शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

Coronavirus: गोव्यात आणखी तीन दिवस लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 20:33 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, शेजारील कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय

पणजी : गोव्यात सरकारने जनता कर्फ्यू आणखी तीन दिवसांनी वाढवला आहे. त्यामुळे आता २५ रोजी गुढी पाडव्यानंतरच सरकारचे पुढील पाऊल स्पष्ट होईल. गरज पडल्यास लॉकडाउनची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली जाईल, असे सांगण्यात आले. शेजारी महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांनी ३१ पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील आढावा घेऊन जनता कर्फ्यू आणखी तीन दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, शेजारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर सावंत यांनी चर्चा केली. ‘कोरोना व्हायरस’च्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ  नये आणि घरीच थांबावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जनता कर्फ्यू तीन दिवसांनी वाढवला असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. आरोग्य विषयक व आणीबाणीच्या सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. सरकारी कार्यालये, खाजगी कार्यालयेही बंद राहतील, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. तीन दिवसांनंतर पुन: स्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास लॉकडाउन येत्या ३१ पर्यंत वाढविला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अनेक लोकांनी यापूर्वीच अत्यावश्यक वस्तूंची बेगमी केली आहे. त्यामुळे अशा लोकांकडून फारशा प्रतिक्रिया आल्या नाहीत परंतु ज्यांनी बेगमी केलेली नाही त्यांच्यासमोर मात्र प्रश्न उपस्थित झाला. 

कर्नाटक, केरळच्या कोंबड्यांवर बंदी ‘कोरोना’बरोबरच बर्ड फ्ल्युचाही धोका असल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाºयांनी कर्नाटक व केरळमधून गोव्यात आयात केल्या जाणाºया कोंबड्यांवर बंदी घातली आहे. काल मध्यरात्रीपासून ही बंदी लागू झाली असून या राज्यांमधून थेट अथवा अप्रत्यक्षपणे गोव्यात कोंबड्यांची आयात करता येणार नाही. दक्षिण गोवा जिल्हाधिकाºयांकडूनही अशाच प्रकारचा आदेश् काढला जाणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुध, भाजीपाला, मासळीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या