शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

खाण कंपन्यांची मालमत्ता जप्त करा, सरकारी अहवालानुसार कंपन्या 3400 कोटी रुपये देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 16:49 IST

गोवा सरकारने नेमलेली चार्टर्ड अकाउंट्सची समिती आणि महालेखापाल या दोन यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील खनिज कंपन्या सरकारला एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचे देणे आहेत.

पणजी - गोवा सरकारने नेमलेली चार्टर्ड अकाउंट्सची समिती आणि महालेखापाल या दोन यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील खनिज कंपन्या सरकारला एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचे देणे आहेत. या कंपन्या पैसे न भरता कोणत्या आधारे पुन्हा खाण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत असा प्रश्न गोवा फाऊंडेशनने शनिवारी उपस्थित केला. तसेच सरकारने वसुलीसाठी या कंपन्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी क्लॉड अल्वारीस यांनी केली.

अल्वारीस यांनी माहिती हक्क कायद्याखाली माहिती प्राप्त केली. त्यानंतर शनिवारी फाऊंडेशनने येथे पत्रकार परिषद घेतली. चार्टर्ड चार्टर्ड अकाउंट्च्या समितीने एकूण तीन वर्षे चौकशी काम केले व अहवाल तयार केला. वेदांताकडून सर्वाधिक म्हणजे एकूण 1 हजार 647 कोटी रुपये सरकारला येणे आहे. ओरीसामध्ये तेथील सरकारने खाण कंपन्यांना 17 हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नोटीसा पाठविल्या व एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी 13 हजार कोटी रुपये वसुल केले. गोवा सरकारने गोव्यातील खाण कंपन्यांना त्याच तत्त्वावर नोटीसा पाठविल्या पण एक पैसा देखील गोव्याने वसुल केलेला नाही, असे अल्वारीस यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोवा सरकारला वसुली करावीच लागेल. वसुलीसाठी सरकारने खाण कंपन्यांच्या इमारती, वाहने आदी जप्त करावीत. एखादा सामान्य माणूस घर किंवा वाहनासाठी कर्ज घेतो व ते थकवतो तेव्हा बँकांकडून अशाच प्रकारे जप्ती आणली जाते, बड्या खाण कंपन्यांकडे तर प्रचंड मालमत्ता आहे, असे अल्वारीस म्हणाले.

वास्तविक आम्ही केलेल्या अभ्यासानुसार एकूण 65 हजार कोटी रुपये सरकारला येणे आहेत. तथापि, सरकारच्याच अहवालानुसार 3400 कोटी येणे असल्याने आम्ही पुन्हा उच्च न्यायालयात जाणार आहोत. हजारो कोटी रुपये गोवा सरकारकडे जमा न करता खाणी सुरू करण्याच्या गोष्टी खाण कंपन्या करत आहेत. खाणी सुरूच होऊ शकणार नाहीत. मंत्री गोविंद गावडे यांनी तरी पुढील वर्षी खाणी सुरू होतील असे म्हटले आहे. भाजपा मात्र लगेच सुरू होईल असे लोकांना सांगून थापा मारत आहे, असे अल्वारीस म्हणाले. 

लिज क्षेत्राबाहेरील खनिज माल कुणाचा हे स्पष्ट करा असे न्यायालयाने सरकारला सांगून देखील सरकार स्पष्ट करू शकलेले नाही. तो माल सरकारचा आहे. एकूण 10 हजार दशलक्ष टन माल पडून आहे. सरकारने त्याचा आता लिलाव पुकारावा. जेणेकरून थोडा तरी व्यवसाय सुरू राहील व सरकारला 3 हजार कोटींचा महसुल त्याद्वारे मिळेल. रॉयल्टी खाण कंपन्यांनी भरली म्हणून तो माल कंपन्यांचा होत नाही. रॉयल्टी कंपन्यांना परत करून सरकार या मालाचा लिलाव करू शकते. सरकारने खनिज महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी अल्वारीस यांनी केली.

टॅग्स :goaगोवा