शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

म्हादईच्या सुनावण्यांवर कोट्यवधींचा निष्फळ खर्च

By admin | Updated: July 21, 2016 02:23 IST

पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत

पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी केला. म्हादईप्रश्नी युक्तिवाद करणारे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी आणि अन्य वकिलांवर सरकारने आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले. या प्रश्नावर २00७ सालापासून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहेत. या काळात एकूण २८ सुनावण्या झाल्या. या दरम्यान १0 लाख ८९ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर २0१२ ते २0१५ पर्यंत २२ सुनावण्या झाल्या. या सुनावण्यांदरम्यान सरकारने २ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च केला. यात नाडकर्णी यांच्यावर ८६ लाख ८९ हजार रुपये खर्च केले आहेत. या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असून म्हादईप्रश्नी सरकार केवळ उधळपट्टी करत आहे, असा दावा ताम्हणकर यांनी केला. २0 आॅक्टोबर २0१३ ते २४ आॅक्टोबर २0१३ या पाच दिवसांसाठी पी.एस. नरसिंहा यांच्यावर ६ लाख ६0 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्यासमवेत जाणाऱ्या त्यांचे असिस्टंट इत्यादींच्या खर्चाची वेगळी रक्कम नमूद करण्यात आली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना तेव्हाचे अ‍ॅडव्होकेट जनरल कंटक यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या खर्चात भ्रष्टाचार असल्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर विधानसभेत ओरडून सांगत असत. मात्र, आता भाजपच्या काळात लाखोंनी रुपयांची उधळपट्टी चालली असताना पर्रीकर मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा प्रश्न ताम्हणकर यांनी केला आहे. जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रकरणात नैतिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा मांद्रेकर यांनी स्वत: पदाचा राजीनामा द्यावा किंवा म्हादई प्रकरण हाताळण्यास अपयशी ठरलेले मांद्रेकर यांच्याकडून सरकारने राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली. (प्रतिनिधी)