शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

गोव्यातील वीज दरवाढीच्या शॉकमुळे मंत्रीही नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 21:18 IST

राज्यात उद्या रविवारपासून वीज दरात बरीच वाढ होत असल्यामुळे  पर्रिकर सरकारमधील काही मंत्रीही खूप नाराज झालेले आहेत. खाण बंदी लागू झालेली असताना व खाणींवर आधारीत राज्यातील अनेक लहानमोठे उद्योग धंदे अडचणीतून जात असताना आता राज्यात मोठी वीज दरवाढ लागू झाल्याने काही सत्ताधारी आमदार व विरोधी पक्षाचे आमदारही तीव्र नापसंती व्यक्त करू लागले आहेत.

पणजी  - राज्यात उद्या रविवारपासून वीज दरात बरीच वाढ होत असल्यामुळे  पर्रिकर सरकारमधील काही मंत्रीही खूप नाराज झालेले आहेत. खाण बंदी लागू झालेली असताना व खाणींवर आधारीत राज्यातील अनेक लहानमोठे उद्योग धंदे अडचणीतून जात असताना आता राज्यात मोठी वीज दरवाढ लागू झाल्याने काही सत्ताधारी आमदार व विरोधी पक्षाचे आमदारही तीव्र नापसंती व्यक्त करू लागले आहेत. वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी वीज खात्याने संयुक्त वीज नियमन आयोगाकडे करावी लागेल, असे मत काही मंत्री व्यक्त करत आहेत.

लोकांना अगोदरच वीज बिले परवडत नाहीत. छोटय़ा दुकानदारांना दुकानातून आईस्क्रिम विकणोही परवडत नाही. फ्रिज कायम चालू ठेवावा लागतो व प्रचंड बिल येते अशी खंत दुकानदार व्यक्त करतात. शेतक-यांनाही वीज बिलापोटी खूप पैसे खर्च करावे लागतात. अशा स्थितीत येत्या रविवारपासून म्हणजे दि. 1 एप्रिलपासून वीज दरात वाढ होत असल्याने लोकांच्या मनात वीज खात्याच्या कारभाराविषयीही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आम्ही वीज दरात आणखी वाढ होऊ देणार नाही, असे सरकारने गेल्या सहा महिन्यांत तीनवेळा जाहीर केले आहे. मग संयुक्त वीज नियमन आयोग आता वीज दरवाढ करत असताना सरकारचे संबंधित अधिकारी नेमके काय करत आहेत असा प्रश्न काही सत्ताधारी आमदारांना व विरोधी आमदारांनाही पडला आहे.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी यापूर्वी अनेक वर्षे वीज खाते सांभाळले आहे. त्यांनी ट¦ीटरद्वारे प्रथमच वीज दरवाढीविरुद्ध आता तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. घरगुती वापराच्या वीजेसाठी लोकांना सरासरी 11.48 टक्के जास्त पैसे वीज बिलावर खर्च करावे लागतील असा समज लोकांमध्ये पसरला आहे. कृषी वापरासाठीच्या वीजेवर 9.38 टक्के जास्त खर्च शेतक:यांना करावा लागेल. उद्योगांसाठीच्या वीजेसाठी वाढीव 5.81 टक्के तर व्यवसायिक कारणास्तव वापरल्या जाणा:या वीजेसाठी येणा:या बिलावर साधारणत: 3.80 टक्के जास्त पैसे ग्राहकांना मोजावे लागतील. यामुळे आतापासूनच लोकांमध्ये चीड व्यक्त होऊ लागली आहे. दिगंबर कामत यांनी तर ही वीज दरवाढ धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर ही वीज दरवाढ परिणाम करेल, असे त्यांनी नमूद केले आहे. सरकारचे काही मंत्रीही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. काही मंत्र्यांनी भाजपच्या कोअर टीमच्या सदस्यांशी संपर्क साधून वीज दरवाढीच्या नव्या निर्णयाबाबत नापसंती व्यक्त केली. 

दरम्यान, एलईडी वीज दिवे राज्यभर विविध खांबांवर लावण्यात आले आहे. हे वीज दिवे संबंधित कंत्रटदार यंत्रणा आता काढत असल्याने काही मंत्र्यांनी वीज अभियंत्यांशी संपर्क साधून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. चुकीच्या जागी वीज दिवे लावले गेले व त्यामुळे आम्ही ते काढत आहोत, असे कंत्रटदार यंत्रणोकडून सांगितले जाते. मात्र चुकीच्या ठिकाणी लावले तरी, आता ते एलईडी वीज दिवे लाढण्यास लोकांचा आक्षेप आहे. त्यामुळे दिवे काढू नका, अशी मागणी आमदार करत आहेत. 

टॅग्स :goaगोवाnewsबातम्याGovernmentसरकार