शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

गोव्यात सार्वजनिक स्मशानभूमी उभारणे गरजेचे, दलित पुरस्कार वितरण सोहळ्यात अ‍ॅड. खलप यांचं प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 23:03 IST

सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते.

पणजी : सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते. त्यामुळे सरकारने राज्यभर सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीची उभारणी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले.मिनेडिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात सोमवारी दलित संघटनेतर्फे दलित मित्र पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना अ‍ॅड. खलप दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर समाजसेवेत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल विठ्ठल बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार परेश प्रभू, माजी सभापती शंभुभाऊ बांदेकर यांची उपस्थिती होती.अ‍ॅड. खलप म्हणाले की, राज्य सरकारने कोमुनिदादच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारावी. माणूस म्हणून धर्माचा अभिमान बाळगतो आणि दुस-या बाजूला याच धर्माच्या व्यंगांना कवटाळून बसतो आहोत. जातीची थोरवी किती मिरवायची, ख-या अर्थाने उन्नती साधायची असेल, तर ती जीर्णवस्त्रे झटकली पाहिजेत. कुशल बुद्धीच्या सामर्थ्यावर समाजात अत्युच्च शिखरावर असलेल्या म. गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांना जातीच्या नावाखाली खाली खेचण्याचा प्रयत्न होत असून, तो चुकीचा आहे.माणसाचा शारीरिक विकास झाला असला, तरी मनाचा झालेला नाही. देशातील जनतेत जातीयतेचा कचरा शिरला आहे, तो साफ करण्यासाठी महात्मा गांधींना आणखी कितीवेळा जन्म घ्यावा लागेल, असा प्रश्नही अ‍ॅड. खलप यांनी उपस्थित केला.