शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सशक्त लोकशाहीसाठी अर्थपूर्ण संवाद गरजेचा: उपराष्ट्रपती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:17 IST

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

लोकमत न्यू वर्क पणजी: 'विविधतेतील एकता हे समाजाचे सार आहे. आज राष्ट्राची लोकशाही मजबूत करण्यासाठी अर्थपूर्ण आणि फलदायी संवाद, विचारविमर्श, चर्चा आणि वादविवाद होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेल्या 'वामन वृक्ष कला' या २०० व्या पुस्तकाचे राजभवन येथील न्यू दरबार सभागृहात प्रकाशन केल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. 

पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या साहित्यिक उपक्रमांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार डॉ. पी. टी. उषा आणि ज्ञानपीठ विजेते साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, माणसामध्ये सर्जनशीलता येतेच. पण ती टिकवून ठेवणे हे अवघड काम आहे. आपल्या प्राचीन वेदांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या सभ्यता, मूल्ये आणि शहाणपणाची आठवण करून देणारे महत्त्वपूर्ण विषयावर लिहिलेले वामन वृक्ष कला हे पुस्तक आहे. राज्यपाल पिल्लई हे प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी इतिहास, कायदा आणि राजकारणापासून अर्थव्यवस्था आणि सामाजिक घडामोडीपर्यंत विविध विषयांवर मल्याळम भाषेत १३० आणि इंग्रजीमध्ये ७० पुस्तके लिहिली आहेत.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी साहित्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, प्रत्येक जंगलात तुम्हाला मातृवृक्ष सापडेल, जे सभोवतालच्या झाडांशी नेहमीच संवाद साधत असते. हा संवाद नेहमीच मुळांच्या खाली ठेवला जातो, जो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे.' मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राज्यपाल पिल्लई हे १९७३ पासून अव्याहतपणे लिहित आहेत. १९८५ नंतर त्यांच्या लिखाणाचा वेग वाढला. त्यात सातत्य राहिले महत्त्वाचे आहे.

गोवा मला भावतो...

उपराष्ट्रपती म्हणाले की, गोवा राज्य हे निसर्गाने भरभरून दिलेले सुंदर असे ठिकाण आहे. येथील संस्कृती तसेच मनमिळावू लोकांमुळे मला नेहमीच गोव्याचे आकर्षण वाटते.

 

टॅग्स :goaगोवा