात पूल बंद राहिला असता तर विद्यार्थ्यांचे हाल झाले असते. जुन्या पुलावर एखादा अपघात घडला असता तर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असती. दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या पुलाची भारवाहक क्षमता १२ टनांपेक्षा कमी वाहनांची आहे. त्यामुळे पर्वरीहून पणजीकडे येणारी १२ टनांपेक्षा अधिक वजनाची सर्व वाहने अटल सेतूवरून वळवावी लागली असती व मेरशीत वाहतुकीची मोठी कोंडी झाली असती. त्यामुळे पणजी, कुजिरातील शाळांमध्ये परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी अडकले असते. जुना पूल बंद केला, त्यावेळी पंधरा दिवस खास करून दुचाकीस्वारांनी उन्हाचे चटके खात वाहतूक कोंडी सहन केली. आता पुन्हा तसेच घडले असते.

आता १८ मार्चपासून केवळ चार-पाच दिवसच राहणार बंद

बांधकाम खात्याचे विभाग - ७ (राष्ट्रीय महामार्ग) कार्यकारी अभियंता ज्युड कार्व्हलो म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता आम्ही पूल बंदचा सुधारित आदेश काढणार आहोत. १८ पासून केवळ चार ते पाच दिवस पूल बंद राहील.

पालकांनी दिले 'लोकमत'ला धन्यवाद

दरम्यान, सरकारने विधानसभा दोन दिवसांच्या अधिवेशन काळात मंत्री, आमदारांना त्रास नको म्हणून पुलाच्या दुरुस्तीचे काम लांबणीवर टाकले होते. भर दहावीच्या परीक्षेच्यावेळी काम काढल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

शेवटी 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत पूल बंदची तारीख पुढे ढकलल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून 'लोकमत'ला धन्यवाद दिले जात आहेत. तूर्त परीक्षा काळातील अडचणी टळल्या आहेत. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतLokmatलोकमत