शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

खाण कंपन्यांची मालमत्ता जप्त करा, सरकारी अहवालानुसार कंपन्या 3400 कोटी रुपये देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 16:49 IST

गोवा सरकारने नेमलेली चार्टर्ड अकाउंट्सची समिती आणि महालेखापाल या दोन यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील खनिज कंपन्या सरकारला एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचे देणे आहेत.

पणजी - गोवा सरकारने नेमलेली चार्टर्ड अकाउंट्सची समिती आणि महालेखापाल या दोन यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार राज्यातील खनिज कंपन्या सरकारला एकूण 3 हजार 400 कोटी रुपयांचे देणे आहेत. या कंपन्या पैसे न भरता कोणत्या आधारे पुन्हा खाण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत असा प्रश्न गोवा फाऊंडेशनने शनिवारी उपस्थित केला. तसेच सरकारने वसुलीसाठी या कंपन्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी क्लॉड अल्वारीस यांनी केली.

अल्वारीस यांनी माहिती हक्क कायद्याखाली माहिती प्राप्त केली. त्यानंतर शनिवारी फाऊंडेशनने येथे पत्रकार परिषद घेतली. चार्टर्ड चार्टर्ड अकाउंट्च्या समितीने एकूण तीन वर्षे चौकशी काम केले व अहवाल तयार केला. वेदांताकडून सर्वाधिक म्हणजे एकूण 1 हजार 647 कोटी रुपये सरकारला येणे आहे. ओरीसामध्ये तेथील सरकारने खाण कंपन्यांना 17 हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नोटीसा पाठविल्या व एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी 13 हजार कोटी रुपये वसुल केले. गोवा सरकारने गोव्यातील खाण कंपन्यांना त्याच तत्त्वावर नोटीसा पाठविल्या पण एक पैसा देखील गोव्याने वसुल केलेला नाही, असे अल्वारीस यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोवा सरकारला वसुली करावीच लागेल. वसुलीसाठी सरकारने खाण कंपन्यांच्या इमारती, वाहने आदी जप्त करावीत. एखादा सामान्य माणूस घर किंवा वाहनासाठी कर्ज घेतो व ते थकवतो तेव्हा बँकांकडून अशाच प्रकारे जप्ती आणली जाते, बड्या खाण कंपन्यांकडे तर प्रचंड मालमत्ता आहे, असे अल्वारीस म्हणाले.

वास्तविक आम्ही केलेल्या अभ्यासानुसार एकूण 65 हजार कोटी रुपये सरकारला येणे आहेत. तथापि, सरकारच्याच अहवालानुसार 3400 कोटी येणे असल्याने आम्ही पुन्हा उच्च न्यायालयात जाणार आहोत. हजारो कोटी रुपये गोवा सरकारकडे जमा न करता खाणी सुरू करण्याच्या गोष्टी खाण कंपन्या करत आहेत. खाणी सुरूच होऊ शकणार नाहीत. मंत्री गोविंद गावडे यांनी तरी पुढील वर्षी खाणी सुरू होतील असे म्हटले आहे. भाजपा मात्र लगेच सुरू होईल असे लोकांना सांगून थापा मारत आहे, असे अल्वारीस म्हणाले. 

लिज क्षेत्राबाहेरील खनिज माल कुणाचा हे स्पष्ट करा असे न्यायालयाने सरकारला सांगून देखील सरकार स्पष्ट करू शकलेले नाही. तो माल सरकारचा आहे. एकूण 10 हजार दशलक्ष टन माल पडून आहे. सरकारने त्याचा आता लिलाव पुकारावा. जेणेकरून थोडा तरी व्यवसाय सुरू राहील व सरकारला 3 हजार कोटींचा महसुल त्याद्वारे मिळेल. रॉयल्टी खाण कंपन्यांनी भरली म्हणून तो माल कंपन्यांचा होत नाही. रॉयल्टी कंपन्यांना परत करून सरकार या मालाचा लिलाव करू शकते. सरकारने खनिज महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी अल्वारीस यांनी केली.

टॅग्स :goaगोवा