शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पावसामुळे आंबा, काजू पीक धोक्यात

By admin | Updated: May 7, 2015 00:40 IST

पणजी : मंगळवारी रात्री कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांबरोबच भातपिकाचीही हानी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे

पणजी : मंगळवारी रात्री कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांबरोबच भातपिकाचीही हानी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे फळे झडून पडण्याच्या घटना घडल्या असून बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. सलग दोन ते तीन दिवस पाऊस कोसळल्यास झाडावरील फळे कुजण्याची शक्यता आहे.कृषी संचालक ओर्लांदो रॉड्रिग्स यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, विभागीय कृषी अधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यास सांगितले असून पुढील आठवड्यात सर्वेक्षण अहवाल प्राप्त होईल. केपे, सांगे, सासष्टी, फोंडा, सत्तरी आदी तालुक्यांमध्ये वायंगण शेती केली जाते. हे भातपीक कापण्यासाठी तयार असताना पावसामुळे आडवे झाल्याने कुजण्याचा धोका आहे. तयार झालेला दाणा कुजू शकतो, असे एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने सांगितले. ५0 टक्के आंबे अजून झाडावर आहेत. वादळी वाऱ्यामुळे बागायतींमध्ये फळे झडून पडण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडलेले आहेत. काजूच्या बाबतीतही हाच प्रकार घडलेला आहे. मात्र, एकदा कोसळलेल्या पावसाने झाडावरील फळाला फारशी हानी पोहोचणार नाही; उलट बहर आलेला असल्यास फळ धरण्यास हा पाऊस उपयुक्त ठरेल, असा दावाही अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. ७५ टक्के काजू काढलेले असून केवळ २५ टक्के पीक झाडावर आहे.(प्रतिनिधी)