शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

फालेरोंच्या पराभवानंतरच आलेख चढला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:23 IST

माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघात पराभव झाला. फालेरो यांची राजकीय कारकिर्द आता संपली असा निष्कर्ष त्यावेळी काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील त्यांच्या विरोधकांनीही काढला होता, पण प्रत्यक्षात त्या पराभवानंतरच फालेरो यांचा राजकीय आलेख उंचावत गेला.

पणजी - माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघात पराभव झाला. फालेरो यांची राजकीय कारकिर्द आता संपली असा निष्कर्ष त्यावेळी काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील त्यांच्या विरोधकांनीही काढला होता, पण प्रत्यक्षात त्या पराभवानंतरच फालेरो यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. आता पुन्हा फालेरो यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद प्राप्त झाल्याने फालेरो यांचे विरोधक गारद झाले आहेत. फालेरो यांची राजकीय उंची गोव्यातील काँग्रेसमध्ये वाढली आहे.

फालेरो यांचा पराभव 2007 साली चर्चिल आलेमाव यांनी केला होता. आलेमाव यांनी त्यावेळी सेव्ह गोवा पक्ष स्थापन करून त्या पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. 1999 साली दोनवेळा मुख्यमंत्रीपद आणि अनेक वर्षे गोव्यात मंत्रीपद भुषविलेल्या फालेरो यांच्या हाती 2007 सालच्या पराभवानंतर त्यावेळी काहीच शिल्लक राहिले नव्हते. आलेमाव यांनी नावेली काबिज केले होते व त्यामुळे फालेरो यांना काँग्रेसच्या त्यावेळच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसपद दिले होते. शिवाय ईशान्येकडील सात राज्यांचे प्रभारीपद दिले होते. सात वर्षे फालेरो यांचा गोव्याशी राजकीयदृष्टय़ा मोठा संबंध राहिला नव्हता. फालेरो व आलेमाव यांच्यातील राजकीय शत्रूत्व खूप वाढले होते. आलेमाव यांनी आपल्या सेव्ह गोवा पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून व दिगंबर कामत सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून स्थान मिळविल्यानंतर फालेरो यांच्या जखमांवर मिठ चोळले गेले होते. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या काळात फालेरो यांना गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गोव्यात पाठवले गेले होते. काँग्रेसला त्या निवडणुकीत 16 जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे फालेरो यांनी 2क्क्7 साली स्वत: नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते जिंकूनही आले. या उलट आलेमाव यांचा 2012 च्या निवडणुकीत नावेलीत पराभव झाला होता. आवेर्तान फुर्तादो यांनी नावेलीत चर्चिलला पराभूत केले होते. चर्चिलला 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट हवे होते पण काँग्रेसने तिकीट दिले नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले पण नावेली सोडून त्यांना बाणावली मतदारसंघात जावे लागले. 2017 च्या निवडणुकीच्या काळात फालेरो व चर्चिल यांच्यात पुन्हा मैत्रीचे नाते तयार झाले. आता या दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र फालेरो यापुढील विधानसभा निवडणूक पुन्हा लढवतील की नाही ते स्पष्ट नाही. फालेरो हे काँग्रेसच्या दिल्लीतील राजकारणातच आता नव्याने स्थिरावू शकतात. त्यांना ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद सांभाळणो जास्त आवडते. फालेरो यांनी 2017 च्या निवडणूक निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा प्रयत्न केला होता पण दिग्वीजय सिंग यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी फालेरो यांची निवड होणार नाही याची काळजी घेतली. आता दिग्वीजय सिंग यांच्यापेक्षाही फालेरो यांचे स्थान काँग्रेसमध्ये वाढले आहे. दिग्विजय सिंग यांना तूर्त काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दूर ठेवले आहे.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण