शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नेत्रावळीची झोळी रिकामीच...

By admin | Updated: June 25, 2015 01:06 IST

सरकारने मोठा गाजावाजा करून सांगे तालुक्यातील नेत्रावळी गाव सर्वंकष विकासासाठी दत्तक घेतला. शेतकऱ्यांना हरित, धवल क्रांतीची स्वप्ने दाखवली; परंतु सर्व कामे

सरकारने मोठा गाजावाजा करून सांगे तालुक्यातील नेत्रावळी गाव सर्वंकष विकासासाठी दत्तक घेतला. शेतकऱ्यांना हरित, धवल क्रांतीची स्वप्ने दाखवली; परंतु सर्व कामे लालफितीत अडकल्याने स्थानिकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. सरकारवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र, त्यांची बिलेही फेडलेली नाहीत. दहा कोटी रुपयांची तरतूद असताना अवघे १0 ते १५ लाख रुपये खर्च करून उर्वरित निधी विनावापर ठेवला आहे.सरकारच्या या अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. २0१२-१३ च्या अर्थसंकल्पात पर्रीकर सरकारने नेत्रावळीच्या सर्वांगीण विकासासाठी वरील निधीची तरतूद केली. नियोजन व सांख्यिकी खात्याने सुरुवातीला नेटाने काम हाती घेतले. कृषी तसेच दूध उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले. ५४0 महिलांचा समावेश असलेले २४ महिला स्वयंसाहाय्य गट स्थापन करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी कृषी संशोधन केंद्राच्या एला फार्मची मदत घेण्यात आली. गावात कोणकोणत्या प्रकारची पिके घेता येतील याचा अभ्यास करण्यासाठी मातीचे १२00 नमुने घेण्यात आले. सुमारे १ लाख चौरस मीटर जमिनीत पशुचारा उगविण्यात आला. शेतकऱ्यांनी दुभती जनावरे खरेदी करून गावातील दूध उत्पादन दिवशी १५00 लिटरवरून ३000 लिटर इतके दुपटीने वाढविले; परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे सहा महिन्यांतच या सर्व गोष्टींवर पाणी फिरले. आज गावातील दूध उत्पादनही घटले असून शेतकरीही नाखुश आहेत. सरकारच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने गुंतवणूक केली. सुमारे १ कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. पशुचारा खरेदी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; परंतु ते पाळले नाही. शेतकऱ्यांची बिले सादर होऊनही गेली दोन वर्षे त्यांच्या हातात पैदेखील मिळालेली नाही. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिले अडविली आणि एकूणच सर्व व्यवहार लालफितीत अडकल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला असून शेतकऱ्यांची स्वप्नेही धुळीस मिळाली आहेत. या सर्वावर कहर म्हणजे सरकारने ही योजना नियोजन सांख्यिकी खात्याकडून काढून घेऊन कृषी खात्याकडे सोपविली. कृषी खाते या योजनेला मुळीच न्याय देऊ शकलेले नाही.