शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खाण आंदोलकांनी घेतला पोलिसांचा धसका, समन्स मिळताच जामिनासाठी धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 23:12 IST

आंदोलनाच्या नावावर धुडगूस घातलेले खाण आंदोलक पोलिसांचे समन्स मिळाल्यावर पोलीस स्थानकात येण्याचे धाडस कुणीच करीत नाही.

पणजी: आंदोलनाच्या नावावर धुडगूस घातलेले खाण आंदोलक पोलिसांचे समन्स मिळाल्यावर पोलीस स्थानकात येण्याचे धाडस कुणीच करीत नाही. समन्स मिळाल्यावर सर्वात अगोदर अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली जात आहे. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांचा किती धसका घेतला आहे हे स्पष्ट होत आहे.१९ मार्चचा मोर्चाच्या वेळी दादागिरी करून लोकांना मारहाण करण्याच्या प्रकरणानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार आणि दुसऱ्या दिवसापासून सुरू केलेला समन्सचा मार यामुळे आंदोलकांना कोणती भानगड करून बसलो असेच झाले आहे. पणजी पोलिसांनी आतापर्यंत ७० हून अधिक जणांना समन्स पाठविले आहेत, परंतु कुणीही समन्स पाठविल्या नंतर पोलीस स्थानकात येण्यासाठी हिंमत दाखवित नाही. पूर्वी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतात व नंतर पोलीस स्थानकात येतात असे प्रकार सध्या सुरू आहे. आतापर्यंत २० हून अधिक लोकांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केले आहेत. तसेच नवीन २२ जणांना शनिवारी समन्स बजावण्यात आले होते. ते लोकही अटकपूर्व जामीन मिळविण्यसाठी तयारी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. सोमवारी ते अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.दरम्यान अटकपूर्व अर्जासाठी अर्ज केल्यानंतर अंतरीम जामीन मिळणार या अपेक्षेने अर्ज केले जात आहेत. अंतरिम दिलासा मिळाला नाही तर अशा आंदोलकांना पोलीस अटक करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण समन्स बजावूनही हजर न राहिलेल्या आंदोलकांना ताब्यात घेऊन पणजीत आणा अशा सूचना करणारे वायरलेस कळंगूट व संबंधित पोलीस स्थानकांना पणजी पोलिसांनी पाठविले होते. त्यामुळे अशा लोकांची अटकही होण्याची शक्यता आहे.