शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लाइनमन जांबावलीकर मृत्यू प्रकरणी वीजमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा: रमाकांत खलप

By किशोर कुबल | Updated: April 19, 2024 15:54 IST

१२ हजार कोटी खर्च करूनही वीजेच्या धक्क्याने ७१ माणसे, ३० जनावरे ठार.

किशोर कुबल, पणजी :  लाइनमन मनोज जांबावलीकर मृत्यू प्रकरणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी इंडिया गाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी केली आहे

कर्तव्य बजावताना  विजेचा धक्का लागून लाइनमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे खलप यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, '२०१९ ते २०२४ या काळात जवळपास ७१ मानव आणि ३० प्राणी विजेच्या धक्क्याने मरण पावले. ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत माहिती दिली होती की, गोवा सरकारने गेल्या ५ वर्षात गोव्यात वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढा मोठा खर्च करूनही लोकांचे मृत्यू सुरूच असून लोकांना वीज पुरवठा संकटाचाही सामना करावा लागत आहे.

'मिशन टोटल कमिशन'वर डोळा ठेवून अवाढव्य खर्च करण्यालाच भाजप सरकारचे प्राधान्य आहे हे स्पष्ट दिसत आहे. करोडो रुपये खर्च केले तरी प्रत्यक्षात  काहीही होत नाही, असे  खलप म्हणाले.

गोव्यात वीज पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. उद्योगपती, व्यापारी आस्थापने आणि सरकारी विभाग यांच्याकडून कोट्यवधी  रुपयांची थकबाकी वसूल करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तथापि, दोन महिन्यांसाठी गरीब लोकांचे ५०० रुपये चुकल्यास सरकार त्यांचे घरगुती वीज कनेक्शन तोडण्यास तत्परता दाखवते , असे खलप म्हणाले.

अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजप सरकारपासून गोव्याला मुक्त करण्याची वेळ आली आहे. कामावर असताना सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आपण सर्वांनी त्यांना कायमचा धडा शिकवूया, असे खलप यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाelectricityवीज