शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

'शाहजहान' जिंकला; अभिमानाचा, आत्मगौरवाचा हा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:33 IST

गोमंतकीयांसाठी अभिमानाचा, आत्मगौरवाचा हा क्षण आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 

भावनिकदृष्ट्या समाजमनाशी जोडल्या गेलेल्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे पूर्ण नूतनीकरण करून घेणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे असते. कांपाल येथील रम्य ठिकाणी सुरेख अशा मांडवी नदीकिनारी गोव्याचा कला अकादमी प्रकल्प आहे. एकेकाळी अनेक मोठे साहित्यिक दिग्गज गायक, बॉलिवूड कलाकार व इतरांचे पाय या प्रकल्पातील भूमीला लागले. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचे नाट्यगृह या प्रकल्पात आहे. आज १० रोजी नव्या तेजस्वी रूपातील कला अकादमीचे उद्घाटन होत आहे. गोमंतकीयांसाठी अभिमानाचा, आत्मगौरवाचा हा क्षण आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 

कला अकादमीभोवती यापूर्वी मोठ्या वादाचे काहूर उठले होते. ज्यांनी वाद निर्माण केला, त्यांचा दोष नव्हता, कारण निविदा न काढता पन्नास कोटी रुपये खर्चून प्रकल्पाचे नूतनीकरण होतेय हा चर्चेचा व नाजूक विषय ठरला होता. विधानसभा अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई व इतरांनी प्रचंड टीकेची झोड उठवली होती. अशाप्रकारे निविदा न काढता जनतेचे ४५-५० कोटी रुपये खर्च करता येत नाहीत, असे सरदेसाई यांचे म्हणणे होते. त्यावेळी बोलण्याच्या ओघात मंत्री गोविंद गावडे यांनी ताजमहलचे उदाहरण दिले होते. 

जगप्रसिद्ध ताजची निर्मिती करताना शाहजहान यांनी निविदा जारी केली होती काय, असा प्रतिप्रश्न करून गावडे यांनी सरकारच्या कृतीचे समर्थन केले होते. अर्थात ती निविदा काही गावडे यांच्या कला व संस्कृती खात्याने काढली नव्हती. अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही त्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा होता. मात्र, विरोधकांनी पूर्ण सरकारला जाब न विचारता, फक्त गावडे यांनाच लक्ष्य बनविले होते. गावडे यांनी त्यावेळी शाहजहान यांच्या ताजमहलचे उदाहरण दिले, हे मात्र चुकीचे होते. त्या काळात निविदा काढून वास्तू उभारल्या जात नव्हत्या, हे ऐतिहासिक नाटकांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या गावडे यांना कळायला हवे होते. 

अर्थात कला अकादमीमुळे शाहजहान हा चेष्टेचा विषय झाला असला, तरी त्यातील विनोदाचा भाग आपण विसरूया. कारण कला अकादमीचे आजचे रूप हे अधिक तेजस्वी आहे व त्याचे श्रेय सरकारला द्यावेच लागेल. कला व संस्कृती खाते सांभाळणाऱ्या कोणत्याही मंत्र्यास काही विधाने करताना खूप काळजी घ्यावी लागते. गावडे यांना कला अकादमी वादातून हे कळाले असेलच. कला अकादमीला गळती लागली होती, त्यामुळे दुरुस्ती, नूतनीकरण गरजेचेच आहे, असा मुद्दा आम्ही पूर्वीही मांडला होता. मात्र, कलाकारांना विश्वासात घेण्याची भूमिका सरकारने घेतली असती तर अगोदरच लोकांचा पाठिंबा सरकारच्या निर्णयास मिळाला असता. 

चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनलाही कमी लेखण्याचा प्रयत्न अगोदर झाला होता. दुसरी गोष्ट म्हणजे कला अकादमी नव्याने खुली तरी कधी होणार, असे गोव्यातील सर्व रसिक श्रोते, प्रेक्षक व कलाकार विचारत होते. अकादमीत कुणीच जाऊ नये, तिथे कुणी काही पाहूदेखील नये, अशी व्यवस्था सरकारने केली होती. त्यामुळे टीकेचा सूर वाढला होता. स्मार्ट सिटी करण्याच्या नावाखाली सरकारने पणजीची पूर्ण वाट लावून ठेवल्याने लोकांत असंतोष होताच त्यात पुन्हा कला अकादमीचे सरकार काय बरे वाटोळे करून ठेवू पाहतेय, अशी शंका जनतेच्या मनात डोकावत होती. विरोधी आमदारांनी याच जनभावनेला अधिक धार देत राजकीय संधीचे सोने केले. वाद वाढवला.

मात्र, आता समाधान वाटतेय की, कला अकादमीचे दरवाजे आम जनतेसाठी व कलाकारांसाठी आजपासून खुले होत आहेत. लोकमतने काल कला अकादमीच्या नाट्यगृहाच्या आतील भागातील छायाचित्रे प्रसिद्ध केली. डोळ्यांचे पारणे फेडणारे ते चित्र आहे. अकादमीचा ब्लॅक बॉक्सदेखील पूर्वीसारखा सुंदर झाला आहे. अकादमीला आता पुन्हा लवकर गळती लागू नये किंवा पुन्हा लवकर दुरुस्ती करावी लागू नये. पर्रीकर सरकारनेही २३ कोटी रुपये खर्चून अकादमीची दुरुस्ती करून घेतली होती. आता चाळीस-पन्नास कोटी रुपये खर्चून केलेले काम जर टिकावू असेल तर लोक सावंत सरकारचे व विशेषतः मंत्री गावडे यांचेही पुढील अनेक वर्षे कौतुकच करतील. शाहजहान जिंकला हे मग मान्य करावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवा