शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रोइंग क्रिडा प्रकार व्हावा यासाठी सरकारच्या मदतीला शेतकरी पुढे सरसावले

By समीर नाईक | Updated: October 27, 2023 16:14 IST

ओहटी भरतीचा परिणाम नदीच्या पाण्यावर होत नाही, त्यामुळे तेथे जमवून घेता येते.

पणजी : विजेत्याच्या शोधासाठी गावातच जावे लागते, अशी जुनी म्हण आहे. गोव्यात आयोजित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत रोइंग स्पर्धेसाठी राज्याच्या राजधानीपासून २० किलोमीटर अंतरावरील शापोरा नदीकडे धाव घ्यावी लागली. गोव्यात अनेक ठिकाणी जलसाठे असले तरी, या किनारी राज्यात अद्याप रोइंगने मूळ धरलेले नाही आणि त्यामुळे पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या नाहीत.

आयोजकांना याची पूर्ण कल्पना होती की रोइंग स्पर्धेसाठी जागा निवडणे आव्हानात्मक आहे, कारण यासाठी स्थिर पाण्याची गरज असते आणि अंतरही दोन किंवा अधिक किलोमीटर असावे लागते. या सर्व आवश्यक बाबी एकाच ठिकाणी कुठे असतील याचा शोध घेण्यात बराच वेळ गेला आणि अखेर त्यांना योग्य जागा सापडली खरी पण तेथे पायाभूत सुविधा उभारणे ही समस्या निर्माण झाली, कारण नदीभोवती मोकळी जागा उपलब्ध नव्हती. अशा वेळी स्थानिक शेतकरी आयोजकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आणि मळणीचा हंगाम असूनही शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली.

निवडलेले ठिकाण योग्यच आहे. ओहटी भरतीचा परिणाम नदीच्या पाण्यावर होत नाही, त्यामुळे तेथे जमवून घेता येते. खरी समस्या होती ती म्हणजे नौका कुठे ठेवायच्या आणि तांत्रिक सुविधांसाठी कुठली जागा घ्यायची. ही अडचण निर्माण झाली कारण भोवतालच्या जागेत खाजगी शेती होती, असे स्पर्धेचे संचालक ईस्मायल बेग यांनी सांगितले. 

१२ दिवसांपूर्वी आपण आलो त्यावेळी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सर्वत्र हरित जागा आणि नारळाची झाडे डुलताना दिलत होती, असे वर्णन त्यांनी केले. केवळ १२ दिवसांत सर्व तयारी पूर्ण करायची असल्याने पीक घेत असलेल्या शेतकऱ्यांकडून जागा मिळवण्यासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक होते, कारण त्यावेळी कापणी व मळणी झालेली नव्हती. मात्र त्याच दोन दिवसांत २३ शेतकऱ्यांनी आपली ३० हजार चौरस मीटर जागा आयोजकांच्या स्वाधीन केल्याने आणि सुमारे ५ हजार चौरस मीटरवरील झाडाझुडपे साफ करून रस्ता करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. 

प्रत्येक नवा स्थळावर नवे आव्हान उभे राहते. पण गेल्या दहा दिवसांत ही जागा सपाट करून, तात्पुरती पायाभूत सुविधा उभारताना शेतजमिनीची कोणतीही हानी होणार नाही आणि भविष्यात पीक घेताना कोणताही अडचण येणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे, असे बेग म्हणाले. 

काही शेतकऱ्यांनी मागणी केली नसली तरी सरकारने सर्व शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे. गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी शेतकऱ्यांची प्रशंसा केली आहे. शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यामुळे हे खेळ गोमंतकीयांसाठी किती महत्त्वाचे आहेत, याचा प्रत्यय येतो असे क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :goaगोवा