शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

गोव्याच्या मिरामार किनाऱ्याची 'ब्ल्यू फ्लॅग' निकषात निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 14:54 IST

४ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दृष्टीने विकास करणार  

पणजी : गोव्याच्या मिरामार किनाऱ्याचा सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दृष्टीने विकास केला जाणार असून त्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सोसायटी ऑफ इंटेग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने निविदा मागविल्या असून मिरामार किनाऱ्यावर प्रसाधनगृहे, पार्किंग सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून टेहेळणी यंत्रणा आदी व्यवस्था केली जाणार आहे. ही संस्था इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीच्या समन्वयाने हे काम करणार आहे. 

किनाऱ्याचा आंतरराष्ट्रीय दर्जा काही निकष लावून ठरविला जातो.  'ब्ल्यू फ्लॅग' निकषात काही किनाऱ्यांचा समावेश होतो त्यात मिरामार किनाऱ्याला स्थान मिळाले आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीचे संचालक माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, ‘ब्ल्यू फ्लॅग निकषात मिरामार किनाऱ्याची निवड होणे ही तशी भूषणावह बाब आहे. देशातील काही किनाऱ्यांचा यात समावेश झालेला आहे. या किनाऱ्याचा पर्यावरणाभिमुख विकास केला जाईल. पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटक, स्थानिक मच्छिमार, स्थानिक रहिवाशी यांची समिती स्थापन केली जाईल. निविदा जारी करण्यात आल्याने आता एक दोन महिन्यात वर्क ऑर्डर काढून पावसाळ्यानंतर काम सुरु होईल.’

मिरामार किनारा राजधानीपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरवर असून येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. दरम्यान, रायबंदरची वीज समस्या त्या भागात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकून दूर केली जाईल. रायबंदरसाठी अन्य काही प्रकल्पही विचाराधीन आहेत, अशी माहिती कुंकळ्येंकर यांनी दिली. ते म्हणाले की, ‘हाती घ्यावयाच्या प्रकल्पांबाबत लोकांबरोबर योग्य सल्लामसलत केला जात आहे. असे पदपथ निर्माण करण्याची योजना आहे की ते विशेष गरजा असलेल्या व्यक्तींनाही सुलभपणे वापरता येतील. शहरवासियांना पुरेसे पिण्याचे पाणी, महिला, लहान मुले, वृध्द यांची सुरक्षा, कचरा समस्या निर्मूलन या गोष्टींवर भर देऊन शहर सुदृढ बनवायचे आहे. 

कुंकळ्येंकर म्हणाले की, मळा संवर्धन प्रकल्पासाठी अंतर्गत रस्ते केले. मळा भागात घरे एकमेकांना खेटून आहेत तेथे विद्युत वाहिन्या व इतर गोष्टी भूमिगत करण्यात आल्या. अमृत योजने अंतर्गत पदपथ बांधले. आल्तिनोला जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या. कांपाल येथे नदी तटाचे सौंदर्यीकरण केले. पदपूल बांधल्याचे ते म्हणाले. रुअ द औरे खाडीवरील खारफुटींचे दर्शन घडविण्यासाठी लाकडी पूल बांधला. स्मार्ट सिटी म्हणजे केवळ काँक्रिटच्या इमारतीत स्थलांतर करणे नव्हे. पुरातन वारसा वास्तू जपणे हाही हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :goaगोवा