शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पावसामुळे आंबा, काजू पीक धोक्यात

By admin | Updated: May 7, 2015 00:40 IST

पणजी : मंगळवारी रात्री कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांबरोबच भातपिकाचीही हानी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे

पणजी : मंगळवारी रात्री कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांबरोबच भातपिकाचीही हानी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे फळे झडून पडण्याच्या घटना घडल्या असून बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. सलग दोन ते तीन दिवस पाऊस कोसळल्यास झाडावरील फळे कुजण्याची शक्यता आहे.कृषी संचालक ओर्लांदो रॉड्रिग्स यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, विभागीय कृषी अधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यास सांगितले असून पुढील आठवड्यात सर्वेक्षण अहवाल प्राप्त होईल. केपे, सांगे, सासष्टी, फोंडा, सत्तरी आदी तालुक्यांमध्ये वायंगण शेती केली जाते. हे भातपीक कापण्यासाठी तयार असताना पावसामुळे आडवे झाल्याने कुजण्याचा धोका आहे. तयार झालेला दाणा कुजू शकतो, असे एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने सांगितले. ५0 टक्के आंबे अजून झाडावर आहेत. वादळी वाऱ्यामुळे बागायतींमध्ये फळे झडून पडण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडलेले आहेत. काजूच्या बाबतीतही हाच प्रकार घडलेला आहे. मात्र, एकदा कोसळलेल्या पावसाने झाडावरील फळाला फारशी हानी पोहोचणार नाही; उलट बहर आलेला असल्यास फळ धरण्यास हा पाऊस उपयुक्त ठरेल, असा दावाही अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. ७५ टक्के काजू काढलेले असून केवळ २५ टक्के पीक झाडावर आहे.(प्रतिनिधी)