शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

एन. शिवदासही पुरस्कार परत करणार

By admin | Updated: October 12, 2015 02:00 IST

पणजी : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोकणी लेखक एन. शिवदास यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा निर्णय रविवारी

पणजी : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोकणी लेखक एन. शिवदास यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा निर्णय रविवारी (दि.११) जाहीर केला. रामनाथी-फोंडा येथे सनातनविरोधी सभेत त्यांनी असे सुतोवाचही केले होते. देशातील वाढती असहिष्णुता आणि तीव्र हिंदुत्ववादासमोर नरेंद्र मोदी सरकारने टाकलेल्या नांगीच्या निषेधार्थ हा निर्णय घेतल्याचे शिवदास यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गोव्यातील बहुतांश साहित्यिक पुरस्कार परत करण्याचा निर्णय उद्या होणाऱ्या बैठकीत घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास देशातील हे आगळे-वेगळे उदाहरण ठरेल. रामनाथी येथील सभेत देशात आणीबाणीसारखी स्थिती असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते. ‘लोकमत’ला त्यांनी सांगितले की, देशातील सचोटीचे लेखक आजच्या स्थितीत स्वस्थ बसू शकत नाहीत. त्यामुळे मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय कुटुंबीय आणि मित्रमंडळींशी चर्चा करून घेतलेला आहे. सोमवारी (दि.१२) सायं. ४ वाजता हा निर्णय मी जाहीर करेन. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील अन्य साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांशी एन. शिवदास यांनी संपर्क साधला असून, साहित्यिक संयुक्तपणे कृती करण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)