शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

'विलीनीकरणात अस्तित्व नष्ट होते, पण माझ्याकडे सर्व पर्याय!': विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:10 IST

मी कोणतीही परिस्थिती समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे, हे माझे म्हणणे कायम आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींशी बोलणी झाल्यानंतरच मी काँग्रेसकडे युती केली व ती कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन करून स्थानिक पातळीवर तुम्ही नेतृत्व स्वीकारणार का?, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, काँग्रेसबद्दल आपुलकी असलेल्या जुन्या पिढीच्या या भावना आहेत. मी दूरदृष्टीने पुढे जात आहे. म्हणून कदाचित लोकांच्या या भावना असाव्यात. विलीनीकरणात वगैरे अस्तित्वही नष्ट होते. मी कोणतीही परिस्थिती समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहे.

काँग्रेसवर तुमचा विश्वास आहे का?, या प्रश्नावर सरदेसाई म्हणाले की, एकेकाळी ऐनवेळी काँग्रेसने मला तिकीट डावलले; परंतु लोक माझ्‌यासोबत होते म्हणून मी आमदार बनू शकलो, फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूकपूर्व युती मी राहुल गांधी यांना भेटून बोलणी झाल्यानंतरच केली होती. माझा शब्द पाळला आहे.

मडगाव मतदारसंघात एन्ट्री

मडगाव पालिका निवडणुकीत ११ प्रभागांमध्ये व कुडतरीतील ३ प्रभागांत माझे उमेदवार रिंगणात उतरवणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. विधानसभेसाठी दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा हा प्रवेश मानावा का? असे विचारले असता 'निश्चितच होय', असे उत्तर सरदेसाई यांनी दिले. ते म्हणाले की, माझे फातोर्डा मॉडेल यशस्वी झाले आहे. २५ सदस्यीय मडगाव पालिकेत बहुमतासाठी १३ नगरसेवक निवडून यावे लागतील. त्यामुळे मडगाव मतदारसंघातील प्रभागांमध्ये मला उमेदवार द्यावेच लागतील व ते मी देणारच आहे. मडगाव पालिकेत काँग्रेसचे काहीच अस्तित्व नसल्याचा दावा त्यांनी केला. केवळ मडगावमध्येच नव्हे, तर पुढे म्हापसा, तसेच अन्य पालिकांमध्येही गोवा फॉरवर्ड समविचारी लोकांशी बोलून पॅनल उभे करील.

उत्तरेत काँग्रेसला जिंकायचेच नव्हते

गत विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आणि भाजपला संधी मिळाली. या निवडणुकीतून विरोधकांना धडा मिळाला. लोकसभेवेळी दक्षिण गोव्याची जागा इंडिया आघाडीच्या उमेदवाराने जिंकली. उत्तर गोव्यात काँग्रेसला जिंकायचेच नव्हते, असे एकूण चित्र होते. उत्तरेत काँग्रेस अस्तित्वात तरी आहे का?, असा सवाल सरदेसाई यांनी केला.

आरजीला चूक कळेल

सरदेसाई एका प्रश्नावर म्हणाले की, आरजीने 'एकला चलो रे'चे धोरण अंगीकारले असले तरी 'एक ना, एक दिवस' या पक्षाच्या नेत्यांना आपली चूक कळून येईल. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर करून क्रांती घडवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण