शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 20:40 IST

गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्याही वादात नाहीत तसेच येथील लोकही शांत आणि संयमी आहेत,

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्याही वादात नाहीत तसेच येथील लोकही शांत आणि संयमी आहेत, त्यामुळे गोव्यात आपण शांततेत आणि चांगल्या प्रकारे कार्यकाळ पूर्ण करू शकेन, असा विश्वास नवे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.  ते म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये अनेक प्रश्न, समस्या होत्या. त्या यशस्वीपणे हाताळल्या. गोवा हा शांत प्रदेश आहे येथील मुख्यमंत्रीही वादग्रस्त नाहीत. ते कमी बोलतात, परंतु गोव्याने जगभरात नाव कमावले आहे. येथे काम करणे मला फार आवडेल.’

सत्यपाल मलिक यांना राजभवनवर आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती राजेश पाटणेकर, मंत्री मिलिंद नाईक, विश्वजित राणे, गोविंद गावडे, दीपक पाऊसकर, मायकल लोबो,  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, आमदार एलिना साल्ढाना, महापौर उदय मडकईकर उपस्थित होते. गोवा फॉरवर्डच्या तिन्ही आमदारांनी मात्र बहिष्कार घातला. तसेच कामत वळगता काँग्रेसचे अन्य आमदार फिरकले नाहीत. 

मलिक हे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल होते. तेथून त्यांना गोव्यात राज्यपालपदी पाठवले आहे. मलिक हे १९६५ साली राजकारणात आले. लोहियांच्या समाजवादी तत्त्वांचा प्रभाव त्यांच्यावर आहे.  केंद्रात १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या सरकारात ते पर्यटनमंत्री होते. २00४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २0१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल होते तसेच ओडिशाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे होता. २३ ऑगस्ट २0१८ रोजी त्यांनी जम्मू व काश्मिरच्या राज्यपालपदाची सूत्रे त्यांनी घेतली होती आता ते गोव्याच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणार आहेत.