शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
4
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
5
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
6
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
7
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
8
Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर
9
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
10
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
11
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
12
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
13
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
14
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
15
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
16
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
17
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
18
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
19
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
20
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनो, श्रीमंत व्हा! भत्ते, लाभांमध्ये घसघशीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 10:42 IST

राज्य एक प्रकारे दुखवटा पाळत असल्यासारखी स्थिती असताना गोवा मंत्रिमंडळ मात्र आमदारांचे भत्ते वाढविण्याचा निर्णय घेते.

ज्या राज्यात मंत्री, आमदार गरीबच राहतात आणि जनता मात्र श्रीमंत होत जाते, त्या राज्याचे काही खरे नसते, असे कदाचित गोव्यातील सरकारला वाटत असावे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष असला तरी, त्याकडे दुर्लक्ष करून सावंत मंत्रिमंडळाने मंत्री, आमदारांच्या भत्त्यांमध्ये व अन्य लाभांमध्ये घसघशीत वाढ केली आहे. चाळीसही आमदारांचे विविध भत्ते आणि माजी आमदारांची पेन्शन यात सरकारने भरघोस वाढ केली. महागाई खूप वाढलीय, हे सत्ताधारीदेखील मान्य करतात आणि स्वतःची भत्तेवाढ करून घेतात. पूर्ण गोवा पाहतोय, विद्यमान सरकार सर्व आमदारांच्या वेतनात व कर्जाच्या प्रमाणातही प्रचंड वाढ करून मोकळे झाले आहे. बाणस्तारीतील भीषण अपघात, त्यात गेलेले तीन बळी यांमुळे पूर्ण गोवा सुन्न झाला आहे. 

राज्य एक प्रकारे दुखवटा पाळत असल्यासारखी स्थिती असताना गोवा मंत्रिमंडळ मात्र आमदारांचे भत्ते वाढविण्याचा निर्णय घेते. सत्ताधाऱ्यांमध्ये संवेदनशीलता जरादेखील राहिलेली नाही, अशी टीका लोक करू लागले आहेत. आमदारांना आणखी किती श्रीमंत होण्याची इच्छा आहे, असा प्रश्न विचारावासा वाटतो. काही दिवसांपूर्वी दिगंबर कामत यांनी विधानसभेत वेतनवाढीची मागणी केली होती. आपल्यासाठी नव्हे, तर अन्य आमदारांसाठी आपण वेतनवाढ मागतोय, असा हुशार दावा कामत यांनी केला होता. सावंत सरकार जणू काही भत्तेवाढीचा निर्णय हातात घेऊन तयारच होते. कामत यांनी विधानसभेत मागणी केल्यानंतर अवघ्या पंधराच दिवसांत सरकारचा प्रस्ताव तयारही झाला आणि मंत्रिमंडळाने तो मंजूरही करून टाकला. म्हणजे तुम्ही भत्तेवाढीची मागणी करा, असा सल्ला सरकारनेच कामत यांना दिला होता की काय? भत्ते वाढीचा निर्णय घेण्यासाठी सरकारला पार्श्वभूमी तयार झालेली हवी होती. 'आमदारांकडून वेतनवाढीची मागणी आली म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला,' असे सांगायला आता सरकार मोकळे. 

एरवी गरीब लोकांच्या कल्याणाचे विषय असतील तर मागणी करूनदेखील मंत्रिमंडळ इतक्या तत्परतेने निर्णय घेत नाही; पण दिगंबर कामत यांनी मागणी सभागृहात ठेवली न ठेवली, आमदारांचे भत्ते वाढवून सरकार मोकळेही झाले, अच्छे दिन म्हणतात ते हेच का? भत्तेवाढ झाली की भ्रष्टाचार बंद होतो किंवा कमी होतो, असे समजावे काय? बहुतांश मंत्री व महामंडळांचे चेअरमन असलेले आमदार सरकारी वेतन व भत्त्यांवर मुळीच अवलंबून नाहीत. बँकेत आपले वेतन विधिमंडळ खाते जमा करते की नाही, हे एक- दोन वर्षे बहुतांश आमदार पाहतदेखील नाहीत; कारण त्यांना त्या पैशांची गरजच वाटत नाही, फक्त तीन चार आमदार असे आहेत, ज्यांना वेतनवाढीची खरोखर गरज होती व आहे. सर्व चाळीसही आमदारांचे भत्ते अगोदरच एक लाख रुपयांपेक्षाही जास्त होते. दरमहा दीड लाख रुपयांपर्यंत मंत्री वेतन व भत्ते मिळवतात. तरीदेखील आता पुन्हा त्यांच्या भत्त्यात भरघोस वाढ केली गेली आहे, याला काय बरे म्हणावे?

गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने एकूण पाचशे कोटी रुपये विविध इव्हेंट्स, सोहळे व प्रसिद्धीवर खर्च केले आहेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे म्हणणे आहे. समाजकल्याणाच्या विविध योजनांचे पैसे अडलेले आहेत. ३५ कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे निधी नाही; पण सोहळ्यांवर प्रचंड उधळपट्टी केली जाते. जनतेच्या कष्टाचा पैसा इव्हेंटस्वर कसा खर्च करायचा असतो, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे खिसे कसे भरायचे असतात, हे सरकारने गेल्या पाच वर्षांत दाखवून दिले आहे. 'सेव्ह सॉइल' असा एक छोटा इव्हेंट गोवा सरकारने केला होता. त्यावर तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये खर्च केले गेले. मंत्री, आमदारांच्या खिशातून हे पैसे जात नाहीत. लोकांच्या खिशातून जातात.

आमदारांचा व माजी आमदारांचा वैद्यकीय खर्च सरकारी तिजोरीतून होतो. नव्या भत्तेवाढीमुळे तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त बोजा पडला आहे. वाहनखरेदी, घरखरेदीसाठी ३०-४० लाख रुपये आमदारांना कर्ज मिळते. पूर्वी कमाल पेन्शन ७० हजार मिळायची. आता किमान मर्यादा दोन लाख केली गेली आहे. खऱ्या अर्थाने मंत्री आमदारांना अच्छे दिन भाजप सरकारने आणले, यासाठी अभिनंदन करूया.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा