शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष पूर्णवेळ काम करणाराच असावा -  तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 13:27 IST

- सदगुरू पाटील पणजी : भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष हा पूर्णवेळ पक्षाचे काम करू शकेल असाच असावा असे मत मावळते ...

- सदगुरू पाटील

पणजी : भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष हा पूर्णवेळ पक्षाचे काम करू शकेल असाच असावा असे मत मावळते प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी व्यक्त केले. आपण सात वर्षे भाजपाचे चिकाटीने काम केले व त्याबाबत आपण आनंदी व समाधानी आहोत. आम्ही जर भाजपाची आमदार संख्या तेराच ठेवली असती तर आमचे गोव्यातील सरकार कधीच कोसळले असते, असेही तेंडुलकर यांनी लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीवेळी नमूद केले.

प्रश्न : भाजपाला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, तो कसा असावा असे वाटते?उत्तर : नव्या प्रदेशाध्यक्षाने पक्षासाठी पूर्णवेळ काम करायला हवे. मी स्वत: गेली सात वर्षे माझा सगळा वेळ गोव्यात भाजपासाठीच दिला. भाजपाची वाढ व्हावी म्हणून मी वावरलो. मी कुटूंबाकडे व माझ्या व्यवसायाकडेही लक्ष दिले नाही. सगळीकडे पाठ फिरवून फक्त पक्षाचेच काम केले. नवा प्रदेशाध्यक्षही पक्षासाठी झोकून देऊन रात्रंदिवस काम करणारा असायला हवा. मग तो कुणीही असो.

प्रश्न : तुमची सात वर्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची कारकीर्द संपत असताना तुम्हाला काय वाटते?उत्तर : मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष नव्हतो तेव्हा मी भाजपाचा सदस्य नोंदणी प्रमुख झालो होतो. माझ्या नेतृत्वाखाली तेव्हा गोव्यात प्रथमच 4 लाख 19 हजार सदस्य नोंदविले गेले. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही सदस्य नोंदणीचा वेग कायम राहिला. मी त्यामुळे समाधानी आहे. आता भाजपाकडे गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायती आहेत. शिवाय सर्वात जास्त ग्रामपंचायती, पालिका आहेत. भाजपाची व्याप्ती व संघटनात्मक बळ माझ्या कारकिर्दीत वाढतच गेले याचा आनंद वाटतो. मला दोन टर्म मिळाले. माझ्या जागी पर्यायी नियुक्ती होईपर्यंत मलाच प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचे काम करता आले याविषयीही मी आनंदी आहे.

प्रश्न : तुम्ही भाजपामध्ये काही काँग्रेस व मगोपचे आमदार आणल्याबाबत काही कार्यकर्ते कुरबुरीही करतात. त्याविषयी तुम्ही काय म्हणाल?उत्तर : मी भाजपाचे काम करत असताना कोणतीच गोष्ट पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना न विचारता केली नाही. प्रत्येक मोठे पाऊल उचलण्यापूर्वी मी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची अगोदर परवानगी घेतली. 2017 च्या निवडणुकीत आमचे तेराच उमेदवार निवडून आले होते. समजा आम्ही अन्य पक्षांतील आमदारांना भाजपामध्ये प्रवेश दिला नसता व आमची आमदार संख्या तेराच ठेवली असती तर भाजपाची सत्ता कधीच गेली असती. मग सगळेच कार्यकर्ते कुरबुरी करत बसले असते. देशभर भाजपाने विविध पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिला आहे. त्यातून पक्ष बळकट होण्यास मदत झाली. गोव्यातही पक्षाचा पाया वाढला. काहीही असो पण आमच्याकडे आज 27 आमदार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये राग लोभ व कुरबुरी असतातच पण सरकार टीकण्यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतात.

प्रश्न : तुम्ही प्रदेशाध्यक्षपदी नसताना यापुढे काय कराल?उत्तर : मी पक्षाचे काम निष्ठेने करत राहीन. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडीन. मला पक्षाने राज्यसभा खासदारपद दिले. मी सामान्य कुटुंबातून आलो व राज्यसभेवर पोहोचलो. माझ्या कामाची पावती पक्षाने मला कायम दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी केलेल्या कामगिरीवेळी मला मनोहर पर्रिकर व श्रीपाद नाईक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझ्या यशात त्या दोघांचा व संघटन मंत्री सतिश धोंड यांचा वाटा आहे. या तिघांनाही मी श्रेय देतो.

टॅग्स :goaगोवा