शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

गोव्यात सार्वजनिक स्मशानभूमी उभारणे गरजेचे, दलित पुरस्कार वितरण सोहळ्यात अ‍ॅड. खलप यांचं प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 23:03 IST

सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते.

पणजी : सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते. त्यामुळे सरकारने राज्यभर सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीची उभारणी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले.मिनेडिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात सोमवारी दलित संघटनेतर्फे दलित मित्र पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना अ‍ॅड. खलप दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर समाजसेवेत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल विठ्ठल बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार परेश प्रभू, माजी सभापती शंभुभाऊ बांदेकर यांची उपस्थिती होती.अ‍ॅड. खलप म्हणाले की, राज्य सरकारने कोमुनिदादच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारावी. माणूस म्हणून धर्माचा अभिमान बाळगतो आणि दुस-या बाजूला याच धर्माच्या व्यंगांना कवटाळून बसतो आहोत. जातीची थोरवी किती मिरवायची, ख-या अर्थाने उन्नती साधायची असेल, तर ती जीर्णवस्त्रे झटकली पाहिजेत. कुशल बुद्धीच्या सामर्थ्यावर समाजात अत्युच्च शिखरावर असलेल्या म. गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांना जातीच्या नावाखाली खाली खेचण्याचा प्रयत्न होत असून, तो चुकीचा आहे.माणसाचा शारीरिक विकास झाला असला, तरी मनाचा झालेला नाही. देशातील जनतेत जातीयतेचा कचरा शिरला आहे, तो साफ करण्यासाठी महात्मा गांधींना आणखी कितीवेळा जन्म घ्यावा लागेल, असा प्रश्नही अ‍ॅड. खलप यांनी उपस्थित केला.