शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

म्हापशात अग्नितांडव

By admin | Updated: October 24, 2015 03:00 IST

बार्देस : म्हापसा पालिका बाजारपेठेतील तीन दुकानांना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

बार्देस : म्हापसा पालिका बाजारपेठेतील तीन दुकानांना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले. कॅफे धाकुली हॉटेलमधील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन हॉटेल जळून खाक झाले. या हॉटेलच्या भिंती तेवढ्या शिल्लक राहिल्या. आगीवर नियंत्रण आणताना अग्निशामक दलाचे तीन जवान जखमी झाले असून दोघांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले, तर एकाला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला कॅफे धाकुली या हॉटेलमध्ये पहाटे साडेतीन वाजता आग लागली. या वेळी हॉटेलमध्ये गॅसचे पाच सिलिंडर होते. त्यातील एका सिलिंडरचा स्फोट झाल्याने हॉटेलच्या छपराचे पत्रे उंच उडाले आणि ते जवळच असलेल्या सुहास दिवकर यांच्या दोरखंड व प्लास्टिकच्या दुकानावर जाऊन पडल्याने त्यांच्याही दुकानातील माल मोठ्या प्रमाणात जळाला. त्यामुळे त्यांचे ५ लाखांचे नुकसान झाले. कॅफे धाकुलीच्या बाजूला असलेल्या कॅफे एस. एस. झेवियर या बार आणि रेस्टॉरंटला आग लागून चार वातानुकूलन यंत्रे, छप्पर तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्याने १० लाखांचे नुकसान झाले, अशी माहिती या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने दिली. कॅफे धाकुली या हॉटेलचे मालक लक्ष्मीदास धाकुली यांनी दीड वर्षांपूर्वी या हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. आग लागल्याची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला मिळताच दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव तसेच जवान अशोक परब, ज्ञानेश्वर सावंत, हनुमंत मापारी, विठ्ठल गाड, प्रमोद गवंडी, महेश नाईक, संदीप गावस, दिप्तेश पै, शिवाजी राणे, सिद्धेश नाईक, तर पणजी येथील मुख्य अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर, दलाचे जवान विनायक फडते, आग्नेल रॉड्रिग्स, डी. एल. बाबरेकर, योगेश आमोणकर, एम. शेख, आवेश नाईक, मनोज गावकर, आंतोनियो मोनीस, दत्ताराम देसाई, नारायण मोर्लेकर, मनोज नाईक, मंजूनाथ हन्सीमणी, पिळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी अनिल तळर्णकर, सूरज शेटगावकर, उमेश नेमळेकर, एस. के. पाटील, जी. एस. नाईक, एच. पी. परब, के. जी. सावंत यांनी पाच पाण्याच्या बंबमधून २८ हजार लिटर पाणी व फायर हायड्रंटमधील पाण्याचा वापर करून आग विझविण्यात आली. पहाटे आग लागल्याचे कळताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. समाजकार्यकर्ते रामदास फळारी यांनी सांगितले की, म्हापसा पालिका क्षेत्रात विजेच्या खांबावर वाहिन्या अस्ताव्यस्त स्थितीत आहेत. याकडे वीज कार्यालयाचे लक्ष नाही. तसेच दुकानांच्या बाजूनेही वीजवाहिन्यांची गर्दी झाली आहे. परप्रांतीय व्यापारी रस्त्यावर बसत असल्याने आग लागल्यावर अग्निशामक दलाची गाडी नेण्यास वाट मिळत नाही. घनश्याम शेटगावकर यांनी सांगितले की, पालिकेचे लक्ष नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. अ‍ॅड. महेश राणे यांनी सांगितले की, पालिकेचे बाजारपेठेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. म्हापशातील व्यापाऱ्यांनीही गांभीर्य ओळखायला हवे. सध्या म्हापसा हे स्थानिकांसाठी नसून परप्रांतीयासाठी असल्याच्या भावनेने कोणीच लक्ष देत नसल्याची टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)