शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रोइंग क्रिडा प्रकार व्हावा यासाठी सरकारच्या मदतीला शेतकरी पुढे सरसावले

By समीर नाईक | Updated: October 27, 2023 16:14 IST

ओहटी भरतीचा परिणाम नदीच्या पाण्यावर होत नाही, त्यामुळे तेथे जमवून घेता येते.

पणजी : विजेत्याच्या शोधासाठी गावातच जावे लागते, अशी जुनी म्हण आहे. गोव्यात आयोजित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत रोइंग स्पर्धेसाठी राज्याच्या राजधानीपासून २० किलोमीटर अंतरावरील शापोरा नदीकडे धाव घ्यावी लागली. गोव्यात अनेक ठिकाणी जलसाठे असले तरी, या किनारी राज्यात अद्याप रोइंगने मूळ धरलेले नाही आणि त्यामुळे पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या नाहीत.

आयोजकांना याची पूर्ण कल्पना होती की रोइंग स्पर्धेसाठी जागा निवडणे आव्हानात्मक आहे, कारण यासाठी स्थिर पाण्याची गरज असते आणि अंतरही दोन किंवा अधिक किलोमीटर असावे लागते. या सर्व आवश्यक बाबी एकाच ठिकाणी कुठे असतील याचा शोध घेण्यात बराच वेळ गेला आणि अखेर त्यांना योग्य जागा सापडली खरी पण तेथे पायाभूत सुविधा उभारणे ही समस्या निर्माण झाली, कारण नदीभोवती मोकळी जागा उपलब्ध नव्हती. अशा वेळी स्थानिक शेतकरी आयोजकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आणि मळणीचा हंगाम असूनही शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली.

निवडलेले ठिकाण योग्यच आहे. ओहटी भरतीचा परिणाम नदीच्या पाण्यावर होत नाही, त्यामुळे तेथे जमवून घेता येते. खरी समस्या होती ती म्हणजे नौका कुठे ठेवायच्या आणि तांत्रिक सुविधांसाठी कुठली जागा घ्यायची. ही अडचण निर्माण झाली कारण भोवतालच्या जागेत खाजगी शेती होती, असे स्पर्धेचे संचालक ईस्मायल बेग यांनी सांगितले. 

१२ दिवसांपूर्वी आपण आलो त्यावेळी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सर्वत्र हरित जागा आणि नारळाची झाडे डुलताना दिलत होती, असे वर्णन त्यांनी केले. केवळ १२ दिवसांत सर्व तयारी पूर्ण करायची असल्याने पीक घेत असलेल्या शेतकऱ्यांकडून जागा मिळवण्यासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक होते, कारण त्यावेळी कापणी व मळणी झालेली नव्हती. मात्र त्याच दोन दिवसांत २३ शेतकऱ्यांनी आपली ३० हजार चौरस मीटर जागा आयोजकांच्या स्वाधीन केल्याने आणि सुमारे ५ हजार चौरस मीटरवरील झाडाझुडपे साफ करून रस्ता करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. 

प्रत्येक नवा स्थळावर नवे आव्हान उभे राहते. पण गेल्या दहा दिवसांत ही जागा सपाट करून, तात्पुरती पायाभूत सुविधा उभारताना शेतजमिनीची कोणतीही हानी होणार नाही आणि भविष्यात पीक घेताना कोणताही अडचण येणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे, असे बेग म्हणाले. 

काही शेतकऱ्यांनी मागणी केली नसली तरी सरकारने सर्व शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे. गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी शेतकऱ्यांची प्रशंसा केली आहे. शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यामुळे हे खेळ गोमंतकीयांसाठी किती महत्त्वाचे आहेत, याचा प्रत्यय येतो असे क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :goaगोवा