शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:17 IST

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

लोकमत न्यू वर्क पणजी: 'विविधतेतील एकता हे समाजाचे सार आहे. आज राष्ट्राची लोकशाही मजबूत करण्यासाठी अर्थपूर्ण आणि फलदायी संवाद, विचारविमर्श, चर्चा आणि वादविवाद होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेल्या 'वामन वृक्ष कला' या २०० व्या पुस्तकाचे राजभवन येथील न्यू दरबार सभागृहात प्रकाशन केल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. 

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, माणसामध्ये सर्जनशीलता येतेच. पण ती टिकवून ठेवणे हे अवघड काम आहे. आपल्या प्राचीन वेदांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या सभ्यता, मूल्ये आणि शहाणपणाची आठवण करून देणारे महत्त्वपूर्ण विषयावर लिहिलेले वामन वृक्ष कला हे पुस्तक आहे. राज्यपाल पिल्लई हे प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी इतिहास, कायदा आणि राजकारणापासून अर्थव्यवस्था आणि सामाजिक घडामोडीपर्यंत विविध विषयांवर मल्याळम भाषेत १३० आणि इंग्रजीमध्ये ७० पुस्तके लिहिली आहेत.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी साहित्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, प्रत्येक जंगलात तुम्हाला मातृवृक्ष सापडेल, जे सभोवतालच्या झाडांशी नेहमीच संवाद साधत असते. हा संवाद नेहमीच मुळांच्या खाली ठेवला जातो, जो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे.' मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राज्यपाल पिल्लई हे १९७३ पासून अव्याहतपणे लिहित आहेत. १९८५ नंतर त्यांच्या लिखाणाचा वेग वाढला. त्यात सातत्य राहिले महत्त्वाचे आहे.

गोवा मला भावतो...

उपराष्ट्रपती म्हणाले की, गोवा राज्य हे निसर्गाने भरभरून दिलेले सुंदर असे ठिकाण आहे. येथील संस्कृती तसेच मनमिळावू लोकांमुळे मला नेहमीच गोव्याचे आकर्षण वाटते.

 

टॅग्स :goaगोवा