शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

'विलीनीकरणात अस्तित्व नष्ट होते, पण माझ्याकडे सर्व पर्याय!': विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:10 IST

मी कोणतीही परिस्थिती समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे, हे माझे म्हणणे कायम आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींशी बोलणी झाल्यानंतरच मी काँग्रेसकडे युती केली व ती कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन करून स्थानिक पातळीवर तुम्ही नेतृत्व स्वीकारणार का?, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, काँग्रेसबद्दल आपुलकी असलेल्या जुन्या पिढीच्या या भावना आहेत. मी दूरदृष्टीने पुढे जात आहे. म्हणून कदाचित लोकांच्या या भावना असाव्यात. विलीनीकरणात वगैरे अस्तित्वही नष्ट होते. मी कोणतीही परिस्थिती समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास तयार आहे.

काँग्रेसवर तुमचा विश्वास आहे का?, या प्रश्नावर सरदेसाई म्हणाले की, एकेकाळी ऐनवेळी काँग्रेसने मला तिकीट डावलले; परंतु लोक माझ्‌यासोबत होते म्हणून मी आमदार बनू शकलो, फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूकपूर्व युती मी राहुल गांधी यांना भेटून बोलणी झाल्यानंतरच केली होती. माझा शब्द पाळला आहे.

मडगाव मतदारसंघात एन्ट्री

मडगाव पालिका निवडणुकीत ११ प्रभागांमध्ये व कुडतरीतील ३ प्रभागांत माझे उमेदवार रिंगणात उतरवणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. विधानसभेसाठी दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघात गोवा फॉरवर्डचा हा प्रवेश मानावा का? असे विचारले असता 'निश्चितच होय', असे उत्तर सरदेसाई यांनी दिले. ते म्हणाले की, माझे फातोर्डा मॉडेल यशस्वी झाले आहे. २५ सदस्यीय मडगाव पालिकेत बहुमतासाठी १३ नगरसेवक निवडून यावे लागतील. त्यामुळे मडगाव मतदारसंघातील प्रभागांमध्ये मला उमेदवार द्यावेच लागतील व ते मी देणारच आहे. मडगाव पालिकेत काँग्रेसचे काहीच अस्तित्व नसल्याचा दावा त्यांनी केला. केवळ मडगावमध्येच नव्हे, तर पुढे म्हापसा, तसेच अन्य पालिकांमध्येही गोवा फॉरवर्ड समविचारी लोकांशी बोलून पॅनल उभे करील.

उत्तरेत काँग्रेसला जिंकायचेच नव्हते

गत विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आणि भाजपला संधी मिळाली. या निवडणुकीतून विरोधकांना धडा मिळाला. लोकसभेवेळी दक्षिण गोव्याची जागा इंडिया आघाडीच्या उमेदवाराने जिंकली. उत्तर गोव्यात काँग्रेसला जिंकायचेच नव्हते, असे एकूण चित्र होते. उत्तरेत काँग्रेस अस्तित्वात तरी आहे का?, असा सवाल सरदेसाई यांनी केला.

आरजीला चूक कळेल

सरदेसाई एका प्रश्नावर म्हणाले की, आरजीने 'एकला चलो रे'चे धोरण अंगीकारले असले तरी 'एक ना, एक दिवस' या पक्षाच्या नेत्यांना आपली चूक कळून येईल. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर करून क्रांती घडवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण