शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खनिज खाणप्रश्नी तोडगा निघेल, धीर धरावा - विनय सहस्रबुद्धे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 20:00 IST

गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न हा केंद्र सरकारसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विषय पोहचलेला आहे. न्यायसंस्थेशी तो विषय निगडीत असल्याने तोडगा निघण्यास विलंब झाला.

पणजी - गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न हा केंद्र सरकारसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विषय पोहचलेला आहे. न्यायसंस्थेशी तो विषय निगडीत असल्याने तोडगा निघण्यास विलंब झाला. थोडा जास्त धीर धरण्याची गरज आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीही प्रश्न सुटू शकतो, असा आम्हाला विश्वास वाटत असल्याचे भाजपचे केंद्रीय नेते व राज्यसभा खासदार विनय सह बुद्धे यांनी बुधवारी येथे सांगितले.

भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्याच्या कामासाठी लोकांच्या सूचना व अपेक्षा गोळा करण्याची मोहीम पक्ष राबवत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सह बुद्धे गोव्यात आले आहेत. त्यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, गोमंतकीयांनी त्यांच्या अपेक्षा आम्हाला कळावाव्यात. भाजपचे रथ सगळीकडे फिरत असून रथासोबत पेटय़ा आहेत. त्या पेटीत लोकांनी सूचना किंवा अपेक्षा लिहून टाकावी. ती भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पंतप्रधानांर्पयत पोहचेल. त्यानुसार भाजपचा जाहिरनामा तयार होईल. जर गोव्याला खास दर्जा मिळावा अशी अपेक्षा असेल तर तशीही अपेक्षा लिहून पाठवावी, म्हणजे त्यावर विचार करून जाहिरनाम्यात त्याचा समावेश करता येईल.

सह बुद्धे म्हणाले, की गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न हा पंतप्रधानांनी विचारात घेतलेला आहे. गोवा सरकार व केंद्र सरकार दोन्ही एकमेकांच्या समन्वयाने हा प्रश्न सुटावा व खाणी परत सुरू व्हाव्यात म्हणून प्रयत्नशील आहेत. केंद्र आता काही करणार नाही असे गोव्यातील एका मंत्र्याने म्हटलेले असेल तर मला त्याची काही कल्पना नाही. शेवटी खनिज खाणींचा विषय हा न्यायप्रविष्ट असल्याने तो क्लिष्ट बनला. केवळ केंद्र किंवा राज्य सरकारच्याच ते हातात असते तर एव्हाना तोडगा निघाला असता. या विषयात न्यायसंस्थेचा सहभाग गुंतलेला आहे हे लक्षात घ्यावे लागते. आज ना उद्या तोडगा हा  निघेलच. थोडी सहनशीलता ठेवूया.

दरम्यान, केंद्रात पुन्हा मोदी सरकार अधिकारावर येईल. कारण गेली साडेचार वर्षे बरेच काम विद्यमान सरकारने केले आहे, असे सह बुद्धे म्हणाले. यावेळी विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, सदानंद शेट तानावडे व दामू नाईक उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा