शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

म्हादईच्या सुनावण्यांवर कोट्यवधींचा निष्फळ खर्च

By admin | Updated: July 21, 2016 02:23 IST

पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत

पणजी : म्हादईप्रश्नी सरकार न्यायालयीन लढाई लढत असले तरी या प्रश्नावर आतापर्यंत जे कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी केला. म्हादईप्रश्नी युक्तिवाद करणारे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी आणि अन्य वकिलांवर सरकारने आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले. या प्रश्नावर २00७ सालापासून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहेत. या काळात एकूण २८ सुनावण्या झाल्या. या दरम्यान १0 लाख ८९ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर २0१२ ते २0१५ पर्यंत २२ सुनावण्या झाल्या. या सुनावण्यांदरम्यान सरकारने २ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च केला. यात नाडकर्णी यांच्यावर ८६ लाख ८९ हजार रुपये खर्च केले आहेत. या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असून म्हादईप्रश्नी सरकार केवळ उधळपट्टी करत आहे, असा दावा ताम्हणकर यांनी केला. २0 आॅक्टोबर २0१३ ते २४ आॅक्टोबर २0१३ या पाच दिवसांसाठी पी.एस. नरसिंहा यांच्यावर ६ लाख ६0 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्यासमवेत जाणाऱ्या त्यांचे असिस्टंट इत्यादींच्या खर्चाची वेगळी रक्कम नमूद करण्यात आली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना तेव्हाचे अ‍ॅडव्होकेट जनरल कंटक यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या खर्चात भ्रष्टाचार असल्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर विधानसभेत ओरडून सांगत असत. मात्र, आता भाजपच्या काळात लाखोंनी रुपयांची उधळपट्टी चालली असताना पर्रीकर मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा प्रश्न ताम्हणकर यांनी केला आहे. जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रकरणात नैतिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा मांद्रेकर यांनी स्वत: पदाचा राजीनामा द्यावा किंवा म्हादई प्रकरण हाताळण्यास अपयशी ठरलेले मांद्रेकर यांच्याकडून सरकारने राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली. (प्रतिनिधी)