शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

नवे सरकार मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडणार

By admin | Updated: February 25, 2017 01:56 IST

पणजी : येत्या महिन्यात मार्चमध्ये नवे सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी

पणजी : येत्या महिन्यात मार्चमध्ये नवे सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. अर्थसंकल्प तयार करण्यासाठीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.निवडणूक आचारसंहितेचा काळ असला तरी, मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करावाच लागतो व त्यामुळे अर्थसंकल्प तयार करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या ११ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल व १५ रोजी आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर विधानसभा अधिवेशन पार पडेल व अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.गेल्या वर्षी एकूण चौदा हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सरकारने तयार केला होता. या वेळी गेल्या जानेवारीपासून सरकार हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण येत आहे. वेतनासाठी अर्थसंकल्पात अतिरिक्त तरतूद करावी लागेल. यासाठी माहिती, आकडेवारी व अन्य डेटा गोळा करण्याचे काम सध्या अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकारी करत आहेत. कोणत्या क्षेत्रात कर वाढवावे, कोणत्या योजनांचा समावेश करावा, कोणत्या खात्यासाठी अधिक निधीची तरतूद करावी याबाबतचे निर्णय आता होणार नाहीत. दि. ११ मार्चनंतर जे नवे सरकार अधिकारावर येईल ते सरकार अर्थसंकल्पाला अंतिम रूप देईल. त्या वेळीच सगळे काही ठरेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नव्या लोकनियुक्त सरकारचे जे धोरण असेल त्या धोरणानुसार अर्थसंकल्पातील सगळ्या तरतुदी असतील, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.पार्सेकर यांनी या प्रतिनिधीस सांगितले की, सध्या वरिष्ठ अधिकारी वर्ग अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त आहे. सध्या काही विधानसभेचे अधिवेशन नाही. मार्चमध्ये अधिवेशन होईल. तत्पूर्वी अर्थसंकल्प तयार होईल. (खास प्रतिनिधी)