शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खाण कंपन्यांची मालमत्ता जप्त करा, सरकारी अहवालानुसार कंपन्या 3400 कोटी रुपये देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 16:49 IST

गोवा सरकारने नेमलेली चार्टर्ड अकाउंट्सची समिती आणि महालेखापाल या दोन यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील खनिज कंपन्या सरकारला एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचे देणे आहेत.

पणजी - गोवा सरकारने नेमलेली चार्टर्ड अकाउंट्सची समिती आणि महालेखापाल या दोन यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील खनिज कंपन्या सरकारला एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचे देणे आहेत. या कंपन्या पैसे न भरता कोणत्या आधारे पुन्हा खाण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत असा प्रश्न गोवा फाऊंडेशनने शनिवारी उपस्थित केला. तसेच सरकारने वसुलीसाठी या कंपन्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी क्लॉड अल्वारीस यांनी केली.

अल्वारीस यांनी माहिती हक्क कायद्याखाली माहिती प्राप्त केली. त्यानंतर शनिवारी फाऊंडेशनने येथे पत्रकार परिषद घेतली. चार्टर्ड चार्टर्ड अकाउंट्च्या समितीने एकूण तीन वर्षे चौकशी काम केले व अहवाल तयार केला. वेदांताकडून सर्वाधिक म्हणजे एकूण 1 हजार 647 कोटी रुपये सरकारला येणे आहे. ओरीसामध्ये तेथील सरकारने खाण कंपन्यांना 17 हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नोटीसा पाठविल्या व एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी 13 हजार कोटी रुपये वसुल केले. गोवा सरकारने गोव्यातील खाण कंपन्यांना त्याच तत्त्वावर नोटीसा पाठविल्या पण एक पैसा देखील गोव्याने वसुल केलेला नाही, असे अल्वारीस यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोवा सरकारला वसुली करावीच लागेल. वसुलीसाठी सरकारने खाण कंपन्यांच्या इमारती, वाहने आदी जप्त करावीत. एखादा सामान्य माणूस घर किंवा वाहनासाठी कर्ज घेतो व ते थकवतो तेव्हा बँकांकडून अशाच प्रकारे जप्ती आणली जाते, बड्या खाण कंपन्यांकडे तर प्रचंड मालमत्ता आहे, असे अल्वारीस म्हणाले.

वास्तविक आम्ही केलेल्या अभ्यासानुसार एकूण 65 हजार कोटी रुपये सरकारला येणे आहेत. तथापि, सरकारच्याच अहवालानुसार 3400 कोटी येणे असल्याने आम्ही पुन्हा उच्च न्यायालयात जाणार आहोत. हजारो कोटी रुपये गोवा सरकारकडे जमा न करता खाणी सुरू करण्याच्या गोष्टी खाण कंपन्या करत आहेत. खाणी सुरूच होऊ शकणार नाहीत. मंत्री गोविंद गावडे यांनी तरी पुढील वर्षी खाणी सुरू होतील असे म्हटले आहे. भाजपा मात्र लगेच सुरू होईल असे लोकांना सांगून थापा मारत आहे, असे अल्वारीस म्हणाले. 

लिज क्षेत्राबाहेरील खनिज माल कुणाचा हे स्पष्ट करा असे न्यायालयाने सरकारला सांगून देखील सरकार स्पष्ट करू शकलेले नाही. तो माल सरकारचा आहे. एकूण 10 हजार दशलक्ष टन माल पडून आहे. सरकारने त्याचा आता लिलाव पुकारावा. जेणेकरून थोडा तरी व्यवसाय सुरू राहील व सरकारला 3 हजार कोटींचा महसुल त्याद्वारे मिळेल. रॉयल्टी खाण कंपन्यांनी भरली म्हणून तो माल कंपन्यांचा होत नाही. रॉयल्टी कंपन्यांना परत करून सरकार या मालाचा लिलाव करू शकते. सरकारने खनिज महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी अल्वारीस यांनी केली.

टॅग्स :goaगोवा