शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

म्हादईप्रश्नी मौन पाळलेल्या भाजपाच्या तिन्ही खासदारांची खाणप्रश्नी कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 12:20 IST

गोव्यातील खनिज खाणप्रश्नी राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची टीका गोव्यातील भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई व इतर करू लागले आहेत.

पणजी : गोव्यातील खनिज खाणप्रश्नी राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची टीका गोव्यातील भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई व इतर करू लागले आहेत. खाणपट्ट्यातील भाजपाच्या आमदारांमधील वाढत्या अस्वस्थतेवर थोडा उपाय निघावा या हेतूने आता भाजपच्या गोव्यातील तिन्ही खासदारांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. शहा यांनी गोव्यातील खनिज खाणप्रश्नी हस्तक्षेप करावा अशी मागणी घेऊन भाजपचे तिन्ही खासदार प्रथम शहा यांना भेटणार आहेत.

गोव्यातील म्हादई पाणीप्रश्नी गोव्यातील तिन्ही भाजप खासदार कधीच शहा याना भेटले नाहीत. कर्नाटकने म्हादई पाणी प्रश्नी हट्टी भूमिका सोडावी किंवा गोव्याचे पाणी वळवू नये म्हणून श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर  व विनय तेंडुलकर या तिन्ही खासदारांनी कधीच शहा यांना किंना नितीन गडकरी यांना किंवा केंद्रीय जलसंसाधन मंत्र्यांनाही साकडे घातले नाहीत. म्हादई पाणीप्रश्नी केंद्रातील सर्व नेत्यांनी कर्नाटकचीच बाजू घेतली तेव्हा केंद्रीय मंत्री असलेले गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा लोकसभा खासदार नरेंद्र सावईकर व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी निषेधाचाही सूर लावला नाही. गोमंतकीय जनता या तिन्ही खासदारांच्या सुमार कामगिरीवार लक्ष ठेवून आहे. खनिज खाणप्रश्नी देखील यापूर्वी कधीच या तिन्ही खासदारांनी मिळून गोव्याचा विषय केंद्रीय नेतृत्वासमोर मांडला नाही. खनिज खाणींचा लिलावच होणार असे तीनपैकी एक खासदार भाजपाच्या काही आमदारांना सांगत होता. आता आमदारांनी व लोकांनीही राज्यात दबावाचे वातावरण निर्माण केल्यानंतर आम्ही आता अमित शहा यांना भेटू असे आश्वासन निलेश काब्राल व इतर आमदारांना भाजपाच्या खासदारांनी देऊन काब्राल यांना तूर्त थोडे शांत केले आहे. येत्या दि. 15 पासून गोव्यात खनिज खाण बंदी लागू होत आहे. खाण खात्याने तर दि. 13 पासूनच बंदी लागू करणारा आदेश जारी केला. त्याला गोव्यातील खासदारांनी आक्षेप घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा दि. 7 फेब्रुवारीला आला. त्यानंतर गेला महिनाभर गोव्याचे तिन्ही खासदार एकत्रपणो एकही दिवस अमित शहा यांच्याकडे गेले नाही किंवा त्यांनी कधीच एकत्रितपणो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात धडक दिली नाही. याउलट गोव्यातील खनिज निर्यातदार मात्र पंतप्रधानांच्या कार्यालयार्पयत जाऊन आले आहेत. गोव्यातील खनिज खाणींचा लिलाव करावा हे केंद्र सरकारचे धोरण आहे. केंद्र सरकारचे धोरण गोव्यासारख्या छोटय़ा राज्यासाठी बदलू शकेल हा वेगळा विषय आहे पण गोव्यातील तिन्ही खासदारांनी राज्यातील कुठच्याच विषयावर कधीच एकत्रितपणो आवाज उठवला नाही हे गोमंतकीय जनतेच्या लक्षात आले आहे. गोव्यातील आमदार, मंत्री, खनिज व्यवसायिकांमध्येही तशीच चर्चा सुरू आहे.