शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

फालेरोंच्या पराभवानंतरच आलेख चढला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:23 IST

माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघात पराभव झाला. फालेरो यांची राजकीय कारकिर्द आता संपली असा निष्कर्ष त्यावेळी काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील त्यांच्या विरोधकांनीही काढला होता, पण प्रत्यक्षात त्या पराभवानंतरच फालेरो यांचा राजकीय आलेख उंचावत गेला.

पणजी - माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघात पराभव झाला. फालेरो यांची राजकीय कारकिर्द आता संपली असा निष्कर्ष त्यावेळी काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील त्यांच्या विरोधकांनीही काढला होता, पण प्रत्यक्षात त्या पराभवानंतरच फालेरो यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. आता पुन्हा फालेरो यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद प्राप्त झाल्याने फालेरो यांचे विरोधक गारद झाले आहेत. फालेरो यांची राजकीय उंची गोव्यातील काँग्रेसमध्ये वाढली आहे.

फालेरो यांचा पराभव 2007 साली चर्चिल आलेमाव यांनी केला होता. आलेमाव यांनी त्यावेळी सेव्ह गोवा पक्ष स्थापन करून त्या पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. 1999 साली दोनवेळा मुख्यमंत्रीपद आणि अनेक वर्षे गोव्यात मंत्रीपद भुषविलेल्या फालेरो यांच्या हाती 2007 सालच्या पराभवानंतर त्यावेळी काहीच शिल्लक राहिले नव्हते. आलेमाव यांनी नावेली काबिज केले होते व त्यामुळे फालेरो यांना काँग्रेसच्या त्यावेळच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसपद दिले होते. शिवाय ईशान्येकडील सात राज्यांचे प्रभारीपद दिले होते. सात वर्षे फालेरो यांचा गोव्याशी राजकीयदृष्टय़ा मोठा संबंध राहिला नव्हता. फालेरो व आलेमाव यांच्यातील राजकीय शत्रूत्व खूप वाढले होते. आलेमाव यांनी आपल्या सेव्ह गोवा पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून व दिगंबर कामत सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून स्थान मिळविल्यानंतर फालेरो यांच्या जखमांवर मिठ चोळले गेले होते. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या काळात फालेरो यांना गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गोव्यात पाठवले गेले होते. काँग्रेसला त्या निवडणुकीत 16 जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे फालेरो यांनी 2क्क्7 साली स्वत: नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते जिंकूनही आले. या उलट आलेमाव यांचा 2012 च्या निवडणुकीत नावेलीत पराभव झाला होता. आवेर्तान फुर्तादो यांनी नावेलीत चर्चिलला पराभूत केले होते. चर्चिलला 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट हवे होते पण काँग्रेसने तिकीट दिले नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले पण नावेली सोडून त्यांना बाणावली मतदारसंघात जावे लागले. 2017 च्या निवडणुकीच्या काळात फालेरो व चर्चिल यांच्यात पुन्हा मैत्रीचे नाते तयार झाले. आता या दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र फालेरो यापुढील विधानसभा निवडणूक पुन्हा लढवतील की नाही ते स्पष्ट नाही. फालेरो हे काँग्रेसच्या दिल्लीतील राजकारणातच आता नव्याने स्थिरावू शकतात. त्यांना ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद सांभाळणो जास्त आवडते. फालेरो यांनी 2017 च्या निवडणूक निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा प्रयत्न केला होता पण दिग्वीजय सिंग यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी फालेरो यांची निवड होणार नाही याची काळजी घेतली. आता दिग्वीजय सिंग यांच्यापेक्षाही फालेरो यांचे स्थान काँग्रेसमध्ये वाढले आहे. दिग्विजय सिंग यांना तूर्त काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दूर ठेवले आहे.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण