शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 20:40 IST

गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्याही वादात नाहीत तसेच येथील लोकही शांत आणि संयमी आहेत,

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्याही वादात नाहीत तसेच येथील लोकही शांत आणि संयमी आहेत, त्यामुळे गोव्यात आपण शांततेत आणि चांगल्या प्रकारे कार्यकाळ पूर्ण करू शकेन, असा विश्वास नवे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.  ते म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये अनेक प्रश्न, समस्या होत्या. त्या यशस्वीपणे हाताळल्या. गोवा हा शांत प्रदेश आहे येथील मुख्यमंत्रीही वादग्रस्त नाहीत. ते कमी बोलतात, परंतु गोव्याने जगभरात नाव कमावले आहे. येथे काम करणे मला फार आवडेल.’

सत्यपाल मलिक यांना राजभवनवर आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, सभापती राजेश पाटणेकर, मंत्री मिलिंद नाईक, विश्वजित राणे, गोविंद गावडे, दीपक पाऊसकर, मायकल लोबो,  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, आमदार एलिना साल्ढाना, महापौर उदय मडकईकर उपस्थित होते. गोवा फॉरवर्डच्या तिन्ही आमदारांनी मात्र बहिष्कार घातला. तसेच कामत वळगता काँग्रेसचे अन्य आमदार फिरकले नाहीत. 

मलिक हे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल होते. तेथून त्यांना गोव्यात राज्यपालपदी पाठवले आहे. मलिक हे १९६५ साली राजकारणात आले. लोहियांच्या समाजवादी तत्त्वांचा प्रभाव त्यांच्यावर आहे.  केंद्रात १९८९ मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या सरकारात ते पर्यटनमंत्री होते. २00४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २0१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल होते तसेच ओडिशाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा त्यांच्याकडे होता. २३ ऑगस्ट २0१८ रोजी त्यांनी जम्मू व काश्मिरच्या राज्यपालपदाची सूत्रे त्यांनी घेतली होती आता ते गोव्याच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणार आहेत.