शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

म्हादईप्रश्नी मौन पाळलेल्या भाजपाच्या तिन्ही खासदारांची खाणप्रश्नी कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 12:20 IST

गोव्यातील खनिज खाणप्रश्नी राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची टीका गोव्यातील भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई व इतर करू लागले आहेत.

पणजी : गोव्यातील खनिज खाणप्रश्नी राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची टीका गोव्यातील भाजपाप्रणीत आघाडी सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई व इतर करू लागले आहेत. खाणपट्ट्यातील भाजपाच्या आमदारांमधील वाढत्या अस्वस्थतेवर थोडा उपाय निघावा या हेतूने आता भाजपच्या गोव्यातील तिन्ही खासदारांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. शहा यांनी गोव्यातील खनिज खाणप्रश्नी हस्तक्षेप करावा अशी मागणी घेऊन भाजपचे तिन्ही खासदार प्रथम शहा यांना भेटणार आहेत.

गोव्यातील म्हादई पाणीप्रश्नी गोव्यातील तिन्ही भाजप खासदार कधीच शहा याना भेटले नाहीत. कर्नाटकने म्हादई पाणी प्रश्नी हट्टी भूमिका सोडावी किंवा गोव्याचे पाणी वळवू नये म्हणून श्रीपाद नाईक, नरेंद्र सावईकर  व विनय तेंडुलकर या तिन्ही खासदारांनी कधीच शहा यांना किंना नितीन गडकरी यांना किंवा केंद्रीय जलसंसाधन मंत्र्यांनाही साकडे घातले नाहीत. म्हादई पाणीप्रश्नी केंद्रातील सर्व नेत्यांनी कर्नाटकचीच बाजू घेतली तेव्हा केंद्रीय मंत्री असलेले गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा लोकसभा खासदार नरेंद्र सावईकर व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी निषेधाचाही सूर लावला नाही. गोमंतकीय जनता या तिन्ही खासदारांच्या सुमार कामगिरीवार लक्ष ठेवून आहे. खनिज खाणप्रश्नी देखील यापूर्वी कधीच या तिन्ही खासदारांनी मिळून गोव्याचा विषय केंद्रीय नेतृत्वासमोर मांडला नाही. खनिज खाणींचा लिलावच होणार असे तीनपैकी एक खासदार भाजपाच्या काही आमदारांना सांगत होता. आता आमदारांनी व लोकांनीही राज्यात दबावाचे वातावरण निर्माण केल्यानंतर आम्ही आता अमित शहा यांना भेटू असे आश्वासन निलेश काब्राल व इतर आमदारांना भाजपाच्या खासदारांनी देऊन काब्राल यांना तूर्त थोडे शांत केले आहे. येत्या दि. 15 पासून गोव्यात खनिज खाण बंदी लागू होत आहे. खाण खात्याने तर दि. 13 पासूनच बंदी लागू करणारा आदेश जारी केला. त्याला गोव्यातील खासदारांनी आक्षेप घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा दि. 7 फेब्रुवारीला आला. त्यानंतर गेला महिनाभर गोव्याचे तिन्ही खासदार एकत्रपणो एकही दिवस अमित शहा यांच्याकडे गेले नाही किंवा त्यांनी कधीच एकत्रितपणो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात धडक दिली नाही. याउलट गोव्यातील खनिज निर्यातदार मात्र पंतप्रधानांच्या कार्यालयार्पयत जाऊन आले आहेत. गोव्यातील खनिज खाणींचा लिलाव करावा हे केंद्र सरकारचे धोरण आहे. केंद्र सरकारचे धोरण गोव्यासारख्या छोटय़ा राज्यासाठी बदलू शकेल हा वेगळा विषय आहे पण गोव्यातील तिन्ही खासदारांनी राज्यातील कुठच्याच विषयावर कधीच एकत्रितपणो आवाज उठवला नाही हे गोमंतकीय जनतेच्या लक्षात आले आहे. गोव्यातील आमदार, मंत्री, खनिज व्यवसायिकांमध्येही तशीच चर्चा सुरू आहे.