शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मनोहर पर्रीकर बुधवारी गोव्यात, प्रशासनावर परिणाम झाल्याची मंत्र्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 19:39 IST

मुंबईच्या इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांची स्थिती आता सुधारली आहे. मुंबईच्या लिलावती इस्पितळात मुख्यमंत्री दाखल झाले होते.

पणजी : मुंबईच्या इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांची स्थिती आता सुधारली आहे. मुंबईच्या लिलावती इस्पितळात मुख्यमंत्री दाखल झाले होते. अमेरिकेहून उपचार घेऊन गेल्या बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री गोव्यात परतले होते. तथापि, गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व उलटीही आल्याने मुंबईला जावे लागले होते. तिथे काही चाचण्याही करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी गेले काही दिवस मुंबईत उपचार घेतले व त्यांची प्रकृती सुधारली आहे. ते बुधवारपर्यंत गोव्यात परततील. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही  पर्रीकर बुधवारपर्यंत गोव्यात असतील असे सोमवारी स्पष्ट केले.

पर्रीकर  गोव्याबाहेर असल्याने प्रशासनावर परिणाम झाला आहे, काय असे पत्रकारांनी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांना विचारले असता, ते म्हणाले की परिणाम हा होणारच. त्याविषयी शंका नाही. मात्र हा आरोग्याचा विषय असल्याने गोमंतकीयांनी समजून घ्यायला हवे व गोमंतकीय ते समजून घेत आहेत. हा विषय काही मुख्यमंत्र्यांच्या हाती नाही. कधी कुणाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ते सांगता येत नाही. कारण आम्ही काही देव नव्हे.

मंत्री सरदेसाई म्हणाले, की मुख्यमंत्री गोव्यात नसल्याने त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनावर परिणाम झाला तरी, मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांकडे बरेच अधिकार सोपवून परिणामांचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे जास्त नुकसान होत नाही. मुख्यमंत्री काही स्वत:च्या आवडीने गोव्याबाहेर गेलेले नाहीत. दुसरे मंत्रीही त्याचवेळी आजारी झाले पण त्याला पर्याय नाही. कारण माणसांचे आरोग्य हे शेवटी देवाच्या हाती असते. मुख्यमंत्री र्पीकर यांना मी नुकताच भेटून आलो आहे. मी विदेशात होतो पण परत येताना मी त्यांना भेटलो. ते उद्या-परवा गोव्यात येणार आहेत.

मंत्री सरदेसाई यांनी यावेळी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला. काँग्रेसकडून जीसीए व अन्य संघटनांवर टीका केली जाते. काँग्रेसचा विधिमंडळ पक्ष मात्र काहीच बोलत नाही. विधिमंडळ पक्षाने गेल्या विधानसभा अधिवेशनात काहीच कामगिरी केली नाही. काँग्रेसने खेळात राजकारण आणू नये.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा