शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जेटींवरून खनिज वाहतूक सुरू, सल्लागार समितीने घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 21:58 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जेटींवरून (रॉयल्टी भरलेल्या) खनिजाची वाहतूक काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. तत्पूर्वी तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार समितीने न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेतला व अशा प्रकारे खनिज वाहतूक करण्यासाठी जेटी खुल्या करण्याची सूचना शासकीय यंत्रणेला केली.

पणजी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जेटींवरून (रॉयल्टी भरलेल्या) खनिजाची वाहतूक काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. तत्पूर्वी तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार समितीने न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेतला व अशा प्रकारे खनिज वाहतूक करण्यासाठी जेटी खुल्या करण्याची सूचना शासकीय यंत्रणेला केली.वेदांता, फोमेन्तो ह्या कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करून रॉयल्टी भरलेल्या मालाची बाजर्द्वारे वाहतूक करू दिली जावी,  अशी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने दि. 15 मार्चला किंवा तत्पूर्वी ज्या मालाची रॉयल्टी भरली गेली व जो माल जेटींवर आहे, त्याची वाहतूक करण्यास परवानगी दिली. म्हणजेच हा खनिज माल जेटींवरून बंदरावर आणि तिथून जहाजासाठी निर्यातीसाठी नेता येतो. तशा प्रकारचीच चर्चा गोवा मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीतही गुरुवारी झाली. लिज क्षेत्रबाहेर अन्य कुठेही ठेवलेल्या खनिज मालाची वाहतूक करता येत नाही. अशा मालासाठी अगोदर रॉयल्र्टी भरलेली असली तरी, त्याची वाहतूक करणो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शक्य नाही. मात्र वजन माप काटय़ाच्या पुढे जो खनिज माल गेलेला आहे, त्या खनिज मालाची वाहतूक करण्यास तीन मंत्र्यांच्या समितीने मंजुरी दिल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला त्याविषयी प्रतिज्ञापत्रद्वारे कळविले जाईल किंवा खंडपीठाकडून त्याविषयी स्पष्टीकरण घेतले जाईल, असेही एका मंत्र्याने लोकमतला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने फक्त जेटींवरील मालाचीच वाहतूक करता येते असे म्हटलेले आहे पण हायकोर्टाकडून अॅडव्हकेट जनरल सा:या शंकांचे निरसन करून घेतील, असे मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले.

हरवळेत पुन्हा पाणी शक्य काही खनिज कंपन्या खाणींच्या खंदकातील पाणी उसपत नसल्याने हरवळे येथील धबधबा सुकल्याचा विषय सरकारने गंभीरपणो घेतला. साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर, मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांच्या उपस्थितीत साखळी मतदारसंघातील काही खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्या बैठकीवेळी खनिज व्यवसायिकांनी खंदकातील पाणी काढावे अशा सूचना दिल्या गेल्या. तसेच जलसंसाधन खाते आपले आणखी दोन पंप बसवून पाणी काढणार आहे. एक पंप खात्याने बसवला आहे. हे पाणी कुळागरे व शेतांसाठी सोडले जाईल. शिवाय हरवळेच्या धबधब्यातही पुन्हा पाणी येण्यास हे प्रयत्न मदतरुप ठरतील.

टॅग्स :goaगोवा