शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोव्यात वाड्यावस्त्यांवरील सरकारी शाळा बंद पडायला वाहतूकव्यवस्था जबाबदार, मनोहर पर्रीकर यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 19:05 IST

वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वाड्यावस्त्यांवरील मुलांना त्यांचे पालक शहरातील शाळांमध्ये पाठवत असल्याने सरकारी शाळांतील मुलांची पटसंख्या कमी झाली.  त्यामुळे राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा बंद पडत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

पणजी- वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वाड्यावस्त्यांवरील मुलांना त्यांचे पालक शहरातील शाळांमध्ये पाठवत असल्याने सरकारी शाळांतील मुलांची पटसंख्या कमी झाली.  त्यामुळे राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा बंद पडत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित श्रद्धांजलीपर सभेत पर्रीकर उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी राज्यातील गावागावांत शिक्षण पोहोचविले. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम माजी मुख्यमंत्री स्व. शशिकलाताई काकोडकर यांनी केले. शशिकलाताई काकोडकर यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना भाऊसाहेब बांदोडकर यांना डावलता येणार नाही, त्यामुळे पर्रीकर यांनी भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला सांष्टांग नमस्कार करीत असल्याचे सांगत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणि सार्वजनिक विकासाविषयी केलेल्या कामाचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जुन केला. राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद पडत असून, त्यामागे सरकारचा डाव असल्याचा आरोप भारतीय भाषा सुरक्षा मंच करीत आले आहे. 

सव्वाशेच्यावर सरकारी प्राथमिक मराठी शाळा बंद पडल्या असून, अजून काही शाळा सरकार बंद करणार असल्याचे भाभासुमंचे म्हणणो आहे. याबाबत माध्यमांनीही त्यावर प्रकाश टाकला होता. या वृत्ताचा दाखला देत र्पीकर म्हणाले की, गावागावात सरकारी प्राथमिक शाळांना मुले मिळत नाहीत, त्यामुळे ते बंद पडत आहेत. याला कारणीभूत वाहतूक व्यवस्था आहे. आई-वडील शहरात काम करीत असेल, तर वाहनावरून ते मुलांना शहरातील शाळात दाखल करतात. पूर्वी अशी वाहतूक व्यवस्था नव्हती. आठ-आठ किलोमीटर पायपीट करावी लागत असे, त्यामुळे त्या काळी सरकारी शाळांना मुले मिळत होती, आता परिस्थिती बदलली आहे, असा खुलासा करीत त्यांनी शाळा बंद पडण्यामागे सरकारला दिल्या जाणाऱ्या दोषाबाबत स्पष्टीकरण दिले.