शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

बेरोजगारी हीच तरुणांची प्रमुख समस्या : पार्सेकर

By admin | Updated: March 17, 2015 01:41 IST

पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांसाठी तब्बल १७ प्रचारसभा घेतल्या.

पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांसाठी तब्बल १७ प्रचारसभा घेतल्या. स्थिर सरकार, राज्याचा चौफेर विकास आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रोजगार हे त्यांच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे होते. प्रचारासाठी ठिकठिकाणी फिरलो, त्यात तरुणवर्गामध्ये बेरोजगारीचा प्रश्नच प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे गोव्यात अधिकाधिक रोजगार कसा उपलब्ध होईल, यालाच आपण प्राधान्य देणार असल्याचे पार्सेकर म्हणाले. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. पक्षासाठी खरे तर ही सेमीफायनलच आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस पेडणे तालुका प्रचारासाठी पिंजून काढला. याबद्दल त्यांना बोलते केले... ॅ प्रादेशिक आराखडा आदी जनतेचे खरे विषय प्रचारात आलेच नाहीत. खाणी सुरू करणार, असे आश्वासन निवडणूक नजरेसमोर ठेवून दिले जात आहे, अशी टीका विरोधकांकडून होतेय. प्रचारात हे मुद्दे राहून गेले, असे तुम्हाला वाटते काय? - मुळीच नाही. खाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. निवडणुकीसाठी हे गाजर, असा आरोप करणाऱ्यांनी हेही जाणून घेतले पाहिजे की, खाणींना पर्यावरणीय परवाने मिळावेत, यासाठी केंद्राकडे बऱ्याच महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. निवडणुकीचा प्रचार हा गेल्या आठ-दहा दिवसांपासूनच करतोय. राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू होऊन अवलंबितांना त्यांचा रोजगार मिळावा, याकरिता सरकार गंभीरपणे प्रयत्न करीत आहे. हा विषय जिल्हा पंचायत निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनचा आहे आणि सरकारने टप्प्याटप्प्याने त्यासाठी काय प्रयत्न केले, हे मी कुठल्याही जाहीर व्यासपीठावरून सांगू शकतो. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लवकरात लवकर हे दाखले देण्याचे आश्वासन दिलेले आहे. उद्या-परवाही ते मिळू शकतील. कोणत्याही परिस्थितीत अर्थसंकल्पापूर्वी हे दाखले मिळविण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून अर्थसंकल्पीय भाषणात याचा उल्लेख करता येईल. ॅ ही निवडणूक पक्षीय पातळीवर घेण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. विरोधी काँग्रेसने तर निवडणुकीवरच बहिष्कार घातलेला आहे. तुम्हाला काय वाटते? - सरकारने पूर्ण विचाराअंतीच हा निर्णय घेतलेला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या सर्वोच्च पदावर असलो तरी, काही चुकले तर विचारणारे आहेत. झेडपींनीही जबाबदारपणे वागावे यासाठी त्यांना पक्षाशी बांधील ठेवणे गरजेचे होते. विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष चालतात, मग जिल्हा पंचायतींसाठीच का नाही? लोकशाहीच्या चौकटीतच आम्ही वावरतो आहोत. (पान २ वर)