शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

म्हादईच्या सुनावण्यांवर कोट्यवधींचा निष्फळ खर्च

By admin | Updated: July 21, 2016 02:23 IST

पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत

पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी केला. म्हादईप्रश्नी युक्तिवाद करणारे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी आणि अन्य वकिलांवर सरकारने आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले. या प्रश्नावर २00७ सालापासून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहेत. या काळात एकूण २८ सुनावण्या झाल्या. या दरम्यान १0 लाख ८९ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर २0१२ ते २0१५ पर्यंत २२ सुनावण्या झाल्या. या सुनावण्यांदरम्यान सरकारने २ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च केला. यात नाडकर्णी यांच्यावर ८६ लाख ८९ हजार रुपये खर्च केले आहेत. या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असून म्हादईप्रश्नी सरकार केवळ उधळपट्टी करत आहे, असा दावा ताम्हणकर यांनी केला. २0 आॅक्टोबर २0१३ ते २४ आॅक्टोबर २0१३ या पाच दिवसांसाठी पी.एस. नरसिंहा यांच्यावर ६ लाख ६0 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्यासमवेत जाणाऱ्या त्यांचे असिस्टंट इत्यादींच्या खर्चाची वेगळी रक्कम नमूद करण्यात आली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना तेव्हाचे अ‍ॅडव्होकेट जनरल कंटक यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या खर्चात भ्रष्टाचार असल्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर विधानसभेत ओरडून सांगत असत. मात्र, आता भाजपच्या काळात लाखोंनी रुपयांची उधळपट्टी चालली असताना पर्रीकर मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा प्रश्न ताम्हणकर यांनी केला आहे. जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रकरणात नैतिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा मांद्रेकर यांनी स्वत: पदाचा राजीनामा द्यावा किंवा म्हादई प्रकरण हाताळण्यास अपयशी ठरलेले मांद्रेकर यांच्याकडून सरकारने राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली. (प्रतिनिधी)