शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नवे सरकार मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडणार

By admin | Updated: February 25, 2017 01:56 IST

पणजी : येत्या महिन्यात मार्चमध्ये नवे सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी

पणजी : येत्या महिन्यात मार्चमध्ये नवे सरकार राज्याचा अर्थसंकल्प सादर करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. अर्थसंकल्प तयार करण्यासाठीची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.निवडणूक आचारसंहितेचा काळ असला तरी, मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करावाच लागतो व त्यामुळे अर्थसंकल्प तयार करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या ११ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल व १५ रोजी आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यानंतर विधानसभा अधिवेशन पार पडेल व अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.गेल्या वर्षी एकूण चौदा हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सरकारने तयार केला होता. या वेळी गेल्या जानेवारीपासून सरकार हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण येत आहे. वेतनासाठी अर्थसंकल्पात अतिरिक्त तरतूद करावी लागेल. यासाठी माहिती, आकडेवारी व अन्य डेटा गोळा करण्याचे काम सध्या अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकारी करत आहेत. कोणत्या क्षेत्रात कर वाढवावे, कोणत्या योजनांचा समावेश करावा, कोणत्या खात्यासाठी अधिक निधीची तरतूद करावी याबाबतचे निर्णय आता होणार नाहीत. दि. ११ मार्चनंतर जे नवे सरकार अधिकारावर येईल ते सरकार अर्थसंकल्पाला अंतिम रूप देईल. त्या वेळीच सगळे काही ठरेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नव्या लोकनियुक्त सरकारचे जे धोरण असेल त्या धोरणानुसार अर्थसंकल्पातील सगळ्या तरतुदी असतील, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.पार्सेकर यांनी या प्रतिनिधीस सांगितले की, सध्या वरिष्ठ अधिकारी वर्ग अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त आहे. सध्या काही विधानसभेचे अधिवेशन नाही. मार्चमध्ये अधिवेशन होईल. तत्पूर्वी अर्थसंकल्प तयार होईल. (खास प्रतिनिधी)