शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी अपयश; गोवा सरकारने लोकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2024 10:18 IST

आतापर्यंत काय केले ते जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कर्नाटकला म्हादईवर कळसा भंडुरा प्रकल्पासाठी दिलेली डीपीआर मंजुरी मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडता आले असते; परंतु दोन्ही खासदारांनी गेल्या कार्यकाळात काहीच केले नाही, अशी नाराजीची भावना लोकांमध्ये आहे. म्हादई गोव्याची जीवनवाहिनी मानली जाते.

कर्नाटकने म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी नव्याने काम सुरू केले आहे. भविष्यात कळसा भंडुरा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्या राज्याने कंबर कसली आहे. कणकुंबी येथे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. लोकांमध्ये यामुळे नाराजी आहे. वास्तविक केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजप सरकार सत्तेवर असतानाही 'डबल इंजिन' सरकारकडून गोव्याच्या खासदारांना डीपीआर रद्द करून घेता आला नाही. 

लोकांमध्ये अशी भावना आहे की, सरकारने 'प्रवाह' प्राधिकरण स्थापन करून लोकांच्या तोंडाला केवळ पाने पुसली. 'प्रवाह'ची पहिली बैठक १३ फेब्रुवारीला झाली. अध्यक्ष पी. एम. स्कॉट यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हादई खोऱ्यातील पाण्याचा शाश्वत समन्यायिक वापराबाबत विचार करून त्यावर तोडगा काढला जाईल.

आतापर्यंत काय केले ते जाहीर करा

लोकसभा निवडणुका ७ मे रोजी होणार असून राष्ट्रीय पक्षांचा प्रचार सुरू होऊ लागला आहे. शेवटी राजकारणात प्रवेश म्हणजे सात पिढ्यांचा उद्धार असतो. त्यात स्वतःचा पगार, भत्ते, निवृत्ती वेतन, विमान सेवा अधिक, रेल्वे सेवा कमी, महागडा औषधोपाचार, विदेश वाऱ्या, एखादा उद्योग पदरात पाडून घेणे, विकासाचे फुगीर आकडे स्वतः ठरवणे म्हणजे लोकसभा खासदार होय, प्रश्न सोडविताना स्वतःचा, नातेवाइकांचा व नंतर लोकांचा क्रम असतो. आयुष इस्पितळ प्रकल्पात गोमंतकीय लोकांचा भरणा आहे का, असे विचारल्यास जनता विचार करावा लागतो. सीआरझेड, वाहतूक कायदा, स्थानिक टॅक्सी व्यावसायिक, मोपा विमानतळ प्रकल्प, कळसा भंडूरा प्रकल्प व केंद्रीय संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी अशा कित्येक समस्या आहे. त्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर किती प्रयत्न केले, याचा हिशोब द्यायला पाहिजे. गोव्यातील सरकारने केंद्राशी बोलतो, असे म्हणून वेळ मारून नेली. केंद्रात सत्तेत असूनही गोव्यासाठी काय काय केलात, हे जाहीर करावे. - नामदेव तुळसकर, पालये

 

टॅग्स :goaगोवा