शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

म्हादईचे पाणी आटले; डिसेंबरच्या मध्यावरच नदीची पातळी खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 13:04 IST

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाण्याची पातळी अर्ध्यापेक्षा खूपच कमी झाल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : कुणकुंबी-कर्नाटक येथे कळसा भांडुरा प्रकल्पच्या माध्यमातून कर्नाटक सरकारने म्हादई नदी वळविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम आता म्हादई नदीतील पाणी पातळीवर जाणवू लागला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाण्याची पातळी अर्ध्यापेक्षा खूपच कमी झाल्याचे दिसत आहे.

सत्तरी तालुक्यातून म्हादई नदी सुमारे तीस किलोमीटरपेक्षा जास्त वाहत आहे. यावर्षी भरपूर पाउस झाला असल्याने नदीला मुबलक पाणी मिळेल अशी आशा होती. पण डिसेंबर महिन्यातच अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने सत्तरीत शेतकरी चिंतेत सापडले आहे. म्हादई नदी राज्यात साट्रे गावात प्रवेश करते. त्या गावातच सध्या पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे आगामी काळात या गावांची स्थिती काय होईल, हे आगामी काळच ठरविणार आहे.

साट्रे गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावात सध्या म्हादई नदीची पाण्याची पातळी झपाट्याने घटली आहे. दरवर्षी मे महिन्यात जशी स्थिती असते, तशी स्थिती आता आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल, असे लोकांचे म्हणणे आहे. म्हादई नदीसाट्रे गावानंतर नानोडा, उस्ते, सोनाळ, सावर्डे, वेळगे, खडकी, बराजण, सार्वशे, भिरोंडा, गुळेली, गांजे व उसगावमार्गे वाहते. या गावातील नदीच्या पाण्याचा स्तर खालावत चालला आहे.

वेळूस, बाराजण नद्यांवरही परिणाम

म्हादई नदीच्या घटलेल्या पाण्याच्या पातळीमुळे सत्तरीतील उपनद्यांवर परिणाम झाला आहे. वेळूस, बाराजणसारख्या उपनद्या आटण्याच्या मार्गावर आहे. बाराजण येथील नदीची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच खालावली आहे. बाराजण येथील नागरिकांनीही नदीच्या घटलेल्या पाण्याच्या पातळीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :goaगोवा