शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

मगोपत दुही, दोन आमदारांचा स्वतंत्र गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:15 IST

आजगावकर व पावसकर हे दोघे एकत्र असल्याने ते पक्षाचे विधिमंडळातील दोन तृतीयांश सदस्य बनतात व पक्षांतर करू शकतात.

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार बाबू आजगावकर व दीपक पावसकर यांनी वेगळी चूल मांडत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यांना राजकीयदृष्टय़ा एकटे पाडण्याच्या हालचाली मगोपकडून खेळल्या जात असतानाच त्यांनी पक्षाला हा दणका दिला आहे. ते आजच दुसरा गट स्थापन केल्याची नोंदणी विधानसभा अध्यक्ष मायकल लोबो यांच्याकडे करणार होते. परंतु ते दुबईला गेले आहेत. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून बाबू आजगावकर यांना पक्षातून बडतर्फ करण्याची योजना घाटत आहे.

आजगावकर व पावसकर हे दोघे एकत्र असल्याने ते पक्षाचे विधिमंडळातील दोन तृतीयांश सदस्य बनतात व पक्षांतर करू शकतात. मगोपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी केंद्रीय समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात बडतर्फीचा ठराव संमत होणार असल्याचे वृत्त आहे. समितीच्या एका सदस्याने सांगितले की, विधिमंडळ पक्ष वाचविण्याच्या नावाखाली ही चाल खेळली जाणार आहे.

सोमवारी रात्री प्रमोद सावंत यांच्या नावाला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न चालला असता मगोपचे नेते सुदिन ढवळीकर नवे अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न करीत होते. तेव्हा बाबू आजगावकरांच्या नेतृत्वाखाली दीपक पाऊसकर यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन भाजपच्या आघाडी सरकारला संपूर्ण पाठिंबा देऊ केला होता. त्यावेळी ढवळीकरांची भेट होत नव्हती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ढवळीकरांना बाहेर ठेवून नव्या मंत्रिमंडळात आजगावकर व पाऊसकर यांना स्थान देण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे आजगावकर-पाऊसकर यांचा गट तोडण्यासाठी धारगळ आमदारावर कारवाई करण्याची योजना तयार करण्यात आली होती.

आजगावकर म्हणाले, आमच्या पक्षाला २०१७मध्ये काँग्रेस पक्षानेही सरकार घडविण्याचे आमंत्रण दिले होते; परंतु ढवळीकरांनी भाजपला पाठिंबा देण्याचे निश्चित केले तेव्हाच आपण या सरकारबरोबर संपूर्ण कारकीर्द कायम राहू असे ढवळीकरांना म्हटले होते. आजही आमचे तेच मत कायम आहे. 

मगोपमध्ये ढवळीकर बंधूंनी आजगावकर व पाऊसकर यांच्यापेक्षा आपल्या घराण्याचेच राजकारण पुढे दामटण्याचे राजकारण चालविल्याने हे दोघे असंतुष्ट आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नितीन गडकरी यांच्यापाशीही तशा भावना बोलून दाखविल्या होत्या.

  केंद्रीय समितीची आज बैठकमगोपच्या केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष रत्नकांत म्हादरेळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ‘पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक शनिवारी 23 रोजी सकाळी 10.30 वाजता बोलावण्यात आली आहे, ही गोष्ट खरी; परंतु कोणावर कारवाई वगैरे करण्याचा हेतू नाही आणि तसा मुद्दाही विषयपत्रिकेत नाही. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे सरकारमध्ये मगोपची पुढील वाटचाल कशी असावी, याबाबत तसेच मांद्रे व म्हापसा विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय समितीविषयी मत कलुषित करण्यासाठीच कारवाईच्या अफवा उठविल्या जात आहेत.’

टॅग्स :goaगोवा