शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट, मुख्यमंत्री पर्रिकरांनी तातडीने घेतली मंत्र्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 19:56 IST

मंत्रिमंडळातील एखाद्या  मंत्र्यांने आक्रमक भूमिका घेत  धमकी दिली तरी गोव्याच्या प्रशासनावर कोणताही परिणाम होत नाही अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या  वृत्ताची गंभीर दखल घेतली व तातडीने शुक्रवारीच मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया मार्गी लावली.

 - सदगुरू पाटील

पणजी, दि. २२ -  मंत्रिमंडळातील एखाद्या  मंत्र्यांने आक्रमक भूमिका घेत  धमकी दिली तरी गोव्याच्या प्रशासनावर कोणताही परिणाम होत नाही अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या  वृत्ताची गंभीर दखल घेतली व तातडीने शुक्रवारीच मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया मार्गी लावली.

आपल्या सालीगाव मतदारसंघातील नेरूल वगैरे भागात पाण्याचा पुरवठाच होत नाही अशी तक्रार गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी केली होती पण बांधकाम खात्याचे अभियंते लक्ष देईना. मंत्री साळगावकर यांनी शेवटी चिडून आपण यापुढे जलवाहिनीच फोडीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर राज्यात मोठा गजहब निर्माण झाला. राजकीय गोटात खळबळ उडाली. जलवाहिनीच्या टोकावर जिथे सिमेंट घातले गेले आहे त्यामूळे पाणी पुढे वाहत नाही. त्यामुळे सिमेंटच्या जागी आपण जलवाहिनी फोडेन असे साळगावकर म्हणाले होते. मात्र आठ दिवस झाले तरी गोवा प्रशासनाने या धमकीची काहीच दखल घेतली नाही. मंत्र्याने जलवाहिनी फोडण्याची धमकी देऊन देखील प्रशासन ढिम्म व मंत्र्याच्या मतदारसंघातील नळ कोरडेच असे वृत्त लोकमतने देताच चक्रे हलली. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सकाळीच मंत्री जयेश साळगावकर यांना फोन केला व तातडीने बैठकीसाठी बोलावले. बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर, जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर, आमदार मायकल लोबो व वरिष्ठ अभियंत्यांना बैठकीसाठी बोलविण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली व पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी विविध ठोस अशा  उपाययोजना जाहीर केल्या. मंत्री साळगावकर यांच्या मतदारसंघात रोज पाणी पुरवठा व्हायलाच हवा असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अभियंत्यांना बजावले. तसेच यापुढे पाणी साठविण्यासाठी लोकांना टाक्या दिल्या जातील असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.मंत्री साळगावकर यांनी बैठकीनंतर लोकमतशी बोलताना सरकारच्या नव्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. आता तरी प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Governmentसरकार