शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे, ‘मराठी राजभाषा साहित्य संमेलन २०२४’ मध्ये उमटले सूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:30 IST

‘मराठी राजभाषा साहित्य संमेलन २०२४’ आझाद भवन, पर्वरी येथे पार पडले.

नारायण गावस 

पणजी: मराठी ही गाेव्याची राजभाषा झाली पाहिजे. मराठी ही गाेव्याची असून राज्याने अनेक मराठी लेखक कवी निर्माण केले आहेत. त्यामुळे मराठीचा जयजयकार हा गोव्यात झाला पाहिजे असा सुर शनिवारी पर्वरी येथे पार पडलेल्या मराठी राजभाषा साहित्य संमेलन २०२४ मध्ये उमटला. मराठी असे आमुची मायबोली व गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी राजभाषा साहित्य संमेलन २०२४’ आझाद भवन, पर्वरी येथे पार पडले. याचे उद्घाटन नागपूर येथील महाकवी सुधाकर गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित हाेते.

कार्यक्रमाचे उद्घाटक महाकवी सुधाकर गायधनी म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहिले तसेच अन्य मराठी संमेलने पाहिली पण मराठी राजभाषा साहित्य संमेलन प्रथमच पाहत आहोत. गाेव्यात मी प्रथमच आलाे आहो पण गाेमंतकीयांचे मराठी विषयी असलेले प्रेम तसेच त्यांचे मराठी साहित्य पाहून गाेमतकांची मराठी राजभाषा करावीच लागणार आहे. मराठी जगात सुंदर भाषा आहे. या एका भाषेचे ७० बाेली भाषा आहेत. मराठीत माेठे साहित्य आहे, असे ते म्हणाले. 

गायधनी पुढे म्हणाले कवी असो किंवा लेखक त्यांना पुरस्कारांपेक्षा रसिक महत्वाचे असतात. रसिकांची जागा ही पुरस्कारांपेक्षा मोठी असते. कवी हा व्यक्त कलावंत आहे तर रसिक हा अव्यक्त कलावंत आहे. कधीही कवीने आपल्या कवितेतून कुणाची विडंबना करु नये. प्रत्येक कवी तसेच लेखकाला अहंकार असायला पाहिजे पण तो अहंकार सुंदर असायला पाहिजे. राजकारणातील मंत्री आमदार खासदार सर्वजण एक दिवस माजी होतात पण कवी लेखक हा कधीच माजी होऊ शकत नाही असे ते म्हणाले.

यावेळी संमेलनाध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनीही गोमंतकातील मराठी भाषेचे महत्व याविषयी आपले विचार व्यक्त केेले ते म्हणाले मराठी ही गाेमंतकाची खरी भाषा आहे त्यामुळे ती गोमंतकाची राजभाषा झालीच पाहिजे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला स्वागताध्यक्ष म्हणून मराठी असे आमुची मायबोलीचे अध्यक्ष प्रकाश य. भगत, कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवयित्री पौर्णिमा देसाई तसेच गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, गोमंतक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर, गुरूदास सावळ,  संजय हरमलकर सन्माननीय अतिथी म्हणून ॲड. अमित सावंत माजी सरपंच मांद्रे, डॉ. गुरुदास नाटेकर, प्रभाकर ढगे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :goaगोवा