शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

खाणी दीड वर्ष सुरू होणे अशक्य

By admin | Updated: October 3, 2014 01:14 IST

व्यावसायिकही नाराज : लिज धोरणात स्पष्ट रोडमॅपचा अभाव, मसुदा आता पाठविणार अर्थ व कायदा खात्याकडे

पणजी : राज्यातील खाणी दीड वर्षभर सुरू होणे जवळजवळ अशक्य आहे. सरकारच्या लिज धोरणावर खाण व्यावसायिकही खुश नाहीत. खाणी सुरू करण्यासाठी स्पष्ट असा रोडमॅप लिज धोरणात नाही, अशा प्रकारची भावना खनिज व्यावसायिक व्यक्त करत आहेत. मंत्रिमंडळाने बुधवारी गोवा खनिज लिजेस धोरणाचा मसुदा मंजूर केला. यापुढे या मसुद्याची कायदा खाते छाननी करणार आहे. राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांकडून मंजुरी घेऊन हा मसुदा मंत्रिमंडळासमोर मांडला होता. कायदा खात्याकडे तो पाठवला नव्हता. मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव आणण्यापूर्वी अर्थ खात्याकडूनही यास मंजुरी घेतली नव्हती. कायदा व अर्थ खात्याकडे मसुद्याची प्रत पाठवली गेली असती, तर कोणत्याही स्तरावर मसुद्यातील तरतुदींबाबतची माहिती बाहेर फुटली असती. तो ‘धोका’ टाळण्यासाठी मसुदा थेट मंत्रिमंडळासमोर आणल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आता हा मसुदा अर्थ व कायदा खात्याकडे पाठवला जाणार असल्याचे सरकारने बुधवारी स्पष्ट केले आहे. खाणी लवकर सुरू होण्यासाठी जो रोडमॅप धोरणात असायला हवा होता, तो मुळीच दिसत नाही, अशी प्रतिक्रिया खनिज निर्यातदारांपैकी काहीजणांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २८ अर्जदारांना खाणी लवकर सुरू झालेल्या हव्या आहेत. गेल्या वर्षी सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर कागदपत्रे ठीक असल्याचे मानून सरकारने स्टॅम्प ड्युटी स्वीकारली होती. मग आता मिनरल कन्सेशन्स नियम ३७ व ३८ अन्वये नोटिसा पाठवून सुनावणी वगैरे घेण्याची पद्धत का अवलंबिली, असा प्रश्न अर्जदारांपैकी काहीजण उपस्थित करत आहेत. आपले अर्ज फेटाळले जातील या भीतीपोटी निर्यातदार व अर्जदार उघड बोलत नाहीत; पण लिज धोरण समाधानकारक नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. सरकारने आम्हाला लिज नूतनीकरण करून देणार, अशी हमी देऊन स्टॅम्प ड्युटी भरून घेतली. आमचे तीनशे-चारशे कोटी रुपये वापरले व आता आमची छाननी केली जात आहे. म्हणजे ही फसवणूक आहे, अशी प्रतिक्रिया एका अर्जदाराने व्यक्त केली. गोंधळ आणखी वाढला : मेलवानी सरकारला सुधारित खाण धोरणाद्वारे अनेक प्रश्न व वाद सोडविण्याची चांगली संधी होती; पण सरकारचे नवे लिज मंजुरी धोरण पाहता गोंधळ आणखी वाढला आहे, अशी प्रतिक्रिया खनिज व्यावसायिक हरीष मेलवानी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, अगोदरच्याच अर्जदारांना पुन्हा खाणी देण्याच्या पद्धतीबाबत एनजीओ व अन्य घटकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. नवे लिज धोरण ठरविण्यापूर्वी सरकारने खाणमालकांशी किंवा एनजीओंशीही चर्चा केली नाही. खाण व्यवसाय सुरू व्हावा म्हणून लिज धोरणात स्पष्ट अशी मार्गदर्शक तत्त्वेच (पान २ वर)