शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

गोव्यात सार्वजनिक स्मशानभूमी उभारणे गरजेचे, दलित पुरस्कार वितरण सोहळ्यात अ‍ॅड. खलप यांचं प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 23:03 IST

सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते.

पणजी : सर्वधर्मीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमी हवी, असे सरकारला कधी वाटलेच नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहांची हेळसांड होते. त्यामुळे सरकारने राज्यभर सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीची उभारणी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले.मिनेडिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात सोमवारी दलित संघटनेतर्फे दलित मित्र पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना अ‍ॅड. खलप दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर समाजसेवेत महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल विठ्ठल बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार परेश प्रभू, माजी सभापती शंभुभाऊ बांदेकर यांची उपस्थिती होती.अ‍ॅड. खलप म्हणाले की, राज्य सरकारने कोमुनिदादच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात आणि सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारावी. माणूस म्हणून धर्माचा अभिमान बाळगतो आणि दुस-या बाजूला याच धर्माच्या व्यंगांना कवटाळून बसतो आहोत. जातीची थोरवी किती मिरवायची, ख-या अर्थाने उन्नती साधायची असेल, तर ती जीर्णवस्त्रे झटकली पाहिजेत. कुशल बुद्धीच्या सामर्थ्यावर समाजात अत्युच्च शिखरावर असलेल्या म. गांधी, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांना जातीच्या नावाखाली खाली खेचण्याचा प्रयत्न होत असून, तो चुकीचा आहे.माणसाचा शारीरिक विकास झाला असला, तरी मनाचा झालेला नाही. देशातील जनतेत जातीयतेचा कचरा शिरला आहे, तो साफ करण्यासाठी महात्मा गांधींना आणखी कितीवेळा जन्म घ्यावा लागेल, असा प्रश्नही अ‍ॅड. खलप यांनी उपस्थित केला.