शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विशेष मुलांच्या स्वावलंबनासाठी योजनांची गरज

By admin | Updated: September 27, 2015 02:55 IST

पणजी : राज्यात खास मुलांची काळजी घेणाऱ्या, त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

पणजी : राज्यात खास मुलांची काळजी घेणाऱ्या, त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मात्र, या संस्थांना आवश्यक तेवढ्या सोयीसुविधा आणि प्रशस्त जागा उपलब्ध नसल्यामुळे खास मुलांच्या विकासात हातभार लावणे शक्य होत नाही. खास मुलांच्या पालकांचे निधन झाल्यानंतर ते आर्थिक स्वावलंबी बनावे यासाठी उपाययोजना करण्याची गरज असून रोटरी क्लब आॅफ पणजी यांनी आयोजित केलेल्या उपक्रमांचे लोकांकडून कौतुक होत आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विदेश नाडकर्णी यांनी सांगितले. राज्यातील विविध प्राथमिक पातळीवर शिक्षण घेणाऱ्या खास मुलांना सुसज्य सोयीसुविधांनी योग्य आणि मुलांना पूरक असे वातावरण असलेली शाळा उभारण्याचा संकल्प क्लबने केला आहे. ‘हॅपी स्कूल’ या उपक्रमांतर्गत खास मुलांसाठी विशेषता मुलींना सोयीसुविधाअभावी शाळा सोडावी लागू नये म्हणून सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्यात येईल. यात खास मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या विविध संस्थांना, शाळांना सहभागी करून घेतले जाणार. या उपक्रमांस आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून दि. ११ आॅक्टोबर रोजी रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत ७0 टक्के प्रवेश नोंदणी झाली आहे. कार्यक्रम डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यात ज्येष्ठ पत्रकार गौरव सावंत उपस्थित असतील. कार्यक्रमात चर्चेसमवेत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. तर सुमित आनंद यांच्या विनोदाचा कार्यक्रम होणार आहे. विदेश नाडकर्णी म्हणाले, क्लबने २0१४-१५ साली एक सर्वेक्षण करून खास मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याची माहिती गोळा केली होती. यात प्रामुख्याने पालकांचे छत्र हरवलेल्या खास मुलांना जगणे त्रासदायक होते याची जाणीव झाली. त्यामुळे क्लबने अशा मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी राज्यात दोन व्यावसायिक केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. एक केंद्र दक्षिण गोव्यातील खास मुलांसाठी उभारण्यात येणार आहे. तर दुसरे उत्तर गोव्यातील खास मुलांसाठी असणार आहे. खास मुलांना त्यांचे कौशल्य हेरून त्या प्रकारचे काम करण्याची संधी या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात दिले जाईल. यासाठी खास प्रशिक्षक आणि मार्केटिंगबाबतची काळजीही घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)