शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:17 IST

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

लोकमत न्यू वर्क पणजी: 'विविधतेतील एकता हे समाजाचे सार आहे. आज राष्ट्राची लोकशाही मजबूत करण्यासाठी अर्थपूर्ण आणि फलदायी संवाद, विचारविमर्श, चर्चा आणि वादविवाद होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेल्या 'वामन वृक्ष कला' या २०० व्या पुस्तकाचे राजभवन येथील न्यू दरबार सभागृहात प्रकाशन केल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. 

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, माणसामध्ये सर्जनशीलता येतेच. पण ती टिकवून ठेवणे हे अवघड काम आहे. आपल्या प्राचीन वेदांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या सभ्यता, मूल्ये आणि शहाणपणाची आठवण करून देणारे महत्त्वपूर्ण विषयावर लिहिलेले वामन वृक्ष कला हे पुस्तक आहे. राज्यपाल पिल्लई हे प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी इतिहास, कायदा आणि राजकारणापासून अर्थव्यवस्था आणि सामाजिक घडामोडीपर्यंत विविध विषयांवर मल्याळम भाषेत १३० आणि इंग्रजीमध्ये ७० पुस्तके लिहिली आहेत.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी साहित्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, प्रत्येक जंगलात तुम्हाला मातृवृक्ष सापडेल, जे सभोवतालच्या झाडांशी नेहमीच संवाद साधत असते. हा संवाद नेहमीच मुळांच्या खाली ठेवला जातो, जो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे.' मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राज्यपाल पिल्लई हे १९७३ पासून अव्याहतपणे लिहित आहेत. १९८५ नंतर त्यांच्या लिखाणाचा वेग वाढला. त्यात सातत्य राहिले महत्त्वाचे आहे.

गोवा मला भावतो...

उपराष्ट्रपती म्हणाले की, गोवा राज्य हे निसर्गाने भरभरून दिलेले सुंदर असे ठिकाण आहे. येथील संस्कृती तसेच मनमिळावू लोकांमुळे मला नेहमीच गोव्याचे आकर्षण वाटते.

 

टॅग्स :goaगोवा