शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गोव्यात किनारा सफाई प्रश्नावर उपसभापती मायकल लोबो आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 14:52 IST

गोव्याचे सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देमायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला.सोमवारी सायंकाळी ५ वाजता लोबो हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेणार आहेत.लोबो यांनी धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेतली व किनाऱ्यावरील कचरा न काढला गेल्याने निर्माण झालेली दुर्गंधी याविषयी कल्पना दिली.

पणजी - गोव्याचे सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. या प्रश्नावर सोमवारी सायंकाळी ५ वाजता लोबो हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेणार आहेत.

लोबो यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेतली व किनाऱ्यावरील कचरा न काढला गेल्याने निर्माण झालेली दुर्गंधी याविषयी कल्पना दिली. यावेळी पर्यटन खात्याचे सचिव,  खात्याचे संचालक मिनीन डिसूजा, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले की, किनाऱ्यावरील कचरा व्यवस्थापन हाताळण्यास किंवा त्यासंबंधीचे कंत्राट देण्याची कोणतीही पात्रता पर्यटन खात्याकडे नाही. याउलट गोवा घन कचरा महामंडळाकडे २२ अभियंते आहेत यातील ४ अभियंते कचरा विषयातील तज्ञ आहेत तसेच पुरेसा कर्मचारीवर्ग महामंडळाकडे आहे. कचरा विषयक कंत्राट देण्याचे काम हे महामंडळच योग्यरीत्या बजावू शकते. त्यामुळे पर्यटन खात्याकडून ताबडतोब काढून घ्यावे. 'ते  पुढे  म्हणाले की, या प्रश्नावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आज सायंकाळी ५ वाजता आपण भेट मागितली आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही किनाऱ्यावरील अस्वच्छतेची कल्पना देणार आहे. कळंगुटचा स्थानिक आमदार म्हणून या भागातील किनाऱ्यावर जी घाण पसरली आहे त्याला मीच जबाबदार ठरतो, असे नमूद करून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

गेले काही दिवस लोबो सरकारवर शरसंधान करीत असून अलीकडेच नोकर्‍यांच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवून प्रशासन कोलमडले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता किनारा साफसफाईच्या प्रश्नावर त्यांनी स्वकीयांशी बंड पुकारले आहे. लोबो म्हणाले की तूर्त पर्यटन खात्याने २०० कामगार नेमले असल्याचा दावा केला जात असला तरी किनार्‍यांची कुठेही साफसफाई झालेले नाही. कळंगुट, बागा, कांदळी या स्थानिक पंचायतींना आपण ओला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे परंतु इतर किनाऱ्यांवर स्थिती गंभीर आहे. गेली दोन वर्षे दृष्टी कंपनीचे कर्मचारी योग्य पद्धतीने सफाई करीत होते परंतु या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आणि किनाऱ्यावरील कचरा वाढू लागला. ही परिस्थिती हाताळण्यास पर्यटन खाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. खात्याकडून काम काढून घेणार नसाल तर महामंडळ कशाला हवे? असा सवाल करून हे महामंडळच बरखास्त करा, अशी मागणी त्यांनी केली.

लोबो म्हणाले की, पर्यटन खात्याचे काम कचरा साफ करणे नव्हे, पर्यटन खात्याने गोव्यात अधिकाधिक देशी-विदेशी पर्यटक कसे येतील याकडे लक्ष द्यायला हवे त्यासाठी योग्य ती धोरणे तयार करायला हवीत. गेल्या काही वर्षात विदेशी पर्यटकांची संख्या गोव्यात प्रचंड घटली आहे. पर्यटन व्यावसायिक किनाऱ्यावरील कचरा समस्या निर्माण झाल्यास त्याचा आणखी फटका बसणार आहे. त्यामुळे आपली मागणी मान्य न झाल्यास कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. गोव्यात कळंगुट, कांदोळी, बागा या किनाऱ्यांबरोबरच हनजुना, वागातोर, मोरजी हरमल तर दक्षिण गोव्यात बेतालभाटी, कोलवा, माजोर्डा आदी प्रमुख किनारे आहेत. त्या सर्व किनाऱ्यावर अस्वच्छता निर्माण झालेली आहे.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणManohar Parrikarमनोहर पर्रीकर