शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रोइंग क्रिडा प्रकार व्हावा यासाठी सरकारच्या मदतीला शेतकरी पुढे सरसावले

By समीर नाईक | Updated: October 27, 2023 16:14 IST

ओहटी भरतीचा परिणाम नदीच्या पाण्यावर होत नाही, त्यामुळे तेथे जमवून घेता येते.

पणजी : विजेत्याच्या शोधासाठी गावातच जावे लागते, अशी जुनी म्हण आहे. गोव्यात आयोजित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत रोइंग स्पर्धेसाठी राज्याच्या राजधानीपासून २० किलोमीटर अंतरावरील शापोरा नदीकडे धाव घ्यावी लागली. गोव्यात अनेक ठिकाणी जलसाठे असले तरी, या किनारी राज्यात अद्याप रोइंगने मूळ धरलेले नाही आणि त्यामुळे पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या नाहीत.

आयोजकांना याची पूर्ण कल्पना होती की रोइंग स्पर्धेसाठी जागा निवडणे आव्हानात्मक आहे, कारण यासाठी स्थिर पाण्याची गरज असते आणि अंतरही दोन किंवा अधिक किलोमीटर असावे लागते. या सर्व आवश्यक बाबी एकाच ठिकाणी कुठे असतील याचा शोध घेण्यात बराच वेळ गेला आणि अखेर त्यांना योग्य जागा सापडली खरी पण तेथे पायाभूत सुविधा उभारणे ही समस्या निर्माण झाली, कारण नदीभोवती मोकळी जागा उपलब्ध नव्हती. अशा वेळी स्थानिक शेतकरी आयोजकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आणि मळणीचा हंगाम असूनही शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली.

निवडलेले ठिकाण योग्यच आहे. ओहटी भरतीचा परिणाम नदीच्या पाण्यावर होत नाही, त्यामुळे तेथे जमवून घेता येते. खरी समस्या होती ती म्हणजे नौका कुठे ठेवायच्या आणि तांत्रिक सुविधांसाठी कुठली जागा घ्यायची. ही अडचण निर्माण झाली कारण भोवतालच्या जागेत खाजगी शेती होती, असे स्पर्धेचे संचालक ईस्मायल बेग यांनी सांगितले. 

१२ दिवसांपूर्वी आपण आलो त्यावेळी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सर्वत्र हरित जागा आणि नारळाची झाडे डुलताना दिलत होती, असे वर्णन त्यांनी केले. केवळ १२ दिवसांत सर्व तयारी पूर्ण करायची असल्याने पीक घेत असलेल्या शेतकऱ्यांकडून जागा मिळवण्यासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक होते, कारण त्यावेळी कापणी व मळणी झालेली नव्हती. मात्र त्याच दोन दिवसांत २३ शेतकऱ्यांनी आपली ३० हजार चौरस मीटर जागा आयोजकांच्या स्वाधीन केल्याने आणि सुमारे ५ हजार चौरस मीटरवरील झाडाझुडपे साफ करून रस्ता करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. 

प्रत्येक नवा स्थळावर नवे आव्हान उभे राहते. पण गेल्या दहा दिवसांत ही जागा सपाट करून, तात्पुरती पायाभूत सुविधा उभारताना शेतजमिनीची कोणतीही हानी होणार नाही आणि भविष्यात पीक घेताना कोणताही अडचण येणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे, असे बेग म्हणाले. 

काही शेतकऱ्यांनी मागणी केली नसली तरी सरकारने सर्व शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे. गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी शेतकऱ्यांची प्रशंसा केली आहे. शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यामुळे हे खेळ गोमंतकीयांसाठी किती महत्त्वाचे आहेत, याचा प्रत्यय येतो असे क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :goaगोवा