शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कमिशन बंद झाले म्हणून माझी बदनामी; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2024 09:52 IST

काहीजणांचे कमिशन बंद झाले, त्यामुळेच ते हे उद्योग करीत आहेत, अशा शब्दांत सावंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल करून काहीजणांनी आपली अकारण बदनामी चालवली आहे आणि हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे. काहीजणांचे कमिशन बंद झाले, त्यामुळेच ते हे उद्योग करीत आहेत, अशा शब्दांत सावंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले की, "भू बळकाव प्रकरणात मी आरंभलेल्या धडक कारवाईमुळे काहीजणांचे कमिशन बंद झालेले आहे. झुवारी अॅग्रो केमिकल्स कंपनीला दिलेल्या जमिनीचे भूखंड करून विकले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही.' ते म्हणाले की, 'जमीन बळकाव प्रकरणे गेली २० वर्षे मोकाटपणे चालू होती. मीच धडक कारवाई केली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी केली. शिवाय एक सदस्यीय आयोगही नेमला. एकूण ५८ जणांना अटक करण्यात आली, तर ६ सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. १९ मालमत्ता जप्त केल्या. यामुळे काहीजणांचे कमिशन बंद झाले. त्यांचा पोटशूळ उठला असावा. विदेशात स्थायिक झालेल्या लोकांच्या जमिनी मी वाचविल्या. मी हे सर्व चांगले काम करत असताना काहीजणांच्या पोटात दुखते.' 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'झुआरी अॅग्रो केमिकल्स कंपनीकडील जागा भूखंड करून विकली जात असल्याच्या आरोपातही मला विनाकारण गोवले जात आहे. मी जन्माला येण्यापूर्वी या जमिनीचा व्यवहार झालेला आहे. कोमुनिदादची जमीन उद्योगासाठी म्हणून झुआरी कंपनीला देण्यात आली होती. काहीजणांचे कमिशन आता बंद झाले हे लोकांना माहीत आहे. तेच आता अशा प्रकरची माझी बदनामी करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करीत आहेत.'

नोकऱ्यांमध्ये गैरव्यवहार नाही 

मुख्यमंत्री म्हणाले की, 'नोकऱ्यांच्या बाबतीत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. सरकारी खात्यांमध्ये नोकर भरतीत पारदर्शकता यावी म्हणून मीच राज्य कर्मचारी निवडणूक आयोग आणला. विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मी सर्व प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत. राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. नीती आयोगाने घालून दिलेल्या मर्यादितच आमचा वावर आहे. मयदिपेक्षा जास्त कर्ज माझ्या सरकारने घेतलेले नाही.'

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत