शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

नवे सरकार मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडणार

By admin | Updated: February 25, 2017 01:56 IST

पणजी : येत्या महिन्यात मार्चमध्ये नवे सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी

पणजी : येत्या महिन्यात मार्चमध्ये नवे सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. अर्थसंकल्प तयार करण्यासाठीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.निवडणूक आचारसंहितेचा काळ असला तरी, मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करावाच लागतो व त्यामुळे अर्थसंकल्प तयार करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या ११ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल व १५ रोजी आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर विधानसभा अधिवेशन पार पडेल व अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.गेल्या वर्षी एकूण चौदा हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सरकारने तयार केला होता. या वेळी गेल्या जानेवारीपासून सरकार हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण येत आहे. वेतनासाठी अर्थसंकल्पात अतिरिक्त तरतूद करावी लागेल. यासाठी माहिती, आकडेवारी व अन्य डेटा गोळा करण्याचे काम सध्या अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकारी करत आहेत. कोणत्या क्षेत्रात कर वाढवावे, कोणत्या योजनांचा समावेश करावा, कोणत्या खात्यासाठी अधिक निधीची तरतूद करावी याबाबतचे निर्णय आता होणार नाहीत. दि. ११ मार्चनंतर जे नवे सरकार अधिकारावर येईल ते सरकार अर्थसंकल्पाला अंतिम रूप देईल. त्या वेळीच सगळे काही ठरेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नव्या लोकनियुक्त सरकारचे जे धोरण असेल त्या धोरणानुसार अर्थसंकल्पातील सगळ्या तरतुदी असतील, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.पार्सेकर यांनी या प्रतिनिधीस सांगितले की, सध्या वरिष्ठ अधिकारी वर्ग अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त आहे. सध्या काही विधानसभेचे अधिवेशन नाही. मार्चमध्ये अधिवेशन होईल. तत्पूर्वी अर्थसंकल्प तयार होईल. (खास प्रतिनिधी)