शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

खाणी चक्रव्यूहातच

By admin | Updated: February 8, 2015 01:33 IST

पणजी : राज्यातील खनिज लिजांचे सरकारने घाईगडबडीत नूतनीकरण केले तरी, एका बाजूने लिजांसाठी ईसी मिळत नाही

पणजी : राज्यातील खनिज लिजांचे सरकारने घाईगडबडीत नूतनीकरण केले तरी, एका बाजूने लिजांसाठी ईसी मिळत नाही व दुसऱ्या बाजूने शहा आयोगाने ठपका ठेवलेल्या खाणींनाच लिजांचे नूतनीकरण पुन्हा कसे काय दिले, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत. राज्याचा खाण धंदा असा चक्रव्यूहात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सोमवारी केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र तोमर तसेच केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटून खाणप्रश्नी चर्चा करणार आहेत. सप्टेंबर २०१२ मध्ये राज्यातील सर्व खनिज खाण व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर अजूनही तो सुरू होऊ शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१४ मध्ये खाणबंदी मागे घेतली. अलीकडेच राज्य सरकारनेही स्वत:चा बंदी आदेश मागे घेतला. दि. ११ सप्टेंबर २०१२ रोजी गोवा सरकारने खाणबंदी लागू केली होती. आता सगळे बंदी आदेश मागे घेतले असले तरी खनिज लिजांचे निलंबन मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अजून मागे घेतलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी घालून दिलेल्या अटींचे पालन करतानाच शासकीय यंत्रणेची दमछाक होत आहे, असे काही खाण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१२ मध्ये गोव्याच्या खाणप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निवाडा दिल्याने पर्यावरण मंत्रालयाचेही हात बांधले गेले आहेत. खाणींना यापूर्वी दिले गेलेले पर्यावरणविषयक दाखले (ईसी) निलंबित आहेत. त्या दाखल्यांवरील निलंबन सरळ मागे घेण्याचा धोका केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी पत्करू पाहत नाहीत, अशी माहिती मिळाली. ८४ लिजांचे राज्य सरकारने नूतनीकरण केले; पण त्यापैकी फक्त ४३ लिज करारांवर सह्या झाल्या आहेत. मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) खाण कंपन्यांनी भरले तरी मुद्रांक शुल्काएवढेच लिज नोंदणी शुल्क भरण्यास खाण व्यावसायिक तयार नाहीत. त्यामुळेच लिजांची नोंदणी होऊ शकलेली नाही. लिज नूतनीकरणाची अधिसूचनाही निघालेली नाही. अर्थात, लिज नोंदणी किंवा नूतनीकरण राजपत्रात अधिसूचित करायला हवे, असे एमएमडीआर कायद्यात कोठेच म्हटलेले नाही, असे काही सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गोवा फाउंडेशन संस्थेचा मात्र या दाव्यास आक्षेप आहे. छोट्या खाणींसाठी राहील आग्रह मुख्यमंत्री पार्सेकर शनिवारी सायंकाळी सात वाजता दिल्लीस रवाना झाले. रविवारी दिल्लीत पंतप्रधानांनी निती आयोगाची बैठक बोलावली आहे. या आयोगाच्या स्थापनेनंतर होणारी ही पहिली बैठक आहे. बैठकीत मुख्यमंत्री सहभागी होतील. त्यानंतर सोमवारीही मुख्यमंत्री दिल्लीस थांबतील. सोमवारी दिवसभर तसेच मंगळवारी सकाळी पार्सेकर हे केंद्रीय खाणमंत्री तोमर, केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर आणि मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांना भेटतील. गोव्यातील काही छोट्या खनिज खाणी तरी अगोदर सुरू व्हायला हव्यात, त्यासाठी पर्यावरणविषयक दाखले दिले जावेत, गोमंतकीय जनता खाणी सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहे, असे मुद्दे पार्सेकर यांच्याकडून तोमर व जावडेकर यांच्यासमोर मांडले जाणार आहेत. म्हणे वाहतूक वेळ वाढवा २००७ ते २०१२ या कालावधीत गोव्यातील खाणग्रस्त भागांमध्ये खनिज मालाची प्रचंड वाहतूक झाली होती. सुमारे २६ हजार ट्रक त्या वेळी खाणग्रस्त भागांतून धावत होते, अशी माहिती यापूर्वी उजेडात आली आहे. खाणग्रस्त भागात ट्रकांमुळे त्या वेळी खूप अपघातही होत होते. तथापि, गोव्यातील ट्रकमालकांनी आता सरकारने खनिज वाहतूक वेळेत वाढ करून द्यावी, अशी मागणी केली आहे. दिवसाला आठ तास खनिज वाहतूक करावी, असा सध्याचा नियम आहे. आपल्याला दररोज अधिकाधिक वेळ खनिज वाहतूक करायला मिळावी व तसे झाले तरच आमची तीन वर्षांत खराब बनलेली आर्थिक स्थिती सुधारेल, असे ट्रकमालकांचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)खाणी चक्रव्यूहातच पणजी : राज्यातील खनिज लिजांचे सरकारने घाईगडबडीत नूतनीकरण केले तरी, एका बाजूने लिजांसाठी ईसी मिळत नाही व दुसऱ्या बाजूने शहा आयोगाने ठपका ठेवलेल्या खाणींनाच लिजांचे नूतनीकरण पुन्हा कसे काय दिले, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत. राज्याचा खाण धंदा असा चक्रव्यूहात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सोमवारी केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र तोमर तसेच केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटून खाणप्रश्नी चर्चा करणार आहेत. सप्टेंबर २०१२ मध्ये राज्यातील सर्व खनिज खाण व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर अजूनही तो सुरू होऊ शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१४ मध्ये खाणबंदी मागे घेतली. अलीकडेच राज्य सरकारनेही स्वत:चा बंदी आदेश मागे घेतला. दि. ११ सप्टेंबर २०१२ रोजी गोवा सरकारने खाणबंदी लागू केली होती. आता सगळे बंदी आदेश मागे घेतले असले तरी खनिज लिजांचे निलंबन मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अजून मागे घेतलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी घालून दिलेल्या अटींचे पालन करतानाच शासकीय यंत्रणेची दमछाक होत आहे, असे काही खाण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१२ मध्ये गोव्याच्या खाणप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निवाडा दिल्याने पर्यावरण मंत्रालयाचेही हात बांधले गेले आहेत. खाणींना यापूर्वी दिले गेलेले पर्यावरणविषयक दाखले (ईसी) निलंबित आहेत. त्या दाखल्यांवरील निलंबन सरळ मागे घेण्याचा धोका केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी पत्करू पाहत नाहीत, अशी माहिती मिळाली. ८४ लिजांचे राज्य सरकारने नूतनीकरण केले; पण त्यापैकी फक्त ४३ लिज करारांवर सह्या झाल्या आहेत. मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) खाण कंपन्यांनी भरले तरी मुद्रांक शुल्काएवढेच लिज नोंदणी शुल्क भरण्यास खाण व्यावसायिक तयार नाहीत. त्यामुळेच लिजांची नोंदणी होऊ शकलेली नाही. लिज नूतनीकरणाची अधिसूचनाही निघालेली नाही. अर्थात, लिज नोंदणी किंवा नूतनीकरण राजपत्रात अधिसूचित करायला हवे, असे एमएमडीआर कायद्यात कोठेच म्हटलेले नाही, असे काही सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गोवा फाउंडेशन संस्थेचा मात्र या दाव्यास आक्षेप आहे. छोट्या खाणींसाठी राहील आग्रह मुख्यमंत्री पार्सेकर शनिवारी सायंकाळी सात वाजता दिल्लीस रवाना झाले. रविवारी दिल्लीत पंतप्रधानांनी निती आयोगाची बैठक बोलावली आहे. या आयोगाच्या स्थापनेनंतर होणारी ही पहिली बैठक आहे. बैठकीत मुख्यमंत्री सहभागी होतील. त्यानंतर सोमवारीही मुख्यमंत्री दिल्लीस थांबतील. सोमवारी दिवसभर तसेच मंगळवारी सकाळी पार्सेकर हे केंद्रीय खाणमंत्री तोमर, केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर आणि मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांना भेटतील. गोव्यातील काही छोट्या खनिज खाणी तरी अगोदर सुरू व्हायला हव्यात, त्यासाठी पर्यावरणविषयक दाखले दिले जावेत, गोमंतकीय जनता खाणी सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहे, असे मुद्दे पार्सेकर यांच्याकडून तोमर व जावडेकर यांच्यासमोर मांडले जाणार आहेत. म्हणे वाहतूक वेळ वाढवा २००७ ते २०१२ या कालावधीत गोव्यातील खाणग्रस्त भागांमध्ये खनिज मालाची प्रचंड वाहतूक झाली होती. सुमारे २६ हजार ट्रक त्या वेळी खाणग्रस्त भागांतून धावत होते, अशी माहिती यापूर्वी उजेडात आली आहे. खाणग्रस्त भागात ट्रकांमुळे त्या वेळी खूप अपघातही होत होते. तथापि, गोव्यातील ट्रकमालकांनी आता सरकारने खनिज वाहतूक वेळेत वाढ करून द्यावी, अशी मागणी केली आहे. दिवसाला आठ तास खनिज वाहतूक करावी, असा सध्याचा नियम आहे. आपल्याला दररोज अधिकाधिक वेळ खनिज वाहतूक करायला मिळावी व तसे झाले तरच आमची तीन वर्षांत खराब बनलेली आर्थिक स्थिती सुधारेल, असे ट्रकमालकांचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)