शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात किनारा सफाई प्रश्नावर उपसभापती मायकल लोबो आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 14:52 IST

गोव्याचे सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देमायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला.सोमवारी सायंकाळी ५ वाजता लोबो हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेणार आहेत.लोबो यांनी धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेतली व किनाऱ्यावरील कचरा न काढला गेल्याने निर्माण झालेली दुर्गंधी याविषयी कल्पना दिली.

पणजी - गोव्याचे सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. या प्रश्नावर सोमवारी सायंकाळी ५ वाजता लोबो हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेणार आहेत.

लोबो यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेतली व किनाऱ्यावरील कचरा न काढला गेल्याने निर्माण झालेली दुर्गंधी याविषयी कल्पना दिली. यावेळी पर्यटन खात्याचे सचिव,  खात्याचे संचालक मिनीन डिसूजा, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले की, किनाऱ्यावरील कचरा व्यवस्थापन हाताळण्यास किंवा त्यासंबंधीचे कंत्राट देण्याची कोणतीही पात्रता पर्यटन खात्याकडे नाही. याउलट गोवा घन कचरा महामंडळाकडे २२ अभियंते आहेत यातील ४ अभियंते कचरा विषयातील तज्ञ आहेत तसेच पुरेसा कर्मचारीवर्ग महामंडळाकडे आहे. कचरा विषयक कंत्राट देण्याचे काम हे महामंडळच योग्यरीत्या बजावू शकते. त्यामुळे पर्यटन खात्याकडून ताबडतोब काढून घ्यावे. 'ते  पुढे  म्हणाले की, या प्रश्नावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आज सायंकाळी ५ वाजता आपण भेट मागितली आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही किनाऱ्यावरील अस्वच्छतेची कल्पना देणार आहे. कळंगुटचा स्थानिक आमदार म्हणून या भागातील किनाऱ्यावर जी घाण पसरली आहे त्याला मीच जबाबदार ठरतो, असे नमूद करून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

गेले काही दिवस लोबो सरकारवर शरसंधान करीत असून अलीकडेच नोकर्‍यांच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवून प्रशासन कोलमडले असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता किनारा साफसफाईच्या प्रश्नावर त्यांनी स्वकीयांशी बंड पुकारले आहे. लोबो म्हणाले की तूर्त पर्यटन खात्याने २०० कामगार नेमले असल्याचा दावा केला जात असला तरी किनार्‍यांची कुठेही साफसफाई झालेले नाही. कळंगुट, बागा, कांदळी या स्थानिक पंचायतींना आपण ओला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे परंतु इतर किनाऱ्यांवर स्थिती गंभीर आहे. गेली दोन वर्षे दृष्टी कंपनीचे कर्मचारी योग्य पद्धतीने सफाई करीत होते परंतु या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आणि किनाऱ्यावरील कचरा वाढू लागला. ही परिस्थिती हाताळण्यास पर्यटन खाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. खात्याकडून काम काढून घेणार नसाल तर महामंडळ कशाला हवे? असा सवाल करून हे महामंडळच बरखास्त करा, अशी मागणी त्यांनी केली.

लोबो म्हणाले की, पर्यटन खात्याचे काम कचरा साफ करणे नव्हे, पर्यटन खात्याने गोव्यात अधिकाधिक देशी-विदेशी पर्यटक कसे येतील याकडे लक्ष द्यायला हवे त्यासाठी योग्य ती धोरणे तयार करायला हवीत. गेल्या काही वर्षात विदेशी पर्यटकांची संख्या गोव्यात प्रचंड घटली आहे. पर्यटन व्यावसायिक किनाऱ्यावरील कचरा समस्या निर्माण झाल्यास त्याचा आणखी फटका बसणार आहे. त्यामुळे आपली मागणी मान्य न झाल्यास कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. गोव्यात कळंगुट, कांदोळी, बागा या किनाऱ्यांबरोबरच हनजुना, वागातोर, मोरजी हरमल तर दक्षिण गोव्यात बेतालभाटी, कोलवा, माजोर्डा आदी प्रमुख किनारे आहेत. त्या सर्व किनाऱ्यावर अस्वच्छता निर्माण झालेली आहे.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणManohar Parrikarमनोहर पर्रीकर