शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

देशातील तंबाखू नियंत्रण कायदे मजबूत करण्याची गरज - डॉ शेखर साळकर

By समीर नाईक | Updated: February 4, 2024 15:51 IST

तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक म्हणून भारताचा क्रमांक लागतो, तंबाखू उत्पादनांची विस्तृत श्रेणी देशभरात परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे.

पणजी: तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग, श्वसनाचे आजार, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारख्या विविध जुनाट आजारांचा मोठा धोका असतो. हे भारतातील मृत्यू आणि विकृतीचे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे १.३५ दशलक्ष मृत्यू होतात. या अनुषंगाने देशातील तंबाखू नियंत्रण कायदे मजबूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संस्थाचे (नोट), अध्यक्ष तथा प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शेखर साळकर यांनी केले.

तंबाखूचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक म्हणून भारताचा क्रमांक लागतो, तंबाखू उत्पादनांची विस्तृत श्रेणी देशभरात परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. भारतातील कर्करोगाच्या वाढत्या घटना ही एक लक्षणीय चिंतेची बाब आहे, कारण यामुळे केवळ मोठ्या संख्येने अकाली मृत्यू होत नाहीत तर जीवनाच्या एकूण गुणवत्तेवरही परिणाम होतो. कर्करोग मानवी शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो, तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगामुळे भारतात सर्वाधिक जीव गमावले जातात, त्यानंतर फुफ्फुस, अन्ननलिका आणि पोटाचा कर्करोग होतो, असे डॉ. साळकर यांनी सांगितले. 

सर्व कर्करोगांपैकी जवळपास ५० टक्के कर्करोग तंबाखूच्या सेवनामुळे होतात. शारीरिक त्रासाच्या पलीकडे, कर्करोग भावनिक आणि आर्थिक नुकसानही करत असतो, ज्यामुळे प्रभावित कुटुंबांना अनेकदा गरिबीत ढकलले जाते. ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया (२०१६-१७) नुसार, भारतातील अंदाजे २६७ दशलक्ष प्रौढ (वय १५ आणि त्याहून अधिक वयाचे), ज्यात प्रौढ लोकसंख्येच्या २९ टक्के आहेत, तंबाखूचा वापर करतात. त्यामुळे तंबाखू नियंत्रण कायदा बळकट करून या आजाराशी लढण्याची वेळ आली आहे, असेही डॉ. साळकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

टॅग्स :goaगोवा