शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 20:40 IST

गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्याही वादात नाहीत तसेच येथील लोकही शांत आणि संयमी आहेत,

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्याही वादात नाहीत तसेच येथील लोकही शांत आणि संयमी आहेत, त्यामुळे गोव्यात आपण शांततेत आणि चांगल्या प्रकारे कार्यकाळ पूर्ण करू शकेन, असा विश्वास नवे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.  ते म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये अनेक प्रश्न, समस्या होत्या. त्या यशस्वीपणे हाताळल्या. गोवा हा शांत प्रदेश आहे येथील मुख्यमंत्रीही वादग्रस्त नाहीत. ते कमी बोलतात, परंतु गोव्याने जगभरात नाव कमावले आहे. येथे काम करणे मला फार आवडेल.’

सत्यपाल मलिक यांना राजभवनवर आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती राजेश पाटणेकर, मंत्री मिलिंद नाईक, विश्वजित राणे, गोविंद गावडे, दीपक पाऊसकर, मायकल लोबो,  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, आमदार एलिना साल्ढाना, महापौर उदय मडकईकर उपस्थित होते. गोवा फॉरवर्डच्या तिन्ही आमदारांनी मात्र बहिष्कार घातला. तसेच कामत वळगता काँग्रेसचे अन्य आमदार फिरकले नाहीत. 

मलिक हे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल होते. तेथून त्यांना गोव्यात राज्यपालपदी पाठवले आहे. मलिक हे १९६५ साली राजकारणात आले. लोहियांच्या समाजवादी तत्त्वांचा प्रभाव त्यांच्यावर आहे.  केंद्रात १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या सरकारात ते पर्यटनमंत्री होते. २00४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २0१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल होते तसेच ओडिशाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे होता. २३ ऑगस्ट २0१८ रोजी त्यांनी जम्मू व काश्मिरच्या राज्यपालपदाची सूत्रे त्यांनी घेतली होती आता ते गोव्याच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणार आहेत.