शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

आमदारांनो, श्रीमंत व्हा! भत्ते, लाभांमध्ये घसघशीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 10:42 IST

राज्य एक प्रकारे दुखवटा पाळत असल्यासारखी स्थिती असताना गोवा मंत्रिमंडळ मात्र आमदारांचे भत्ते वाढविण्याचा निर्णय घेते.

ज्या राज्यात मंत्री, आमदार गरीबच राहतात आणि जनता मात्र श्रीमंत होत जाते, त्या राज्याचे काही खरे नसते, असे कदाचित गोव्यातील सरकारला वाटत असावे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष असला तरी, त्याकडे दुर्लक्ष करून सावंत मंत्रिमंडळाने मंत्री, आमदारांच्या भत्त्यांमध्ये व अन्य लाभांमध्ये घसघशीत वाढ केली आहे. चाळीसही आमदारांचे विविध भत्ते आणि माजी आमदारांची पेन्शन यात सरकारने भरघोस वाढ केली. महागाई खूप वाढलीय, हे सत्ताधारीदेखील मान्य करतात आणि स्वतःची भत्तेवाढ करून घेतात. पूर्ण गोवा पाहतोय, विद्यमान सरकार सर्व आमदारांच्या वेतनात व कर्जाच्या प्रमाणातही प्रचंड वाढ करून मोकळे झाले आहे. बाणस्तारीतील भीषण अपघात, त्यात गेलेले तीन बळी यांमुळे पूर्ण गोवा सुन्न झाला आहे. 

राज्य एक प्रकारे दुखवटा पाळत असल्यासारखी स्थिती असताना गोवा मंत्रिमंडळ मात्र आमदारांचे भत्ते वाढविण्याचा निर्णय घेते. सत्ताधाऱ्यांमध्ये संवेदनशीलता जरादेखील राहिलेली नाही, अशी टीका लोक करू लागले आहेत. आमदारांना आणखी किती श्रीमंत होण्याची इच्छा आहे, असा प्रश्न विचारावासा वाटतो. काही दिवसांपूर्वी दिगंबर कामत यांनी विधानसभेत वेतनवाढीची मागणी केली होती. आपल्यासाठी नव्हे, तर अन्य आमदारांसाठी आपण वेतनवाढ मागतोय, असा हुशार दावा कामत यांनी केला होता. सावंत सरकार जणू काही भत्तेवाढीचा निर्णय हातात घेऊन तयारच होते. कामत यांनी विधानसभेत मागणी केल्यानंतर अवघ्या पंधराच दिवसांत सरकारचा प्रस्ताव तयारही झाला आणि मंत्रिमंडळाने तो मंजूरही करून टाकला. म्हणजे तुम्ही भत्तेवाढीची मागणी करा, असा सल्ला सरकारनेच कामत यांना दिला होता की काय? भत्ते वाढीचा निर्णय घेण्यासाठी सरकारला पार्श्वभूमी तयार झालेली हवी होती. 'आमदारांकडून वेतनवाढीची मागणी आली म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला,' असे सांगायला आता सरकार मोकळे. 

एरवी गरीब लोकांच्या कल्याणाचे विषय असतील तर मागणी करूनदेखील मंत्रिमंडळ इतक्या तत्परतेने निर्णय घेत नाही; पण दिगंबर कामत यांनी मागणी सभागृहात ठेवली न ठेवली, आमदारांचे भत्ते वाढवून सरकार मोकळेही झाले, अच्छे दिन म्हणतात ते हेच का? भत्तेवाढ झाली की भ्रष्टाचार बंद होतो किंवा कमी होतो, असे समजावे काय? बहुतांश मंत्री व महामंडळांचे चेअरमन असलेले आमदार सरकारी वेतन व भत्त्यांवर मुळीच अवलंबून नाहीत. बँकेत आपले वेतन विधिमंडळ खाते जमा करते की नाही, हे एक- दोन वर्षे बहुतांश आमदार पाहतदेखील नाहीत; कारण त्यांना त्या पैशांची गरजच वाटत नाही, फक्त तीन चार आमदार असे आहेत, ज्यांना वेतनवाढीची खरोखर गरज होती व आहे. सर्व चाळीसही आमदारांचे भत्ते अगोदरच एक लाख रुपयांपेक्षाही जास्त होते. दरमहा दीड लाख रुपयांपर्यंत मंत्री वेतन व भत्ते मिळवतात. तरीदेखील आता पुन्हा त्यांच्या भत्त्यात भरघोस वाढ केली गेली आहे, याला काय बरे म्हणावे?

गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने एकूण पाचशे कोटी रुपये विविध इव्हेंट्स, सोहळे व प्रसिद्धीवर खर्च केले आहेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे म्हणणे आहे. समाजकल्याणाच्या विविध योजनांचे पैसे अडलेले आहेत. ३५ कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे निधी नाही; पण सोहळ्यांवर प्रचंड उधळपट्टी केली जाते. जनतेच्या कष्टाचा पैसा इव्हेंटस्वर कसा खर्च करायचा असतो, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे खिसे कसे भरायचे असतात, हे सरकारने गेल्या पाच वर्षांत दाखवून दिले आहे. 'सेव्ह सॉइल' असा एक छोटा इव्हेंट गोवा सरकारने केला होता. त्यावर तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये खर्च केले गेले. मंत्री, आमदारांच्या खिशातून हे पैसे जात नाहीत. लोकांच्या खिशातून जातात.

आमदारांचा व माजी आमदारांचा वैद्यकीय खर्च सरकारी तिजोरीतून होतो. नव्या भत्तेवाढीमुळे तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त बोजा पडला आहे. वाहनखरेदी, घरखरेदीसाठी ३०-४० लाख रुपये आमदारांना कर्ज मिळते. पूर्वी कमाल पेन्शन ७० हजार मिळायची. आता किमान मर्यादा दोन लाख केली गेली आहे. खऱ्या अर्थाने मंत्री आमदारांना अच्छे दिन भाजप सरकारने आणले, यासाठी अभिनंदन करूया.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा